शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

टंचाईवर मात करण्यासाठी बंधाऱ्यातील गाळ काढला

By admin | Updated: June 6, 2016 00:43 IST

कापशी : पावसाळ्यात पाणीसाठा वाढणार; दुष्काळ हटविण्यासाठी ग्रामस्थांचे प्रयत्न- लोकमत जलमित्र अभियान

आदर्की : ओढ्यावर बंधारा होता पण; गाळाने तो संपूर्ण भरलेला. त्यामुळे पाणीसाठा होत नव्हता. त्यातच दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. पाणीटंचाईचा सामना सर्वांनाच करावा लागला. या परिस्थितीवर मात करण्यासाठी कापशी येथील तरुण एकत्र आले. त्यांना ग्रामपंचायतीने साथ दिली आणि बघता-बघता शेकडो ब्रास गाळ बंधाऱ्यातून काढण्यात आला. त्यामुळे आता या बंधाऱ्यात पाणीसाठा मोठ्या प्रमाणात होणार आहे. फलटण तालुक्यातील कापशी हे गाव. २००४ मध्ये दुष्काळ पडला. त्यावेळी पाण्याची समस्या निर्माण झाली. यामधून युवकांनी धडा घेतला. त्यासाठी येथील तरुण एकत्र आले. त्यांनी श्रमदान व लोकसहभागातून गावच्या ओढ्यावर बंधारे बांधले. मात्र, गेल्या १० वर्षांत हे बंधारे गाळाने भरले. पावसाळ्यात पाणी कमी प्रमाणात साठू लागले. गाळामुळे पाणी वाहूनही जाऊ लागले. परिणामी बंधारे फक्त नावापुरतेच राहिले. तसेच धोम बलकवडी कालव्यातून येणाऱ्या पाण्याचाही उपयोग होईनासा झाला. याचा परिणाम विहिरींवर होऊ लागला. विहिरींची पाणीपातळी खालावली. त्यातच गेल्या वर्षापासून दुष्काळी स्थिती निर्माण झाली. या परिस्थितीवर मात करण्यासाठी युवक एकत्र आले. त्यांना ग्रामपंचायत व ग्रामस्थांनीही साथ दिली. आळजापूर-सासवड दरम्यान कापशी हद्दीत असणाऱ्या सिमेंट बंधाऱ्यातील गाळ काढण्याचा निर्णय घेण्यात आला. हा बंधारा पूर्णपणे गाळाने भरलेला होता. सर्वांनीच साथ दिली. त्यामुळे जेसीबीच्या साह्याने या बंधाऱ्यातील गाळ काढण्यास सुरुवात केली. शेकडो ब्रास गाळ काढण्यात आला. हा गाळ अनेक शेतकऱ्यांनी जमिनीत टाकला. त्यामुळे जमीन सुपिक होण्यास मदत होणार आहे. या बंधाऱ्यातील गाळ काढल्यामुळे हजारो लिटर पाणी साठणार आहे. याचा परिणाम पाणीपातळीवर होणार आहे. विहिरींची पातळी वाढणार असल्याने पिकांना पाणी पुरेसे होणार आहे. थेंबथेंब पाणी साठवण्यासाठी ग्रामस्थ प्रयत्न करत आहेत. (वार्ताहर) टंचाईवर मात करण्यासाठी एकत्र...कापशीत पाणीटंचाई आहे. त्यावर मात करण्यासाठी तरुण पुढे आले. येथे बंधाऱ्यांची कामे मोठ्या प्रमाणात झाली. मात्र, या बंधाऱ्यात गाळ साठला होता. येणाऱ्या पावसाळ्यात पाणीसाठा वाढवायचा असेल तर गाळ काढावा लागेल हे निश्चित केले. त्यानंतर बंधाऱ्यातील गाळ काढण्यास सुरुवात केली. - दीपक कदम, माजी सरपंच