शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

टंचाईवर मात करण्यासाठी बंधाऱ्यातील गाळ काढला

By admin | Updated: June 6, 2016 00:43 IST

कापशी : पावसाळ्यात पाणीसाठा वाढणार; दुष्काळ हटविण्यासाठी ग्रामस्थांचे प्रयत्न- लोकमत जलमित्र अभियान

आदर्की : ओढ्यावर बंधारा होता पण; गाळाने तो संपूर्ण भरलेला. त्यामुळे पाणीसाठा होत नव्हता. त्यातच दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. पाणीटंचाईचा सामना सर्वांनाच करावा लागला. या परिस्थितीवर मात करण्यासाठी कापशी येथील तरुण एकत्र आले. त्यांना ग्रामपंचायतीने साथ दिली आणि बघता-बघता शेकडो ब्रास गाळ बंधाऱ्यातून काढण्यात आला. त्यामुळे आता या बंधाऱ्यात पाणीसाठा मोठ्या प्रमाणात होणार आहे. फलटण तालुक्यातील कापशी हे गाव. २००४ मध्ये दुष्काळ पडला. त्यावेळी पाण्याची समस्या निर्माण झाली. यामधून युवकांनी धडा घेतला. त्यासाठी येथील तरुण एकत्र आले. त्यांनी श्रमदान व लोकसहभागातून गावच्या ओढ्यावर बंधारे बांधले. मात्र, गेल्या १० वर्षांत हे बंधारे गाळाने भरले. पावसाळ्यात पाणी कमी प्रमाणात साठू लागले. गाळामुळे पाणी वाहूनही जाऊ लागले. परिणामी बंधारे फक्त नावापुरतेच राहिले. तसेच धोम बलकवडी कालव्यातून येणाऱ्या पाण्याचाही उपयोग होईनासा झाला. याचा परिणाम विहिरींवर होऊ लागला. विहिरींची पाणीपातळी खालावली. त्यातच गेल्या वर्षापासून दुष्काळी स्थिती निर्माण झाली. या परिस्थितीवर मात करण्यासाठी युवक एकत्र आले. त्यांना ग्रामपंचायत व ग्रामस्थांनीही साथ दिली. आळजापूर-सासवड दरम्यान कापशी हद्दीत असणाऱ्या सिमेंट बंधाऱ्यातील गाळ काढण्याचा निर्णय घेण्यात आला. हा बंधारा पूर्णपणे गाळाने भरलेला होता. सर्वांनीच साथ दिली. त्यामुळे जेसीबीच्या साह्याने या बंधाऱ्यातील गाळ काढण्यास सुरुवात केली. शेकडो ब्रास गाळ काढण्यात आला. हा गाळ अनेक शेतकऱ्यांनी जमिनीत टाकला. त्यामुळे जमीन सुपिक होण्यास मदत होणार आहे. या बंधाऱ्यातील गाळ काढल्यामुळे हजारो लिटर पाणी साठणार आहे. याचा परिणाम पाणीपातळीवर होणार आहे. विहिरींची पातळी वाढणार असल्याने पिकांना पाणी पुरेसे होणार आहे. थेंबथेंब पाणी साठवण्यासाठी ग्रामस्थ प्रयत्न करत आहेत. (वार्ताहर) टंचाईवर मात करण्यासाठी एकत्र...कापशीत पाणीटंचाई आहे. त्यावर मात करण्यासाठी तरुण पुढे आले. येथे बंधाऱ्यांची कामे मोठ्या प्रमाणात झाली. मात्र, या बंधाऱ्यात गाळ साठला होता. येणाऱ्या पावसाळ्यात पाणीसाठा वाढवायचा असेल तर गाळ काढावा लागेल हे निश्चित केले. त्यानंतर बंधाऱ्यातील गाळ काढण्यास सुरुवात केली. - दीपक कदम, माजी सरपंच