शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
5
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
6
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
7
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
8
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
9
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
10
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
11
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
12
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
13
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
14
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
15
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
16
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
17
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
18
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
19
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
20
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा

टंचाईवर मात करण्यासाठी बंधाऱ्यातील गाळ काढला

By admin | Updated: June 6, 2016 00:43 IST

कापशी : पावसाळ्यात पाणीसाठा वाढणार; दुष्काळ हटविण्यासाठी ग्रामस्थांचे प्रयत्न- लोकमत जलमित्र अभियान

आदर्की : ओढ्यावर बंधारा होता पण; गाळाने तो संपूर्ण भरलेला. त्यामुळे पाणीसाठा होत नव्हता. त्यातच दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. पाणीटंचाईचा सामना सर्वांनाच करावा लागला. या परिस्थितीवर मात करण्यासाठी कापशी येथील तरुण एकत्र आले. त्यांना ग्रामपंचायतीने साथ दिली आणि बघता-बघता शेकडो ब्रास गाळ बंधाऱ्यातून काढण्यात आला. त्यामुळे आता या बंधाऱ्यात पाणीसाठा मोठ्या प्रमाणात होणार आहे. फलटण तालुक्यातील कापशी हे गाव. २००४ मध्ये दुष्काळ पडला. त्यावेळी पाण्याची समस्या निर्माण झाली. यामधून युवकांनी धडा घेतला. त्यासाठी येथील तरुण एकत्र आले. त्यांनी श्रमदान व लोकसहभागातून गावच्या ओढ्यावर बंधारे बांधले. मात्र, गेल्या १० वर्षांत हे बंधारे गाळाने भरले. पावसाळ्यात पाणी कमी प्रमाणात साठू लागले. गाळामुळे पाणी वाहूनही जाऊ लागले. परिणामी बंधारे फक्त नावापुरतेच राहिले. तसेच धोम बलकवडी कालव्यातून येणाऱ्या पाण्याचाही उपयोग होईनासा झाला. याचा परिणाम विहिरींवर होऊ लागला. विहिरींची पाणीपातळी खालावली. त्यातच गेल्या वर्षापासून दुष्काळी स्थिती निर्माण झाली. या परिस्थितीवर मात करण्यासाठी युवक एकत्र आले. त्यांना ग्रामपंचायत व ग्रामस्थांनीही साथ दिली. आळजापूर-सासवड दरम्यान कापशी हद्दीत असणाऱ्या सिमेंट बंधाऱ्यातील गाळ काढण्याचा निर्णय घेण्यात आला. हा बंधारा पूर्णपणे गाळाने भरलेला होता. सर्वांनीच साथ दिली. त्यामुळे जेसीबीच्या साह्याने या बंधाऱ्यातील गाळ काढण्यास सुरुवात केली. शेकडो ब्रास गाळ काढण्यात आला. हा गाळ अनेक शेतकऱ्यांनी जमिनीत टाकला. त्यामुळे जमीन सुपिक होण्यास मदत होणार आहे. या बंधाऱ्यातील गाळ काढल्यामुळे हजारो लिटर पाणी साठणार आहे. याचा परिणाम पाणीपातळीवर होणार आहे. विहिरींची पातळी वाढणार असल्याने पिकांना पाणी पुरेसे होणार आहे. थेंबथेंब पाणी साठवण्यासाठी ग्रामस्थ प्रयत्न करत आहेत. (वार्ताहर) टंचाईवर मात करण्यासाठी एकत्र...कापशीत पाणीटंचाई आहे. त्यावर मात करण्यासाठी तरुण पुढे आले. येथे बंधाऱ्यांची कामे मोठ्या प्रमाणात झाली. मात्र, या बंधाऱ्यात गाळ साठला होता. येणाऱ्या पावसाळ्यात पाणीसाठा वाढवायचा असेल तर गाळ काढावा लागेल हे निश्चित केले. त्यानंतर बंधाऱ्यातील गाळ काढण्यास सुरुवात केली. - दीपक कदम, माजी सरपंच