शहरं
Join us  
Trending Stories
1
मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी?
2
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
4
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
6
'प्रेम? ही तर ओव्हररेटेड भावना', धनुषच्या उत्तराने सर्वच चकित; क्रिती म्हणाली, 'मला नाही वाटत...'
7
'वाराणसी' एस एस राजामौलींच्या सिनेमाचं टायटल घोषित, महेश बाबूचा व्हिडीओ टीझर आऊट
8
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
9
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
10
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
11
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
12
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
13
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
14
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
15
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
16
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
17
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
18
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
19
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
20
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
Daily Top 2Weekly Top 5

अन्यथा सरकारने तलाठी पदे रद्द करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:45 IST

कराड ई-पीक पाणी तलाठ्यांनी करावी अन्यथा सरकारने तलाठी पदे रद्द करावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे नेते सचिन ...

कराड

ई-पीक पाणी तलाठ्यांनी करावी अन्यथा सरकारने तलाठी पदे रद्द करावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे नेते सचिन नलवडे यांनी प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या वेळी शिवाजी पाटील, योगेश झाम्बरे, शिवाजी पवार, शिवाजी गायकवाड, समाधान पवार आदींची उपस्थिती होती.

शेतकऱ्यांना पीक पाणी नोंद करणे सोयीचे व्हावे यासाठी राज्य शासनाने ई-पीक पाणी करण्याचा आदेश काढला आहे. शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाइलवरून शेतात जाऊन ऑनलाइन पीक नोंद करायची आहे. यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांकडे स्मार्ट फोन असणे गरजेचे आहे.

राज्यातील बहुतांश ग्रामीण भागात मोबाइल टॉवर नसल्याने मोबाइलला रेंज येत नाही. इंटरनेटला स्पीड कमी आहे. त्यामुळे पीक पाणी अपलोड करताना फ़ोटो काढताना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. पीक नोंद होत नाही. आजही बऱ्याच शेतकऱ्यांकडे स्मार्ट फोन नाहीत तर काही शेतकरी स्मार्ट मोबाइल वापरण्याबाबत अडाणी आहेत. त्यामुळे त्यांना कुणाची तरी मदत घ्यावी लागत आहे.

शासनाने ई-पीक पाणी नोंदीं दिलेल्या मुदतीत झाल्या नाहीत तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा राहणार आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज सोसायटी मिळणार नाही. साखर कारखान्याला ऊस नोंद होणार नाही. दुष्काळ, महापूर, इतर नैसर्गिक आपत्तीमुळे मिळणारी नुकसानभरपाई मिळणार नाही. आपली व्यवस्था पूर्ण डिजिटल झाली नसताना ई-पीक नोंदीच्या निर्णयाने शेतकऱ्यांचा फायदा कमी, नुकसान जास्त होईल. यासाठी लवकर योग्य तो निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या ई-पीक पाण्याची समस्या सोडवावी.

सरकारने या सर्व बाबींकडे लक्ष देऊन एक तर एखाद्या एजन्सीला ई-पीक पाणी नोंदीचे काम द्यावे, अथवा तलाठ्यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन ई-पीक नोंदी करण्याचा निर्णय घ्यावा. जर नोंदीची कामे शेतकऱ्यांनीच करायची असतील तर तलाठी पदे रद्द करून त्यांच्या पगारावर शासनाचा, पर्यायाने जनतेच्या पैशाचा अपव्यय थांबवावा, असेही निवेदनात म्हटले आहे.