शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

स्मशानभूमीची वाट मूळ मालकाने अडवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:26 IST

चाफळ : उत्तरमांड मध्यम प्रकल्पामध्ये बाधित ठरलेल्या माजगाव गावठाणातील माथणेवाडी प्रकल्पग्रस्तांना मरणानंतरही नरक यातना सहन कराव्या लागत आहेत. स्मशानभूमीकडे ...

चाफळ : उत्तरमांड मध्यम प्रकल्पामध्ये बाधित ठरलेल्या माजगाव गावठाणातील माथणेवाडी प्रकल्पग्रस्तांना मरणानंतरही नरक यातना सहन कराव्या लागत आहेत. स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता मूळमालकाने अडवल्याने मयत व्यक्तीवर नातेवाईकांना अंत्यसंस्कार करता येईनात. प्रकल्पासाठी जमिनी देऊन त्याग केलेल्या या प्रकल्पग्रस्तांची परवड सुरू आहे. प्रशासनाने यावर तोडगा काढून स्मशानभूमीची वाट मोकळी करून द्यावी, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे.

गमेवाडी येथे उत्तरमांड प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी माथणेवाडी, नाणेगाव बुद्रुक, चाफळ, गमेवाडी येथील अनेक प्रकल्पग्रस्तांनी आपल्या जमिनी देऊन मोठा त्याग केला आहे. या प्रकल्पग्रस्तांच्या त्यागातूनच गमेवाडी येथे उत्तरमांड प्रकल्प उदयास आला आहे. या प्रकल्पामुळे कऱ्हाड व पाटण तालुक्यातील हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येण्यास मदत झाली आहे. या प्रकल्पात बाधित ठरलेल्या माथणेवाडी व नाणेगाव बुद्रुक गावातील प्रकल्पग्रस्तांचे शासनाने माजगावनजीक मूळमालकांच्या जमिनी संपादित करून पुनर्वसन केले आहे.

या पुनर्वसन गावठाणात शासनाने अठरा नागरी सुविधा पुरवल्या आहेत. यात प्रामुख्याने स्मशानभूमी व स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचा समावेश आहे. सध्या या स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची वाट मूळ मालकाने अडवल्याने बिकट बनली आहे. त्यामुळे येथील प्रकल्पग्रस्तांना मरणानंतरही नरक यातना सहन कराव्या लागत आहेत. काही दिवसांपूर्वी येथील मयत व्यक्तिचा मृतदेह घेऊन जाताना मूळ मालकाने रस्ता अडवल्याने तणाव निर्माण झाला होता. ज्या मूळ मालकाने स्मशानभूमीचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्याही जमिनीला या प्रकल्पातील पाणी मिळत आहे. तरीही रस्ता अडवून मूळ मालक दुजाभाव करत असल्याने प्रकल्पग्रस्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाने यावर तोडगा काढून स्मशानभूमीची वाट मोकळी करून द्यावी, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे.

कोट :

काही दिवसांपूर्वी येथील प्रकल्पग्रस्त नितीन गायकवाड यांच्या आजी बाळाबाई गायकवाड यांचे निधन झाले होते. अंत्यसंस्कार करण्यासाठी बाळाबाई यांचा मृतदेह घेऊन जात असताना मूळ मालकाने या रस्त्यावरून जाण्यास मज्जाव केल्याने ग्रामस्थ व नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागला. किमान स्मशानात जाण्यासाठी तरी शासनाने रस्ता द्यावा, अशी मागणी प्रकल्पग्रस्त नितीन गायकवाड यांनी केली आहे.