शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
"मी पहिल्याच रात्री त्याला स्पर्श करू दिला असता, पण..."; सिताराचा दावा, पतीवर गंभीर आरोप
3
इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला निष्फळ, अमेरिकेचा गोपनीय अहवाल फुटल्याने खळबळ, ट्रम्प म्हणाले... 
4
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
5
आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!
6
भारताचा चीनवर पलटवार, दिला झटका; ६ उत्पादनांवर लावलं अँटी डम्पिंग शुल्क, का घेतला निर्णय?
7
अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?
8
युद्धाचा भारताला फटका! १ लाख टन बासमती तांदूळ बंदरात अडकला, २००० कोटींवर टांगती तलवार?
9
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
10
लेट पण थेट! सोनाली कुलकर्णीने फॉलो केला ट्रेंड, 'एक नंबर तुझी कंबर' वर थिरकली
11
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
12
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
13
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
14
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
15
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
16
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
17
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
18
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
19
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
20
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   

स्मशानभूमीची वाट मूळ मालकाने अडवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:26 IST

चाफळ : उत्तरमांड मध्यम प्रकल्पामध्ये बाधित ठरलेल्या माजगाव गावठाणातील माथणेवाडी प्रकल्पग्रस्तांना मरणानंतरही नरक यातना सहन कराव्या लागत आहेत. स्मशानभूमीकडे ...

चाफळ : उत्तरमांड मध्यम प्रकल्पामध्ये बाधित ठरलेल्या माजगाव गावठाणातील माथणेवाडी प्रकल्पग्रस्तांना मरणानंतरही नरक यातना सहन कराव्या लागत आहेत. स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता मूळमालकाने अडवल्याने मयत व्यक्तीवर नातेवाईकांना अंत्यसंस्कार करता येईनात. प्रकल्पासाठी जमिनी देऊन त्याग केलेल्या या प्रकल्पग्रस्तांची परवड सुरू आहे. प्रशासनाने यावर तोडगा काढून स्मशानभूमीची वाट मोकळी करून द्यावी, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे.

गमेवाडी येथे उत्तरमांड प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी माथणेवाडी, नाणेगाव बुद्रुक, चाफळ, गमेवाडी येथील अनेक प्रकल्पग्रस्तांनी आपल्या जमिनी देऊन मोठा त्याग केला आहे. या प्रकल्पग्रस्तांच्या त्यागातूनच गमेवाडी येथे उत्तरमांड प्रकल्प उदयास आला आहे. या प्रकल्पामुळे कऱ्हाड व पाटण तालुक्यातील हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येण्यास मदत झाली आहे. या प्रकल्पात बाधित ठरलेल्या माथणेवाडी व नाणेगाव बुद्रुक गावातील प्रकल्पग्रस्तांचे शासनाने माजगावनजीक मूळमालकांच्या जमिनी संपादित करून पुनर्वसन केले आहे.

या पुनर्वसन गावठाणात शासनाने अठरा नागरी सुविधा पुरवल्या आहेत. यात प्रामुख्याने स्मशानभूमी व स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचा समावेश आहे. सध्या या स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची वाट मूळ मालकाने अडवल्याने बिकट बनली आहे. त्यामुळे येथील प्रकल्पग्रस्तांना मरणानंतरही नरक यातना सहन कराव्या लागत आहेत. काही दिवसांपूर्वी येथील मयत व्यक्तिचा मृतदेह घेऊन जाताना मूळ मालकाने रस्ता अडवल्याने तणाव निर्माण झाला होता. ज्या मूळ मालकाने स्मशानभूमीचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्याही जमिनीला या प्रकल्पातील पाणी मिळत आहे. तरीही रस्ता अडवून मूळ मालक दुजाभाव करत असल्याने प्रकल्पग्रस्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाने यावर तोडगा काढून स्मशानभूमीची वाट मोकळी करून द्यावी, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे.

कोट :

काही दिवसांपूर्वी येथील प्रकल्पग्रस्त नितीन गायकवाड यांच्या आजी बाळाबाई गायकवाड यांचे निधन झाले होते. अंत्यसंस्कार करण्यासाठी बाळाबाई यांचा मृतदेह घेऊन जात असताना मूळ मालकाने या रस्त्यावरून जाण्यास मज्जाव केल्याने ग्रामस्थ व नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागला. किमान स्मशानात जाण्यासाठी तरी शासनाने रस्ता द्यावा, अशी मागणी प्रकल्पग्रस्त नितीन गायकवाड यांनी केली आहे.