शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

आरसीसी डिझायनरने तब्बल ३५ एकर ओसाड माळरानावर केली सेंद्रिय शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 12:08 IST

यशकथा : बामणेवाडी येथील जी.ए. भिलारे यांनी तब्बल ३५ एकर ओसाड माळरानावर सेंद्रिय शेती केली आहे

- दिलीप पाडळे (पाचगणी, जि. सातारा)

ध्येय समोर असेल, तर अशक्य गोष्टीही शक्य होऊन जातात. अशाच प्रकारे व्यवसायाने आरसीसी डिझायनर व जावळी तालुक्यातील बामणेवाडी येथील जी.ए. भिलारे यांनी तब्बल ३५ एकर ओसाड माळरानावर सेंद्रिय शेती केली आहे, तसेच शेतीत वेगवेगळे प्रयोग करून त्यांनी लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. त्यांची ही शेती पाहण्यासाठी जिल्ह्याबरोबरच राज्यातूनही शेतकरी येत आहेत. 

सातारा जिल्ह्यातील बामणेवाडी (वालूथ) येथील कष्टकरी कुटुंबात जी.ए. भिलारे यांचा जन्म झाला. जावळी तालुक्यातील प्रथम सिव्हिल इंजिनिअर होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. पुढील एम.ई. स्ट्रक्चरचे शिक्षण पूर्ण केले. काही काळ नोकरी केल्यानंतर पुण्यासारख्या ठिकाणी १९८८ मध्ये छोट्या कंपनीच्या माध्यमातून व्यवसायास प्रारंभ केला. त्यात स्थिरस्थावर झाल्यावर लहानपणापासून जन्मभूमीतील काळ्या मातीची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे शेतीमध्ये असलेल्या आवडीमुळे काही तरी नवीन करण्याच्या उद्देशाने त्यांची पावले २००७ मध्ये शेतीकडे वळली. वडिलोपार्जित दीड एकर शेती मुरमाड ओसाड माळरावर होती. त्यासोबत त्यांनी काही शेती विकत घेत, तर काही खंडाने घेतली. शेतीतीतल प्रयोग पाहण्यासाठी अभ्यास दौरे केले. शेतीविषयक कृषी प्रदर्शने पाहिली. जिल्ह्यातील शेती अधिकाऱ्यांच्या कार्यशाळा शेतावर आयोजित केल्या व त्याचा फायदाही झाला. 

नवीन शेती खरेदी करीत एकूण ४० एकर माळरानावर नंदनवन फुलविण्याचे ठरविले. रासायनिक खतांचे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेतले. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर टाळत पूर्णत: सेंद्रिय शेतीस प्राधान्य द्यायचे ठरविले. त्यासाठी भौगोलिक परिस्थितीचा खूप फायदा करून घेतला. उंचावर शेततळे असल्यामुळे सायफन पद्धत वापरल्याने पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर करता आला. शेततळ्याची पाणी साठवण क्षमता १ कोटी लिटर आहे, तर आरसीसी स्टोअरेज टॅन्क २० लाख लिटरचा आहे, तसेच शेततळ्यात मत्स्यव्यवसाय करून उत्पादन घेतले जाते.

सेंद्रिय शेतीसाठी गांडूळ खतनिर्मितीचा पर्याय आहे. पालापाचोळा, कचरा, शेण याचा वापर करीत उच्च प्रतीचे गांडूळ खत बेड तयार केले. त्यातून तीन महिन्यांतून एकदा असे ७० ते ८० टन गांडूळ खत तयार होते. हे सर्व याच शेतीसाठी वापरले जाते. गूळ, चना डाळीचे पीठ, शेण, गोमूत्र आणि माती याचा वापर करून जिवामृतची निर्मिती केली जाते. जे नेटाफीन सिस्टीमने पिकांच्या मुळापर्यंत जाते. याला जोड म्हणून देशी गायीचेसुद्धा संगोपन केले असून, त्यांच्यासाठी सेंद्रिय पद्धतीने घेतलेल्या मका, कडबा, ओला चारा हे खाद्य असते, तसेच येथील बायोगॅसमधून निघालेला मलमा पुन्हा गांडूळखत निर्मितीसाठी वापरतात. या शेतीत ऊस, सोयाबीन, हळद, आले, गहू, ज्वारी, बाजरी, मका, सूर्यफूल, भात, पपई, डाळिंब, स्ट्रॉबेरी, शेवगा, बटाटा, भाजीपाला, आंबा, नारळ इ. पिके सेंद्रिय पद्धतीने घेतली जातात. 

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी