शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आरसीसी डिझायनरने तब्बल ३५ एकर ओसाड माळरानावर केली सेंद्रिय शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 12:08 IST

यशकथा : बामणेवाडी येथील जी.ए. भिलारे यांनी तब्बल ३५ एकर ओसाड माळरानावर सेंद्रिय शेती केली आहे

- दिलीप पाडळे (पाचगणी, जि. सातारा)

ध्येय समोर असेल, तर अशक्य गोष्टीही शक्य होऊन जातात. अशाच प्रकारे व्यवसायाने आरसीसी डिझायनर व जावळी तालुक्यातील बामणेवाडी येथील जी.ए. भिलारे यांनी तब्बल ३५ एकर ओसाड माळरानावर सेंद्रिय शेती केली आहे, तसेच शेतीत वेगवेगळे प्रयोग करून त्यांनी लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. त्यांची ही शेती पाहण्यासाठी जिल्ह्याबरोबरच राज्यातूनही शेतकरी येत आहेत. 

सातारा जिल्ह्यातील बामणेवाडी (वालूथ) येथील कष्टकरी कुटुंबात जी.ए. भिलारे यांचा जन्म झाला. जावळी तालुक्यातील प्रथम सिव्हिल इंजिनिअर होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. पुढील एम.ई. स्ट्रक्चरचे शिक्षण पूर्ण केले. काही काळ नोकरी केल्यानंतर पुण्यासारख्या ठिकाणी १९८८ मध्ये छोट्या कंपनीच्या माध्यमातून व्यवसायास प्रारंभ केला. त्यात स्थिरस्थावर झाल्यावर लहानपणापासून जन्मभूमीतील काळ्या मातीची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे शेतीमध्ये असलेल्या आवडीमुळे काही तरी नवीन करण्याच्या उद्देशाने त्यांची पावले २००७ मध्ये शेतीकडे वळली. वडिलोपार्जित दीड एकर शेती मुरमाड ओसाड माळरावर होती. त्यासोबत त्यांनी काही शेती विकत घेत, तर काही खंडाने घेतली. शेतीतीतल प्रयोग पाहण्यासाठी अभ्यास दौरे केले. शेतीविषयक कृषी प्रदर्शने पाहिली. जिल्ह्यातील शेती अधिकाऱ्यांच्या कार्यशाळा शेतावर आयोजित केल्या व त्याचा फायदाही झाला. 

नवीन शेती खरेदी करीत एकूण ४० एकर माळरानावर नंदनवन फुलविण्याचे ठरविले. रासायनिक खतांचे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेतले. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर टाळत पूर्णत: सेंद्रिय शेतीस प्राधान्य द्यायचे ठरविले. त्यासाठी भौगोलिक परिस्थितीचा खूप फायदा करून घेतला. उंचावर शेततळे असल्यामुळे सायफन पद्धत वापरल्याने पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर करता आला. शेततळ्याची पाणी साठवण क्षमता १ कोटी लिटर आहे, तर आरसीसी स्टोअरेज टॅन्क २० लाख लिटरचा आहे, तसेच शेततळ्यात मत्स्यव्यवसाय करून उत्पादन घेतले जाते.

सेंद्रिय शेतीसाठी गांडूळ खतनिर्मितीचा पर्याय आहे. पालापाचोळा, कचरा, शेण याचा वापर करीत उच्च प्रतीचे गांडूळ खत बेड तयार केले. त्यातून तीन महिन्यांतून एकदा असे ७० ते ८० टन गांडूळ खत तयार होते. हे सर्व याच शेतीसाठी वापरले जाते. गूळ, चना डाळीचे पीठ, शेण, गोमूत्र आणि माती याचा वापर करून जिवामृतची निर्मिती केली जाते. जे नेटाफीन सिस्टीमने पिकांच्या मुळापर्यंत जाते. याला जोड म्हणून देशी गायीचेसुद्धा संगोपन केले असून, त्यांच्यासाठी सेंद्रिय पद्धतीने घेतलेल्या मका, कडबा, ओला चारा हे खाद्य असते, तसेच येथील बायोगॅसमधून निघालेला मलमा पुन्हा गांडूळखत निर्मितीसाठी वापरतात. या शेतीत ऊस, सोयाबीन, हळद, आले, गहू, ज्वारी, बाजरी, मका, सूर्यफूल, भात, पपई, डाळिंब, स्ट्रॉबेरी, शेवगा, बटाटा, भाजीपाला, आंबा, नारळ इ. पिके सेंद्रिय पद्धतीने घेतली जातात. 

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी