शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

हरिहरेश्वर बँकेवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:43 IST

सातारा : वाई येथील हरिहरेश्वर बँकेच्या वाई, भुईंज, खंडाळा व वडूज शाखेत ठेवी ठेवलेल्या असंख्य ठेवीदारांची व खातेदारांची कोट्यावधी ...

सातारा : वाई येथील हरिहरेश्वर बँकेच्या वाई, भुईंज, खंडाळा व वडूज शाखेत ठेवी ठेवलेल्या असंख्य ठेवीदारांची व खातेदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाली असल्याचे जिल्हा उपनिबंधकांच्या लेखापरीक्षणावरुन सिध्द झाले असून हरिहरेश्वर बँकेवर व घोटाळ्यास जबाबदार असणाऱ्यांवर पोलीस ठाण्यात गुन्हा करावा असे पत्र विशेष लेखापरीक्षक वर्ग एक यांना दिले आहे.

गेल्या दीड वर्षापासून बँकेच्या ठेवीदारांना त्यांनी बँकेत ठेवलेल्या ठेवीची रक्कम परत मिळत नसल्याने अनेक वेळा बँकेचे अध्य़क्ष व संचालक मंडळाचे उंबरे झिजवले मात्र, बँकेचे ठराविक असलेले संचालक आजतागायत उडवाउडवीची उत्तरे देत होते.

वाईतील हरिहरेश्वर बँकेत झालेल्या धक्कादायक गैरव्यवहाराची चौकशी व्हावी व ठेवीदारांचे पैसे परत मिळावेत यासाठी बँकेचे वाई, भुईंज, खंडाळा व वडूज येथील हजारो ठेवीदारांनी सातारा जिल्हा उपनिबंधकांकडे निवेदनाव्दारे विनंती केली होती.

त्यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर यांनी हरिहरेश्वर बँकेचे लेखापरीक्षण करुन अहवाल मागविला होता. त्यानुसार हरिहरेश्वर बँकेचे लेखापरीक्षण होऊन बँकेचा चाचणी परीक्षण अहवाल व त्याबरोबर विनिर्दिष्ट अहवाल सादर केला आहे. सदर अहवालाचे उपनिबंधकांनी अवलोकन केले असता बँकेच्या आर्थिक निधीचा गैरविनियोग करण्यासाठी बनावट कागदपत्रे व दस्तऐवज करुन एकाने ६१ लोकांच्या नावे व दुसऱ्याने सुमारे ७२ लोकांचे नावे कर्ज काढून सुमारे ३७ कोटी ४० लाखांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधितांनी बँकेच्या आर्थिक निधीचा वापर स्वतःच्या हिताकरिता करुन व अपहार केला असल्याचे निर्दशनास आले आहे.

त्या अनुषंगाने बँकेच्या पैशाचा गैरवापर केलेल्या

बँकेच्या संबंधितांवर महाराष्ट्र संस्था अधिनियम अन्वये गैरव्यवहाराचा माहिती अहवाल दाखल करुन कायद्यातील तरतुदीस अनुसरुन तत्काळ कारवाई करण्यात यावी व त्याबाबतचा अहवाल जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे सादर करावा असे पत्र उपनिबंधक प्रकाश अष्टेकर यांनी विजय सावंत, जिल्हा विशेष लेखापरीक्षक (वर्ग १) सहकारी संस्था सातारा यांना दिले आहे.

कोट

कोणत्याही ठेवीदाराचा पैसा बुडणार नाही

हरिहरेश्वर बँकेचा झालेला गैरव्यवहार पाहता बँकेवर कारवाई होणार आहे. त्यानंतर त्या बँकेच्या व्यवहारासंबंधी सुनावणी होईल,ती झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेने परवाना रद्द केल्यानंतर ९० दिवसात बँकेला ठेवीदारांच्या ठेवी द्याव्या लागतील. या कारणामुळे कोणाचे पैसे बुडणार नाहीत. फक्त वेळेला कोणालाही मिळणार नाहीत. याला एक वर्षाचाही किंवा

त्यापेक्षा जास्तही कालावधी लागू शकतो.

प्रकाश अष्टेकर, जिल्हा उपनिबंधक सातारा