शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

पहिल्याच पावसात पोल खोल.. .. रस्त्याचे खड्डे कसे गोल गोल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 14:02 IST

वाईकरांचा सवाल : ठिकठिकाणचे रस्ते उखडले; वाहनधारक त्रस्त

आॅनलाईन लोकमतवाई (जि. सातारा), दि. २२ : काही दिवसांपासून वाई तालुक्यात पावसाने समाधानकारक सुरुवात केली आहे. चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. परंतु मुसळधार पावसाने तालुक्यातील मुख्य रस्ते पूर्णपणे उखडले असून, सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. पहिल्याच पावसात पोल खोल... रस्त्याचे खड्डे कसे गोल गोल, अशी प्रतिक्रिया नागरिक तसेच वाहनचालकांमधून व्यक्त होत आहे.

महाबळेश्वर, पाचगणी व वाई तालुक्यांतील शेकडो वाड्या-वस्त्यांना जोडणाऱ्या वाई शहराला दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्व प्राप्त झाले आहे. शहरात दररोज हजारो वाहनांची महाबळेश्वर, सातारा पुणेकडे ये-जा सुरू असते. अशा परिस्थितीत पहिल्याच पावसात शहरातील रस्ते खड्डेमय झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

शहरातील रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. कित्येक ठिकाणी पाईपलाईनसाठी रस्त्यात खोदकाम केल्याने त्याठिकाणी खड्डे नव्हे तर स्वयंघोषित गतिरोधक तयार होत आहेत. एकाच पावसाने रस्त्यांची अवस्था दयनीय झाल्याने रस्त्याच्या कामांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे पाहिल्यानंतर ह्यपहिल्याच पावसात पोल खोल... रस्त्याचे खड्डे कसे गोल गोल,ह्ण अशीच प्रतिक्रिया वाहनचालक व नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

कामाचा दर्जा टिकवावा

ठेकेदाराने रस्त्यासाठी अतिशय हीन दजार्चे मटेरीयल वापरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पहिल्याच पावसात रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. तरी बांधकाम विभागाने लोकांच्या जीवाशी खेळ न खेळता रस्त्याच्या कामाचा दर्जा योग्य राहील याची काळजी घ्यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

अपघातांचे प्रमाण वाढले

तालुक्यातील वाई ते पाचगणी, वाई ते सुरूर, वाई ते पाचवड, वाई ते ओझर्डे तसेच पुढे शिरगाव घाटापर्यंत, गंगापुरी ते शेलारवाडी, वाई ते पसरणी, गोळेवाडी, पश्चिम भागातील संपूर्ण रिंगरोड एकाही खड्ड्याविना उरलेला नाही. ही अतिशय गंभीर बाब असून, रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे.

बांधकामकडून दुरुस्तीस प्रारंभ

बांधकाम विभागाने भरपावसात रस्त्याच्या कामाला सुरुवात केल्याने कामाचा दर्जा योग्य राहील की नाही? हाही प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामाचा दर्जा राखण्यासाठी पाऊस उघडण्याची वाट पाहावी, अशी मागणी सुज्ञ नागरिकांमधून होत आहे.