शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

महात्मा फुलेंचे पुरोगामी विचारच समाजाला तारणार : प्रदीप विधाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:36 IST

पुसेगाव : ‘देशातील लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी व विषमता दूर करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डाॅ. ...

पुसेगाव : ‘देशातील लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी व विषमता दूर करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महापुरुषांच्या विचारांची खरी गरज आहे. त्याचबरोबर महात्मा फुलेंचे पुरोगामी विचारच समाजाला तारू शकतात,’ असे प्रतिपादन सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी केले.

कटगुण, ता. खटाव येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सरपंच जयश्री गोरे, उपसरपंच जयदीप गायकवाड, माजी सरपंच उदय कदम, सुधीर गोरे, महेश गायकवाड, मनोज देशमुख आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विधाते म्हणाले, ‘महात्मा फुले यांनी समतेच्या तत्त्वाचा स्वीकार केला. स्त्री-पुरुष समानता, शिक्षणासाठी प्रयत्न केले. तसेच जातिभेद निर्मूलनासाठी जनजागृती केली. महात्मा फुले हे पहिले शिवशाहीर होते. फुले व त्यांच्या सहकाऱ्यांनी पहिल्यांदा शिवजयंती सुरू केली. कुटुंबाला खऱ्या अर्थाने सुशिक्षित करण्यासाठी स्त्री शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हे फुले दांपत्याला समजल्यामुळेच त्यांनी स्त्री शिक्षणाची मूहर्तमेढ रोवली. त्यांचे कार्य समाजासाठी दीपस्तंभासारखे आहे. समाजाचे प्रबोधन व शेतकरी वर्गाची उन्नती हे फुले यांच्या चळवळीचे प्रमुख अंग होते. त्यामुळेच आज त्यांच्या विचारांची समाजाला गरज आहे.

फोटो ओळ :

कटगुण, ता. खटाव येथे जिल्हा महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (छाया : केशव जाधव)