शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

महात्मा फुलेंचे पुरोगामी विचारच समाजाला तारणार : प्रदीप विधाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:36 IST

पुसेगाव : ‘देशातील लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी व विषमता दूर करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डाॅ. ...

पुसेगाव : ‘देशातील लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी व विषमता दूर करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महापुरुषांच्या विचारांची खरी गरज आहे. त्याचबरोबर महात्मा फुलेंचे पुरोगामी विचारच समाजाला तारू शकतात,’ असे प्रतिपादन सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी केले.

कटगुण, ता. खटाव येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सरपंच जयश्री गोरे, उपसरपंच जयदीप गायकवाड, माजी सरपंच उदय कदम, सुधीर गोरे, महेश गायकवाड, मनोज देशमुख आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विधाते म्हणाले, ‘महात्मा फुले यांनी समतेच्या तत्त्वाचा स्वीकार केला. स्त्री-पुरुष समानता, शिक्षणासाठी प्रयत्न केले. तसेच जातिभेद निर्मूलनासाठी जनजागृती केली. महात्मा फुले हे पहिले शिवशाहीर होते. फुले व त्यांच्या सहकाऱ्यांनी पहिल्यांदा शिवजयंती सुरू केली. कुटुंबाला खऱ्या अर्थाने सुशिक्षित करण्यासाठी स्त्री शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हे फुले दांपत्याला समजल्यामुळेच त्यांनी स्त्री शिक्षणाची मूहर्तमेढ रोवली. त्यांचे कार्य समाजासाठी दीपस्तंभासारखे आहे. समाजाचे प्रबोधन व शेतकरी वर्गाची उन्नती हे फुले यांच्या चळवळीचे प्रमुख अंग होते. त्यामुळेच आज त्यांच्या विचारांची समाजाला गरज आहे.

फोटो ओळ :

कटगुण, ता. खटाव येथे जिल्हा महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (छाया : केशव जाधव)