शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
2
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
3
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
4
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
5
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
6
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
7
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
8
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
9
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
10
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
11
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
12
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना
13
Pitru Paksha 2025: पितृपक्षात कसे केले जाते दशमी श्राद्ध? वाचा महत्त्व, मुहूर्त आणि श्राद्धविधी!
14
दुकानं-बस वाहून गेल्या, सगळीकडे पाणीच पाणी! हिमाचलच्या मंडीमध्ये पावसामुळे हाहाकार; ३ जणांचा मृत्यू
15
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
16
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
17
अभिनेत्री हुमा कुरेशीने गुपचूप उरकला साखरपुडा, खाजगी समारंभातील फोटो आला समोर
18
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
19
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
20
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?

पोलिसांनीच हद्द ओलांडली; तक्रार नंतर, आधी हद्द कुठली ती सांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:47 IST

सातारा : खरं तर कुठेही गुन्हा घडल्यानंतर आपल्या सोयीनुसार नागरिक कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रार देऊ शकतात; पण नागरिकांना याउलट ...

सातारा : खरं तर कुठेही गुन्हा घडल्यानंतर आपल्या सोयीनुसार नागरिक कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रार देऊ शकतात; पण नागरिकांना याउलट अनुभव येतो. तक्रार न घेता आधी हद्द कुठली ती सांगा, अशी विचारणा करून तक्रारदाराला इकडे जा तिकडे जा, असा सल्ला पोलीस देतात. त्यामुळे अगोदरच अन्यायातून व्यतीत झालेल्या तक्रारदाराला आणखीनच अन्याय झाल्याची भावना निर्माण होते.

तक्रार नोंदवून घेण्याआधी गुन्हा कोणाच्या हद्दीत घडला याची विचारणा पोलिसांकडून तक्रारदाराला होते. तो गुन्हा दुसऱ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असल्यास तक्रारदाराकडे तिकडे पाठवले जाते. प्रत्यक्षात सीआरपीसी १५४ प्रमाणे तक्रारदार ज्या पोलीस ठाण्यात गेला आहे. तिथेच गुन्हा दाखल करणे बंधनकारक आहे. हद्द दुसऱ्या पोलीस ठाण्याची असल्यास नंतर तो गुन्हा त्या ठाण्याकडे वर्ग करणे अपेक्षित आहे. मात्र, तसे पोलिसांकडून घडत नाही. तक्रारदाराला वेगवेगळे किस्से अनुभवयास येतात. तक्रार दाखल करण्याअगोदरच तक्रारदाराला हतबल केले जाते. त्यामुळे त्याला तत्काळ न्याय मिळेल, या विषयी त्यांच्या मनात शंका उपस्थित होते. वास्तविक कोणत्याही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणे बंधनकारक असले तरी आमचाही विचार होणे गरजेचे असल्याचे पोलिसांचे मत आहे. त्याचे कारण म्हणजे अगोदरच प्रत्येक पोलिसाकडे पंधरा ते वीस गुन्हे असतात. कामाचा ताणही प्रचंड असतो. त्यामुळे तक्रार दाखल करून घेतल्यानंतर त्याचे सोपस्कार पूर्ण करण्यासाठी बराच वेळ लागतो. त्यामुळे पोलीस शक्यतो ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा घडला आहे, त्याच पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगतात.

चाैकट : ही घ्या उदाहरणे...

इथे नव्हे वाईला जा..

गेल्या महिन्यामध्ये एका युवकाला वाईमध्ये घरात डांबून मारहाण करण्यात आली होती. तो युवक महाबळेश्वरचा होता, तर गुन्हा करणारे युवक हे साताऱ्याचे होते. त्यामुळे तो युवक साताऱ्यात तक्रार देण्यासाठी आला. मात्र, त्याला गुन्हा कुठं घडलाय आणि तू कुठे तक्रार देण्यासाठी आला आहेस, असं पोलिसांनी त्याला सुनावलं. इथे नव्हे वाई पोलीस ठाण्यात जा, असाही त्याला सल्ला दिला. त्यानंतर इथून वाई पोलीस ठाण्यात गेला.

चाैकट : दोन दरवाजामुळे हद्दीचा घोळ

साताऱ्यातील शनिवार पेठेतील काही भाग सातारा शहर, तर काही भाग शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. काही दिवसांपूर्वी शनिवार पेठेतील एका घरात चोरी झाली. त्यावेळी संबंधित घर मालक सुरुवातीला शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेला. त्यावेळी त्याला तुमचे घर पुढच्या बाजूला आहे. त्यामुळे तुम्ही शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जा, असा सल्ला त्यांना देण्यात आला तर शाहूपुरी पोलिसांनी तुमचं घर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतं, असं सल्ला दिला. त्यांचं घर लांबीला मोठं होतं. पुढचा रस्ता आणि मागचा रस्ता असे दरवाजे घराला होते. त्यामुळे पोलिसांना गैरसमज झाला. पण नंतर शाहूपुरी पोलिसांनीच तक्रार दाखल करून घेतली.

चाैकट : तक्रार नोंदवलीच नाही..

एका युवकाचा मोबाइल चोरीस गेला. पोलीस ठाण्यात गेल्यानंतर मोबाइल गहाळ झाला, असा उल्लेख केला गेला. संबंधित युवकाला मोबाइल चोरीस गेला, अशी एफआयआर प्रत हवी होती. पण त्याची तक्रार न घेताच त्याचा मोबाइल पोलिसांनी रजिस्टरमध्ये ‘गहाळ’ केला.

चाैकट : तक्रार दाखल करून न घेतल्यास कारवाई

पोलिसांनी तक्रार दाखल करून न घेतल्यास पाेलिसांचे निलंबनही होऊ शकते. सुरुवातीला खातेंतर्गत चाैकशी लावली जाते. या चाैकशीत सत्य समोर आल्यानंतर पोलीस अधीक्षक संबंधित कर्मचाऱ्याला कामामध्ये हयगय, निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवून निलंबितही करू शकतात.