शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिकमुक्त महाबळेश्वरात एकच टोलनाका

By admin | Updated: October 3, 2015 23:09 IST

प्रधान सचिव : पर्यटनविकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी सूचना

महाबळेश्वर : ‘पालिका व विविध पॉइंटवर वन विभागाकडून घेतला जाणारा टोल यांचे एकत्रिकरण करून टोलनाक्यावर होणारी वाहतुकीची कोंडी कमी करणे व महाबळेश्वर हे प्लास्टिकमुक्त करावे, राज्य पर्यटन विकास महामंडळाने तयार केलेल्या पर्यटनाचा विकास आराखड्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी विविध विभागांवर सोपवून त्याची तातडीने अंमलबजावणी करावी,’ असे आदेश वनविभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी दिले. महाबळेश्वर परिसरात असलेल्या विविध वनव्यवस्थापन समित्यांच्या मार्फत विविध पॉइंटच्या सुशोभीकरणाची पाहणी करण्यासाठी वनविभागाचे प्रधान सचिव हे महाबळेश्वर भेटीवर आले होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पर्यटन विकास महामंडळ महसूल विभाग व वनविभाग, पालिका यांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक येथील हिरडा विश्रामगृहावर पार पडली. यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी आदेश दिले. यावेळी मुख्य वनसंरक्षक एम. के. राव, अनिल अंजनकर, नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णिवाल, प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर, माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांच्यासह नगरसेवक व मान्यवर उपस्थित होते. वनविभागाच्या र्मादर्शनाखाली पाच वन व्यवस्थापन समिती काम करीत आहेत. या समित्या येथे भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांकडून उपद्रवशुल्क वसूल करतात. यासाठी पाच ठिकाणी टोलनाके उभारण्यात आले आहेत. या टोलनाक्यावर हंगामात पर्यटकांच्या वाहनांच्या लांबलचक रांगा लागतात व वारंवार वाहतुकीची कोंडी होते. या वाहतुकीच्या कोंडीला आलेले पर्यटक वैतागतात. वेगवेगळ्या पाच ठिकाणी टोल वसूल करण्यापेक्षा एकाच ठिकाणी टोल वसूल करावा, अशी अनेक वर्षे पर्यटकांकडून मागणी होत आहे. यासाठी विविध विभागांच्या बैठका पार पडल्या. परंतु कोणताही निर्णय होऊ शकला नाही. या संदर्भात याबैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावर निर्णय घेण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करून टोल एकत्रिकरणाचा निर्णय घेण्याचे आदेश प्रधान सचिव यांनी बैठकीत दिले व याची अंमलबजावणी १ नोव्हेंबरपासून करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. पर्यटन विकास महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापिका वैशाली चव्हाण यांनी पर्यटनाचा सर्वंकष विकास आराखडा या बठकीत ‘स्लाईड शो’च्या आधारे सादर केला व या आराखड्यात सुचविण्यात आलेल्या उपायांवर चर्चा करण्यात आली. महाबळेश्वर या पर्यटनस्थळावर १७ ते २० हजार पर्यटकांचीच क्षमता आहे. परंतु हंगामात येथे साधारणत: तिप्पट पर्यटक येतात. म्हणून महाबळेश्वर परिसरातील इतर ठिकाणी ही गर्दी वळविण्यात आली पाहिज. पर्यटकांना निवासात व टोलमध्ये सवलती देण्यात याव्यात, कृषी पर्यटन अ‍ॅडव्हेंचर टुरिझमला चालना देण्यात यावी. प्लास्टिक बंदी करून पर्यावरणाचे जतन करण्यात यावे, बॅटरी आॅपरेटेड वाहनांचा वापर करण्यात यावा. आॅर्थरसीट पॉइंटवर बसेसला प्रवेश देण्यात यावा. पिण्याचे पाणी पालिकेने व वनविभागाने उपलब्ध करून द्यावे, असे अनेक उपाय सुचविण्यात आले असून, यासाठी राज्य शासनाने २०० कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा, या निधीच्या आधारे येत्या दहा वर्षांत टप्प्याटप्प्याने या आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येईल, वैशाली चव्हाण यांनी स्पष्ट केले. या बैठकीला नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णिवाल, माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, तहसीलदार अतुल म्हेत्रे, मुख्याधिकारी सचिन पवार, उपवनसंरक्षक ह. ग. धुमाळ, सहायक वनसंरक्षक महादेव मोहिते, तानाजी गायकवाड, महाबळेश्वरचे वनक्षेत्रपाल एस. डी. कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)