शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

अर्धे पीक गेले तरच म्हणे भरपाई

By admin | Updated: March 3, 2015 22:44 IST

अवकाळीचा तडाखा : त्वरीत पंचनामे करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

सातारा : अवकाळी पावसाने होणाऱ्या नुकसानीबाबत शासनाने ठरविलेल्या निकषांमुळे आधीच पिचलेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे. जोराचा पाऊस अन वादळी वाऱ्यात पिकाचे नुकसान झाले तर सरसकट नुकसान भरपाई मिळणार नाही तर शेतातील एकूण पिकाचे पन्नास टक्के नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची शाश्वती आहे.वादळी वाऱ्यासह येणारा अवकाळी पाऊस वारंवार शेतकऱ्यांची दैना उडवून देत आहे. गतवर्षी मे, जुलै, नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात अवकाळी पावसाने असाच हाहाकार माजवून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले होते. आता पुन्हा मार्चच्या तोंडावर अवकाळीने फणा वर काढला आहे. काढणीला आलेला गहू, ज्वारी भुईसपाट झाली आहे. तर शेतात काढून टाकलेली पिकेही मातीमोल झाली आहे. वातावरणात अचानक बदल झाल्याने शेतकऱ्यांनी कोणतीच हालचाल करता आली नाही. त्यामुळे नुकसान जास्त झाले. द्राक्ष बागा, आंबा, डाळिंब या पिकांचेही नुकसान झाले. दरम्यान, शासनाच्या आदेशानुसार केवळ उभ्या पिकालाच नुकसान भरपाई देता येते. शेतकऱ्यांनी कापून ठेवलेल्या पिकांची जबाबदारी संबंधित शेतकऱ्याची असल्याने कापून ठेवलेल्या पिकाच्या नुकसानीची जबाबदारी शासन घेत नाही. त्यातच शेतातील एकूण पिकापैकी ५0 टक्के नुकसान झाले तरच संबंधित शेतकरी मदतीला पात्र ठरतो. या निकषाची पाचर ठोकली गेली असल्याने शेतकऱ्यांची गोची झाली आहे. पिकांचे नुकसान होऊनही शेतकऱ्यांना पंचनाम्यासाठी येणाऱ्या तलाठी, ग्रामसेवक यांच्यापुढे गयावया करावी लागत आहे. हातात पैसा येण्याच्या वेळी हे नुकसान झाले असल्याने शेतकरी रडकुंडीला आले आहेत. नुकसान भरपाई मिळण्याचीही शाश्वती त्यांना राहिलेली नाही. त्यामुळे आपल्याला कोणी वालीच राहिलेला नाही, अशी भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. गतवर्षी पावसाळ्याव्यतिरिक्त तीन महिने अवकाळी पावसाने धुमाकूळ घालून शेतीचे नुकसान केले. शासन दरबारी नुकसान भरपाईचा निधी मागितला गेला असला तरी तो अद्याप एक रुपयाही शेतकऱ्यांना मिळालेला नसताना यावर्षी पुन्हा एकदा अवकाळीने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळविला आहे. अवकाळीत केवळ पंचनाम्यांचा ‘पाऊस’ पडतो. मदत मात्र मिळत नाही, हेच चित्र यंदाही पाहायला मिळत आहे. उन्हाळ्याची चाहूल नुकतीच लागली असताना सलग दोन दिवस अवकाळी पावसाने संपूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले आहे. ज्वारी, गहू, हरभरा या हंगामी पिकांसोबतच आंबा, स्ट्रॉबेरी, डाळिंब, द्राक्षे, पपई या फळ पिकांचे नुकसान झाले. जिल्ह्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणामध्ये फळबाज्या केल्याजातात. (प्रतिनिधी)नुकसानीचे पंचनामे करताना पक्षपातीपणा होणार नाही याची दक्षता घ्यावी. स्थानीक यंत्रणांनी राजकीय प्रभावाखाली अथवा कोणाच्याही दबाखाली पंचनामे करू नयेत. प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करूनच पंचनामे करावेत. पंचनाम्यातून नुकसान वास्तववादी मांडावे. या कामात हलगर्जीपणा केल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल- विजय शिवतारे,पालकमंत्री$$्र्रिअधिवेशनात उठविणार आवाजअवकाळीच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याची सूचना आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत. शेतकरी मेहनतीने पिके घेतात. ही मेहनत कुठल्याही शासकीय निकषामुळे वाया जाऊ नये, अशी आमच्या पक्षाची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांना अवकाळीची नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी विधीमंडळाच्या अधिवेशनात आवाज उठविणार आहे.- शशिकांत शिंदे, आमदारअवकाळी नुकसानीच्या प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार केवळ ८५.४0 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ५0 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. ४ हजार ९४२ हेक्टर क्षेत्रातील नुकसान हे ५0 टक्क्यांपेक्षा कमी आहे. येत्या ५ ते ६ दिवसात संपूर्ण जिल्ह्यातून नुकसानीचा सविस्तर अहवाल आम्हाल प्राप्त होईल. शासनाच्या निकषानुसार ५0 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले तरच आर्थिक मदत देता येते.- जितेंद्र शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी