शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

अर्धे पीक गेले तरच म्हणे भरपाई

By admin | Updated: March 3, 2015 22:44 IST

अवकाळीचा तडाखा : त्वरीत पंचनामे करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

सातारा : अवकाळी पावसाने होणाऱ्या नुकसानीबाबत शासनाने ठरविलेल्या निकषांमुळे आधीच पिचलेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे. जोराचा पाऊस अन वादळी वाऱ्यात पिकाचे नुकसान झाले तर सरसकट नुकसान भरपाई मिळणार नाही तर शेतातील एकूण पिकाचे पन्नास टक्के नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची शाश्वती आहे.वादळी वाऱ्यासह येणारा अवकाळी पाऊस वारंवार शेतकऱ्यांची दैना उडवून देत आहे. गतवर्षी मे, जुलै, नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात अवकाळी पावसाने असाच हाहाकार माजवून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले होते. आता पुन्हा मार्चच्या तोंडावर अवकाळीने फणा वर काढला आहे. काढणीला आलेला गहू, ज्वारी भुईसपाट झाली आहे. तर शेतात काढून टाकलेली पिकेही मातीमोल झाली आहे. वातावरणात अचानक बदल झाल्याने शेतकऱ्यांनी कोणतीच हालचाल करता आली नाही. त्यामुळे नुकसान जास्त झाले. द्राक्ष बागा, आंबा, डाळिंब या पिकांचेही नुकसान झाले. दरम्यान, शासनाच्या आदेशानुसार केवळ उभ्या पिकालाच नुकसान भरपाई देता येते. शेतकऱ्यांनी कापून ठेवलेल्या पिकांची जबाबदारी संबंधित शेतकऱ्याची असल्याने कापून ठेवलेल्या पिकाच्या नुकसानीची जबाबदारी शासन घेत नाही. त्यातच शेतातील एकूण पिकापैकी ५0 टक्के नुकसान झाले तरच संबंधित शेतकरी मदतीला पात्र ठरतो. या निकषाची पाचर ठोकली गेली असल्याने शेतकऱ्यांची गोची झाली आहे. पिकांचे नुकसान होऊनही शेतकऱ्यांना पंचनाम्यासाठी येणाऱ्या तलाठी, ग्रामसेवक यांच्यापुढे गयावया करावी लागत आहे. हातात पैसा येण्याच्या वेळी हे नुकसान झाले असल्याने शेतकरी रडकुंडीला आले आहेत. नुकसान भरपाई मिळण्याचीही शाश्वती त्यांना राहिलेली नाही. त्यामुळे आपल्याला कोणी वालीच राहिलेला नाही, अशी भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. गतवर्षी पावसाळ्याव्यतिरिक्त तीन महिने अवकाळी पावसाने धुमाकूळ घालून शेतीचे नुकसान केले. शासन दरबारी नुकसान भरपाईचा निधी मागितला गेला असला तरी तो अद्याप एक रुपयाही शेतकऱ्यांना मिळालेला नसताना यावर्षी पुन्हा एकदा अवकाळीने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळविला आहे. अवकाळीत केवळ पंचनाम्यांचा ‘पाऊस’ पडतो. मदत मात्र मिळत नाही, हेच चित्र यंदाही पाहायला मिळत आहे. उन्हाळ्याची चाहूल नुकतीच लागली असताना सलग दोन दिवस अवकाळी पावसाने संपूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले आहे. ज्वारी, गहू, हरभरा या हंगामी पिकांसोबतच आंबा, स्ट्रॉबेरी, डाळिंब, द्राक्षे, पपई या फळ पिकांचे नुकसान झाले. जिल्ह्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणामध्ये फळबाज्या केल्याजातात. (प्रतिनिधी)नुकसानीचे पंचनामे करताना पक्षपातीपणा होणार नाही याची दक्षता घ्यावी. स्थानीक यंत्रणांनी राजकीय प्रभावाखाली अथवा कोणाच्याही दबाखाली पंचनामे करू नयेत. प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करूनच पंचनामे करावेत. पंचनाम्यातून नुकसान वास्तववादी मांडावे. या कामात हलगर्जीपणा केल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल- विजय शिवतारे,पालकमंत्री$$्र्रिअधिवेशनात उठविणार आवाजअवकाळीच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याची सूचना आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत. शेतकरी मेहनतीने पिके घेतात. ही मेहनत कुठल्याही शासकीय निकषामुळे वाया जाऊ नये, अशी आमच्या पक्षाची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांना अवकाळीची नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी विधीमंडळाच्या अधिवेशनात आवाज उठविणार आहे.- शशिकांत शिंदे, आमदारअवकाळी नुकसानीच्या प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार केवळ ८५.४0 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ५0 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. ४ हजार ९४२ हेक्टर क्षेत्रातील नुकसान हे ५0 टक्क्यांपेक्षा कमी आहे. येत्या ५ ते ६ दिवसात संपूर्ण जिल्ह्यातून नुकसानीचा सविस्तर अहवाल आम्हाल प्राप्त होईल. शासनाच्या निकषानुसार ५0 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले तरच आर्थिक मदत देता येते.- जितेंद्र शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी