शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अर्धे पीक गेले तरच म्हणे भरपाई

By admin | Updated: March 3, 2015 22:44 IST

अवकाळीचा तडाखा : त्वरीत पंचनामे करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

सातारा : अवकाळी पावसाने होणाऱ्या नुकसानीबाबत शासनाने ठरविलेल्या निकषांमुळे आधीच पिचलेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे. जोराचा पाऊस अन वादळी वाऱ्यात पिकाचे नुकसान झाले तर सरसकट नुकसान भरपाई मिळणार नाही तर शेतातील एकूण पिकाचे पन्नास टक्के नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची शाश्वती आहे.वादळी वाऱ्यासह येणारा अवकाळी पाऊस वारंवार शेतकऱ्यांची दैना उडवून देत आहे. गतवर्षी मे, जुलै, नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात अवकाळी पावसाने असाच हाहाकार माजवून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले होते. आता पुन्हा मार्चच्या तोंडावर अवकाळीने फणा वर काढला आहे. काढणीला आलेला गहू, ज्वारी भुईसपाट झाली आहे. तर शेतात काढून टाकलेली पिकेही मातीमोल झाली आहे. वातावरणात अचानक बदल झाल्याने शेतकऱ्यांनी कोणतीच हालचाल करता आली नाही. त्यामुळे नुकसान जास्त झाले. द्राक्ष बागा, आंबा, डाळिंब या पिकांचेही नुकसान झाले. दरम्यान, शासनाच्या आदेशानुसार केवळ उभ्या पिकालाच नुकसान भरपाई देता येते. शेतकऱ्यांनी कापून ठेवलेल्या पिकांची जबाबदारी संबंधित शेतकऱ्याची असल्याने कापून ठेवलेल्या पिकाच्या नुकसानीची जबाबदारी शासन घेत नाही. त्यातच शेतातील एकूण पिकापैकी ५0 टक्के नुकसान झाले तरच संबंधित शेतकरी मदतीला पात्र ठरतो. या निकषाची पाचर ठोकली गेली असल्याने शेतकऱ्यांची गोची झाली आहे. पिकांचे नुकसान होऊनही शेतकऱ्यांना पंचनाम्यासाठी येणाऱ्या तलाठी, ग्रामसेवक यांच्यापुढे गयावया करावी लागत आहे. हातात पैसा येण्याच्या वेळी हे नुकसान झाले असल्याने शेतकरी रडकुंडीला आले आहेत. नुकसान भरपाई मिळण्याचीही शाश्वती त्यांना राहिलेली नाही. त्यामुळे आपल्याला कोणी वालीच राहिलेला नाही, अशी भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. गतवर्षी पावसाळ्याव्यतिरिक्त तीन महिने अवकाळी पावसाने धुमाकूळ घालून शेतीचे नुकसान केले. शासन दरबारी नुकसान भरपाईचा निधी मागितला गेला असला तरी तो अद्याप एक रुपयाही शेतकऱ्यांना मिळालेला नसताना यावर्षी पुन्हा एकदा अवकाळीने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळविला आहे. अवकाळीत केवळ पंचनाम्यांचा ‘पाऊस’ पडतो. मदत मात्र मिळत नाही, हेच चित्र यंदाही पाहायला मिळत आहे. उन्हाळ्याची चाहूल नुकतीच लागली असताना सलग दोन दिवस अवकाळी पावसाने संपूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले आहे. ज्वारी, गहू, हरभरा या हंगामी पिकांसोबतच आंबा, स्ट्रॉबेरी, डाळिंब, द्राक्षे, पपई या फळ पिकांचे नुकसान झाले. जिल्ह्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणामध्ये फळबाज्या केल्याजातात. (प्रतिनिधी)नुकसानीचे पंचनामे करताना पक्षपातीपणा होणार नाही याची दक्षता घ्यावी. स्थानीक यंत्रणांनी राजकीय प्रभावाखाली अथवा कोणाच्याही दबाखाली पंचनामे करू नयेत. प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करूनच पंचनामे करावेत. पंचनाम्यातून नुकसान वास्तववादी मांडावे. या कामात हलगर्जीपणा केल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल- विजय शिवतारे,पालकमंत्री$$्र्रिअधिवेशनात उठविणार आवाजअवकाळीच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याची सूचना आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत. शेतकरी मेहनतीने पिके घेतात. ही मेहनत कुठल्याही शासकीय निकषामुळे वाया जाऊ नये, अशी आमच्या पक्षाची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांना अवकाळीची नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी विधीमंडळाच्या अधिवेशनात आवाज उठविणार आहे.- शशिकांत शिंदे, आमदारअवकाळी नुकसानीच्या प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार केवळ ८५.४0 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ५0 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. ४ हजार ९४२ हेक्टर क्षेत्रातील नुकसान हे ५0 टक्क्यांपेक्षा कमी आहे. येत्या ५ ते ६ दिवसात संपूर्ण जिल्ह्यातून नुकसानीचा सविस्तर अहवाल आम्हाल प्राप्त होईल. शासनाच्या निकषानुसार ५0 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले तरच आर्थिक मदत देता येते.- जितेंद्र शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी