शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

अर्धे पीक गेले तरच म्हणे भरपाई

By admin | Updated: March 3, 2015 22:44 IST

अवकाळीचा तडाखा : त्वरीत पंचनामे करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

सातारा : अवकाळी पावसाने होणाऱ्या नुकसानीबाबत शासनाने ठरविलेल्या निकषांमुळे आधीच पिचलेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे. जोराचा पाऊस अन वादळी वाऱ्यात पिकाचे नुकसान झाले तर सरसकट नुकसान भरपाई मिळणार नाही तर शेतातील एकूण पिकाचे पन्नास टक्के नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची शाश्वती आहे.वादळी वाऱ्यासह येणारा अवकाळी पाऊस वारंवार शेतकऱ्यांची दैना उडवून देत आहे. गतवर्षी मे, जुलै, नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात अवकाळी पावसाने असाच हाहाकार माजवून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले होते. आता पुन्हा मार्चच्या तोंडावर अवकाळीने फणा वर काढला आहे. काढणीला आलेला गहू, ज्वारी भुईसपाट झाली आहे. तर शेतात काढून टाकलेली पिकेही मातीमोल झाली आहे. वातावरणात अचानक बदल झाल्याने शेतकऱ्यांनी कोणतीच हालचाल करता आली नाही. त्यामुळे नुकसान जास्त झाले. द्राक्ष बागा, आंबा, डाळिंब या पिकांचेही नुकसान झाले. दरम्यान, शासनाच्या आदेशानुसार केवळ उभ्या पिकालाच नुकसान भरपाई देता येते. शेतकऱ्यांनी कापून ठेवलेल्या पिकांची जबाबदारी संबंधित शेतकऱ्याची असल्याने कापून ठेवलेल्या पिकाच्या नुकसानीची जबाबदारी शासन घेत नाही. त्यातच शेतातील एकूण पिकापैकी ५0 टक्के नुकसान झाले तरच संबंधित शेतकरी मदतीला पात्र ठरतो. या निकषाची पाचर ठोकली गेली असल्याने शेतकऱ्यांची गोची झाली आहे. पिकांचे नुकसान होऊनही शेतकऱ्यांना पंचनाम्यासाठी येणाऱ्या तलाठी, ग्रामसेवक यांच्यापुढे गयावया करावी लागत आहे. हातात पैसा येण्याच्या वेळी हे नुकसान झाले असल्याने शेतकरी रडकुंडीला आले आहेत. नुकसान भरपाई मिळण्याचीही शाश्वती त्यांना राहिलेली नाही. त्यामुळे आपल्याला कोणी वालीच राहिलेला नाही, अशी भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. गतवर्षी पावसाळ्याव्यतिरिक्त तीन महिने अवकाळी पावसाने धुमाकूळ घालून शेतीचे नुकसान केले. शासन दरबारी नुकसान भरपाईचा निधी मागितला गेला असला तरी तो अद्याप एक रुपयाही शेतकऱ्यांना मिळालेला नसताना यावर्षी पुन्हा एकदा अवकाळीने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळविला आहे. अवकाळीत केवळ पंचनाम्यांचा ‘पाऊस’ पडतो. मदत मात्र मिळत नाही, हेच चित्र यंदाही पाहायला मिळत आहे. उन्हाळ्याची चाहूल नुकतीच लागली असताना सलग दोन दिवस अवकाळी पावसाने संपूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले आहे. ज्वारी, गहू, हरभरा या हंगामी पिकांसोबतच आंबा, स्ट्रॉबेरी, डाळिंब, द्राक्षे, पपई या फळ पिकांचे नुकसान झाले. जिल्ह्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणामध्ये फळबाज्या केल्याजातात. (प्रतिनिधी)नुकसानीचे पंचनामे करताना पक्षपातीपणा होणार नाही याची दक्षता घ्यावी. स्थानीक यंत्रणांनी राजकीय प्रभावाखाली अथवा कोणाच्याही दबाखाली पंचनामे करू नयेत. प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करूनच पंचनामे करावेत. पंचनाम्यातून नुकसान वास्तववादी मांडावे. या कामात हलगर्जीपणा केल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल- विजय शिवतारे,पालकमंत्री$$्र्रिअधिवेशनात उठविणार आवाजअवकाळीच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याची सूचना आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत. शेतकरी मेहनतीने पिके घेतात. ही मेहनत कुठल्याही शासकीय निकषामुळे वाया जाऊ नये, अशी आमच्या पक्षाची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांना अवकाळीची नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी विधीमंडळाच्या अधिवेशनात आवाज उठविणार आहे.- शशिकांत शिंदे, आमदारअवकाळी नुकसानीच्या प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार केवळ ८५.४0 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ५0 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. ४ हजार ९४२ हेक्टर क्षेत्रातील नुकसान हे ५0 टक्क्यांपेक्षा कमी आहे. येत्या ५ ते ६ दिवसात संपूर्ण जिल्ह्यातून नुकसानीचा सविस्तर अहवाल आम्हाल प्राप्त होईल. शासनाच्या निकषानुसार ५0 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले तरच आर्थिक मदत देता येते.- जितेंद्र शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी