शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

आॅनलाईन सातबारा; मिळेना गावाला..!

By admin | Updated: June 25, 2015 21:32 IST

कऱ्हाड तालुक्यातील चित्र : ७/१२ उताऱ्यांसाठी तलाठी कार्यालयात हेलपाटे, विद्यार्थ्यांची ससेहोलपट, अनेकांची कामे रखडली

प्रमोद सुकरे -कऱ्हाड --हस्तलिखित सातबारा देण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी बंदी आदेश दिल्याने व संगणकीकृत सातबारा बिनचूक मिळत नसल्याने कऱ्हाड तालुक्यातील लोकांची ससेहोलपट सुरू आहे. गावोगावच्या चावडीवर ग्रामस्थ हेलपाटे मारून थकले आहेत. लोकांची कामे थटली आहेत. ‘आॅनलाईन सातबारा नावाला अन् मिळेना कुठल्याच गावाला,’ अशी स्थिती निर्माण झाली असून, या आजारावर नेमका कुठला ‘उतारा’ काढायचा हेच कोणाला समजेनासे झाले आहे.  आघाडीच्या राज्य सरकारने सातबारा उतारे संगणकीकृत करण्याची मोहीम उघडली. कऱ्हाडचे तत्कालीन तहसीलदार सुधारक भोसले यांनी त्यात पुढाकार घेतला. अन् पुणे विभागात कऱ्हाडने पहिला क्रमांकही मिळविला. त्यानंतर आॅनलाईन सातबारा योजनेची घोषणाही झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी १ एप्रिल २०१४ रोजी तालुक्यातील सर्व तलाठ्यांना आता हस्तलिखित सातबारा उतारे देऊ नका, असे लेखी आदेश दिले. त्यामुळे आता आॅनलाईन सातबाऱ्यांमुळे लोकांची सोय होणार याचा आनंद झाला; मात्र गेल्या तीन महिन्यांत आॅनलाईन मिळणारे उतारे बिनचूक मिळत नसल्याचे समोर आले आहे. तर बहुतांश गावात ते आॅनलाईन मिळतच नसल्याचे समोर आले आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता, आॅनलाईन सातबारा योजनेत अजून बऱ्याच त्रुटी आहेत. त्या अद्याप दुरुस्त झालेल्या नाहीत. त्या तातडीने दुरुस्त होणे गरजेचे आहे. त्यासाठी महिनाभराचा अवधी घेऊन ते काम पूर्ण करायला पाहिजे. पण, तोपर्यंत लोकांच्या होणाऱ्या गैरसोयींवर उपाय म्हणून हस्तलिखित उतारे मिळायला पाहिजेत. ही फसवणूक नाही का ? सेतूमधून आॅनलाईन मिळणाऱ्या उताऱ्यांवर हे उतारे कुठल्याही शासकीय कामासाठी चालणार नाहीत, असा इंग्रजीत उल्लेख करण्यात आला आहे. मात्र ग्रामीण भागातील माणसाला त्याचे ज्ञान नसल्याने तो सेतूमधून उतारा घेतोय, त्याचे पैसे मोजतोय; पण त्याचा उपयोग होत नसल्याने त्यांची ही फसवणूकच होत असल्याची चर्चा आहे. नेटसेटर बंदसंगणकीकृत सातबारा शसनातर्फे देण्यासाठी थ्री-जी नेटसेटर देण्यात आले आहेत. मात्र, ते नेटसेटर बंद केल्यामुळे उतारे देणे अवघड झाले आहे. काही सेतूमध्ये हे उतारे उपलब्ध होत असले तरी एका उताऱ्यासाठी किमान अर्ध्या तासाचा विलंब होत आहे. त्यातही त्रुटी आहेत. त्यामुळे हे फायद्याचे की तोट्याचे हेच समजेना झालय! खरेदी-विक्री व्यवहार करायचे तरी कसे ? कऱ्हाड तालुक्यात खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर चालतात. हा व्यवहार करताना तीन महिन्यांच्या आतला सातबारा उतारा लागतो; पण संगणकीकृत उतारा बिनचूक निघेना अन् तलाठी हस्तलिखित उतारा देईना, त्यामुळे अनेक व्यवहार प्रलंबित पडले आहेत.