शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

आॅनलाईन सातबारा; मिळेना गावाला..!

By admin | Updated: June 25, 2015 21:32 IST

कऱ्हाड तालुक्यातील चित्र : ७/१२ उताऱ्यांसाठी तलाठी कार्यालयात हेलपाटे, विद्यार्थ्यांची ससेहोलपट, अनेकांची कामे रखडली

प्रमोद सुकरे -कऱ्हाड --हस्तलिखित सातबारा देण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी बंदी आदेश दिल्याने व संगणकीकृत सातबारा बिनचूक मिळत नसल्याने कऱ्हाड तालुक्यातील लोकांची ससेहोलपट सुरू आहे. गावोगावच्या चावडीवर ग्रामस्थ हेलपाटे मारून थकले आहेत. लोकांची कामे थटली आहेत. ‘आॅनलाईन सातबारा नावाला अन् मिळेना कुठल्याच गावाला,’ अशी स्थिती निर्माण झाली असून, या आजारावर नेमका कुठला ‘उतारा’ काढायचा हेच कोणाला समजेनासे झाले आहे.  आघाडीच्या राज्य सरकारने सातबारा उतारे संगणकीकृत करण्याची मोहीम उघडली. कऱ्हाडचे तत्कालीन तहसीलदार सुधारक भोसले यांनी त्यात पुढाकार घेतला. अन् पुणे विभागात कऱ्हाडने पहिला क्रमांकही मिळविला. त्यानंतर आॅनलाईन सातबारा योजनेची घोषणाही झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी १ एप्रिल २०१४ रोजी तालुक्यातील सर्व तलाठ्यांना आता हस्तलिखित सातबारा उतारे देऊ नका, असे लेखी आदेश दिले. त्यामुळे आता आॅनलाईन सातबाऱ्यांमुळे लोकांची सोय होणार याचा आनंद झाला; मात्र गेल्या तीन महिन्यांत आॅनलाईन मिळणारे उतारे बिनचूक मिळत नसल्याचे समोर आले आहे. तर बहुतांश गावात ते आॅनलाईन मिळतच नसल्याचे समोर आले आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता, आॅनलाईन सातबारा योजनेत अजून बऱ्याच त्रुटी आहेत. त्या अद्याप दुरुस्त झालेल्या नाहीत. त्या तातडीने दुरुस्त होणे गरजेचे आहे. त्यासाठी महिनाभराचा अवधी घेऊन ते काम पूर्ण करायला पाहिजे. पण, तोपर्यंत लोकांच्या होणाऱ्या गैरसोयींवर उपाय म्हणून हस्तलिखित उतारे मिळायला पाहिजेत. ही फसवणूक नाही का ? सेतूमधून आॅनलाईन मिळणाऱ्या उताऱ्यांवर हे उतारे कुठल्याही शासकीय कामासाठी चालणार नाहीत, असा इंग्रजीत उल्लेख करण्यात आला आहे. मात्र ग्रामीण भागातील माणसाला त्याचे ज्ञान नसल्याने तो सेतूमधून उतारा घेतोय, त्याचे पैसे मोजतोय; पण त्याचा उपयोग होत नसल्याने त्यांची ही फसवणूकच होत असल्याची चर्चा आहे. नेटसेटर बंदसंगणकीकृत सातबारा शसनातर्फे देण्यासाठी थ्री-जी नेटसेटर देण्यात आले आहेत. मात्र, ते नेटसेटर बंद केल्यामुळे उतारे देणे अवघड झाले आहे. काही सेतूमध्ये हे उतारे उपलब्ध होत असले तरी एका उताऱ्यासाठी किमान अर्ध्या तासाचा विलंब होत आहे. त्यातही त्रुटी आहेत. त्यामुळे हे फायद्याचे की तोट्याचे हेच समजेना झालय! खरेदी-विक्री व्यवहार करायचे तरी कसे ? कऱ्हाड तालुक्यात खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर चालतात. हा व्यवहार करताना तीन महिन्यांच्या आतला सातबारा उतारा लागतो; पण संगणकीकृत उतारा बिनचूक निघेना अन् तलाठी हस्तलिखित उतारा देईना, त्यामुळे अनेक व्यवहार प्रलंबित पडले आहेत.