शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

मुक्कामी येणारी बस आगारातच थांबली, नोकरदार प्रवाशांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात गेल्यावर्षीपासून सुरू झालेला कोरोनाचा प्रभाव अजूनही कमी झालेला नाही. रुग्णसंख्या वाढत असल्याने जिल्ह्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात गेल्यावर्षीपासून सुरू झालेला कोरोनाचा प्रभाव अजूनही कमी झालेला नाही. रुग्णसंख्या वाढत असल्याने जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालये अजूनही बंद आहेत. त्याचप्रमाणे संचारबंदीचे निर्बंध कायम असल्याने संध्याकाळी एस. टी.ला पुरेसे प्रवासी मिळत नाहीत, त्यामुळे गावोगावच्या मुक्कामी फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे नोकरीनिमित्त शहरात येणाऱ्या प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव गेल्यावर्षी मार्चमध्ये झाला. त्यानंतर संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने सार्वजनिक प्रवासी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला होता. याचा फटका राज्य परिवहन महामंडळाला सर्वाधिक बसला. तेव्हापासून एस. टी. महामंडळाची आर्थिक घरी विस्कटली. ती पूर्ववत आणण्यासाठी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी प्रयत्न करत आहेत. मात्र, अजूनही याचा परिणाम महामंडळाच्या फेऱ्यांवर झाल्याचे दिसून येत आहे. कोरोना रुग्ण तसेच मृत्यूदर वाढतच आहे. तिसरी लाट लवकर येईल, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. यामुळे शासनाने शाळा, महाविद्यालये अजून सुरू केलेली नाहीत. एस. टी.ला ग्रामीण भागातील सर्वाधिक उत्पन्न हे विद्यार्थी पासच्या माध्यमातून मिळते. उत्पन्नाचा हा स्रोत बंद असल्याने एस. टी. महामंडळाने ग्रामीण फेर्‍या कमी करून त्या शहराकडे वळवल्या आहेत.

रुग्णवाढ विचारात घेऊन जिल्हा प्रशासनाने संचारबंदीचे निर्बंध कायम ठेवले आहेत. बाजारपेठा लवकर बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे काही कामानिमित्त ग्रामीण भागातून आलेले ग्रामस्थ लवकर जात असल्याने बसस्थानकांमध्ये रात्रीच्या वेळी शुकशुकाट जाणवतो. त्यामुळे पूर्वीच्या ग्रामीण भागातील मुक्कामी फेऱ्या बंद करण्याची नामुष्की एस. टी. महामंडळावर आली आहे.

चौकट :

८० टक्के बसेस आगारातच

शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांना वेळेत येता यावे, यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक आगारातून ग्रामीण भागांमध्ये मुक्कामी गाड्या सोडल्या जात होत्या. ही संख्या कोरोनाचा संसर्ग होण्यापूर्वी अडीचशेच्या घरात होती.

कोरोनामुळे बदलती स्थिती लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाने काही दिवसांपासून मुक्कामी गाड्या सुरू केल्या आहेत. मात्र, पुरेसे प्रवासी मिळत नसल्याने रिकाम्या गाड्या चालविणे परवडत नाही. त्यामुळे त्या कमी करून सध्या केवळ ८२ फेऱ्या सुरू आहेत.

सध्या सुरू असलेल्या मुक्कामी फेऱ्या प्रामुख्याने राज्यातील मोठ्या शहरांमध्ये जास्त आहेत. तुलनेत ग्रामीण भागात अजूनही ही संख्या रोडावलेलीच आहे.

चौकट

रुग्ण घटले एस. टी. कधी सुरू होणार

मुक्कामी बस सुरू करण्यामध्ये कोरोनामुळे अडचणी येत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, आता रुग्णसंख्या घटत आहे, त्यामुळे एस. टी. कधी सुरू होणार, हे प्रशासनाने सांगण्याची गरज आहे.

- शुभम शहापुरे, सातारा.

नोकरीच्या निमित्ताने अनेकांना दररोज सकाळी नऊपर्यंत ग्रामीण भागातून साताऱ्याला पोहोचायचे असते. मात्र, मुक्कामी गाड्या सुरू नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे.

- प्रफुल विभुते, सातारा.

चौकट

आगारनिहाय मुक्कामी गाड्या

आगार सध्या कोरोनापूर्वी

सातारा ५ २८

कऱ्हाड ५ ३१

महाबळेश्वर ५ ३०

खंडाळा ५ १७

वडूज ५ १९

कोरेगाव ४ २४

पाटण ४ २२

दहिवडी ४ १८

वाई ३ १४

फलटण २ ३५

मेढा ० १२