शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
4
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
5
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
6
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
7
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
8
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
9
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
10
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
11
Mumbai Rains: मुंबईत अतिवृष्टीचा धोका; पालकमंत्री लोढांकडून आपत्ती विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश
12
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
13
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
14
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
15
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
16
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
17
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
18
अनोखा विक्रम! फक्त एका दिवसात १८ लाखांहून अधिक महिलांचा बसमधून मोफत प्रवास
19
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
20
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?

जुनेच पैलवान की नव्या खेळाडूंना संधी?

By admin | Updated: September 21, 2015 23:46 IST

आज फैसला : कऱ्हाड बाजार समितीच्या सभापती, उपसभापतिपदाच्या निवडीकडे लक्ष

प्रमोद सुकरे - कऱ्हाड --महाआघाडीने हिसकावून घेतलेली शेती उत्पन्न बाजार समिती माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकरांनी पुन्हा एकदा ताब्यात घेतलीच. त्याच्या सभापती, उपसभापतिपदाची निवड मंगळवार, दि. २२ रोजी होत आहे. त्यात नव्या-जुन्यांचा आणि कऱ्हाड उत्तर दक्षिणचा मेळ घालत उंडाळकर जुन्याच पैलवानांना संधी देणार की, नव्या खेळाडूंना, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. सहा वर्षांपूर्वी तालुक्याच्या राजकारणात कऱ्हाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली उंडाळकर विरोधी महाआघाडी अस्तित्वात आली. त्यात ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, आनंदराव पाटील, डॉ. अतुल भोसले, जगदीश जगताप, दिवंगत महाराष्ट्र केसरी संजय पाटील आदींनी महत्त्वाची भूमीका बजावत उंडाळकरांच्या बाजार समितीतील ३७ वर्षांच्या सत्तेला सुरूंग लावला. हे ऐतिहासिक सत्तांतर झाले. गेल्या सहा वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. तालुक्याच्या राजकीय पटलावर बरेच बदल झाले. विधानसभा निवडणुकीनंतर पराभूत झालेले उंडाळकर व भोसले गट अचानकपणे एकत्रित आले हा त्यातीलच एक महत्त्वाचा बदल. या मैत्रिपर्वाने जिल्हा मध्यवर्ती बँक, कृष्णा कारखाना आणि बाजार समिती निवडणुकीतही यश मिळविले. उंडाळकरांना डॉ. अतुल भोसलेंसह उत्तरचे युवा नेते धैर्यशिल कदम, शेतकरी संघटनेचे नेते मनोज घोरपडे यांचीही मोलाची साथ लाभली हे निश्चित. त्यामुळे सभापती उपसभापती निवडीत सत्तेचा समतोल कसा राखला जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सभापती पदासाठी सध्या उंडाळकर गटाचे कऱ्हाड दक्षिणमधील निष्ठावंत पाईक पैलवान शिवाजीराव जाधव, उत्तरेतील हिंदूराव चव्हाण व अशोक पाटील यांची नावे चर्चेत आहेत.याशिवाय उपसभापतिपदासाठी मोहनराव माने यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे सभापती, उपसभापती पदाची लॉटरी नेमकी कोणाला लागणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. गोपनीय बैठकीबाबत नेत्यांची चुप्पी..!सभापती, उपसभापतिपदी नेमकी कोणाची वर्णी लावायची याबाबत अनेक तर्क-वितर्क लढविले जात असले तरी सोमवारी दुपारी एका गोपनिय ठिकाणी विजयामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या काही प्रमुख नेतेमंडळींची एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. मात्र बैठकीत नेमके काय ठरले याबाबत कोणीही काही सांगायला तयार नाही. उत्तर-दक्षिणला अडीच-अडीच वर्षांची संधी शक्य !सभापती उपसभापती पदासाठी इच्छूकांची असणारी गर्दी तसेच दक्षिण-उत्तरचा व नव्या-जुन्यांचा मेळ घालताना नेत्यांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे अडीच-अडीच वर्षांच्या दोन टप्पे करून चार जणांना संधी द्यावी. म्हणजे कऱ्हाड उत्तर आणि दक्षिण मधील एका-एकाला सभापती उपसभापती पदाची संधी मिळेल. असाही एक विचार बैठकीत पुढे आल्याचे समजते.