शहरं
Join us  
Trending Stories
1
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अफगाणिस्तानेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
3
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
4
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
5
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
6
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
7
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
8
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
9
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे आठ जवान जखमी
11
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
12
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
13
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
14
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
15
Weather Update : वेळेआधीच मान्सून धडकणार! कधी सुरू होणार पाऊस?हवामान विभागाने सांगितली तारीख
16
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
17
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
18
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
19
Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या
20
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था

जुनेच पैलवान की नव्या खेळाडूंना संधी?

By admin | Updated: September 21, 2015 23:46 IST

आज फैसला : कऱ्हाड बाजार समितीच्या सभापती, उपसभापतिपदाच्या निवडीकडे लक्ष

प्रमोद सुकरे - कऱ्हाड --महाआघाडीने हिसकावून घेतलेली शेती उत्पन्न बाजार समिती माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकरांनी पुन्हा एकदा ताब्यात घेतलीच. त्याच्या सभापती, उपसभापतिपदाची निवड मंगळवार, दि. २२ रोजी होत आहे. त्यात नव्या-जुन्यांचा आणि कऱ्हाड उत्तर दक्षिणचा मेळ घालत उंडाळकर जुन्याच पैलवानांना संधी देणार की, नव्या खेळाडूंना, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. सहा वर्षांपूर्वी तालुक्याच्या राजकारणात कऱ्हाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली उंडाळकर विरोधी महाआघाडी अस्तित्वात आली. त्यात ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, आनंदराव पाटील, डॉ. अतुल भोसले, जगदीश जगताप, दिवंगत महाराष्ट्र केसरी संजय पाटील आदींनी महत्त्वाची भूमीका बजावत उंडाळकरांच्या बाजार समितीतील ३७ वर्षांच्या सत्तेला सुरूंग लावला. हे ऐतिहासिक सत्तांतर झाले. गेल्या सहा वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. तालुक्याच्या राजकीय पटलावर बरेच बदल झाले. विधानसभा निवडणुकीनंतर पराभूत झालेले उंडाळकर व भोसले गट अचानकपणे एकत्रित आले हा त्यातीलच एक महत्त्वाचा बदल. या मैत्रिपर्वाने जिल्हा मध्यवर्ती बँक, कृष्णा कारखाना आणि बाजार समिती निवडणुकीतही यश मिळविले. उंडाळकरांना डॉ. अतुल भोसलेंसह उत्तरचे युवा नेते धैर्यशिल कदम, शेतकरी संघटनेचे नेते मनोज घोरपडे यांचीही मोलाची साथ लाभली हे निश्चित. त्यामुळे सभापती उपसभापती निवडीत सत्तेचा समतोल कसा राखला जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सभापती पदासाठी सध्या उंडाळकर गटाचे कऱ्हाड दक्षिणमधील निष्ठावंत पाईक पैलवान शिवाजीराव जाधव, उत्तरेतील हिंदूराव चव्हाण व अशोक पाटील यांची नावे चर्चेत आहेत.याशिवाय उपसभापतिपदासाठी मोहनराव माने यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे सभापती, उपसभापती पदाची लॉटरी नेमकी कोणाला लागणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. गोपनीय बैठकीबाबत नेत्यांची चुप्पी..!सभापती, उपसभापतिपदी नेमकी कोणाची वर्णी लावायची याबाबत अनेक तर्क-वितर्क लढविले जात असले तरी सोमवारी दुपारी एका गोपनिय ठिकाणी विजयामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या काही प्रमुख नेतेमंडळींची एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. मात्र बैठकीत नेमके काय ठरले याबाबत कोणीही काही सांगायला तयार नाही. उत्तर-दक्षिणला अडीच-अडीच वर्षांची संधी शक्य !सभापती उपसभापती पदासाठी इच्छूकांची असणारी गर्दी तसेच दक्षिण-उत्तरचा व नव्या-जुन्यांचा मेळ घालताना नेत्यांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे अडीच-अडीच वर्षांच्या दोन टप्पे करून चार जणांना संधी द्यावी. म्हणजे कऱ्हाड उत्तर आणि दक्षिण मधील एका-एकाला सभापती उपसभापती पदाची संधी मिळेल. असाही एक विचार बैठकीत पुढे आल्याचे समजते.