शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मलकापुरात घेतली ‘हरित शहर’ची शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:31 IST

राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाकडून राज्यातील ६६७ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २ ऑक्टोबर २०२० ते ३१ मार्च २०२१ या सहा महिन्यांच्या ...

राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाकडून राज्यातील ६६७ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २ ऑक्टोबर २०२० ते ३१ मार्च २०२१ या सहा महिन्यांच्या काळात ‘माझी वसुंधरा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात पृथ्वी, वायु, जल, अग्नी व आकाश या पंचतत्वाच्या संवर्धनासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. नैसर्गिक जीवनपद्धतीचा अवलंब करून पर्यावरणाचे व निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रयत्न करावा, म्हणून या अभियानात पालिका विविध उपक्रम राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून १ जानेवारीला पालिकेची लक्ष्मीनगर बहुउद्देशीय इमारत, घनकचरा प्रकल्प युनिट १ व २, झेडपी कॉलनी आगाशिवनगर, पाणीपुरवठा विभाग, प्रायमुव्ह इन्फ्रास्ट्रक्चर अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट कार्यालय या सात ठिकाणी एकाचवेळी अक्षयऊर्जा स्त्रोत प्रोत्साहनासह हरित शहराची शपथ घेण्यात आली.

यावेळी पालिकेचे सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी वसुंधरा संवर्धनासाठी वृक्षलागवड, संगोपन, सौरऊर्जेचा वापर करून प्रदूषण मुक्त शहराचा निर्धार केला. यावेळी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी नवीन वर्षात नागरिकांच्या हिताचे उपक्रम यशस्विपणे राबविण्यासाठी सदैव सतर्क राहण्याचे कर्मचाऱ्यांना आवाहन केले. मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर यांनी प्रशासन व नागरिकांच्या सहकार्यातून उत्कृष्ट पद्धतीने काम करण्याच्या सूचना दिल्या.

सभापती राजेंद्र यादव, प्रशांत चांदे, शकुंतला शिंगण, स्वाती तुपे, नगरसेविका आनंदी शिंदे, नंदा भोसले, गीतांजली पाटील, अलका जगदाळे, कमल कुराडे, भारती पाटील, पूजा चव्हाण, माधुरी पवार, नूरजहान मुल्ला, नगरसेवक कृष्णत येडगे, सागर जाधव, आनंदराव सुतार, धन्वंतरी साळुंखे, नोडल अधिकारी मनिषा फडतरे यांच्यासह सर्व विभागप्रमुख, स्वच्छ सर्वेक्षण शहर समन्वयक उपस्थित होते.

- कोट

नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अभियानात लोकसहभागातून नागरिकांच्या हितासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा निर्धार केला आहे. यासाठी पालिकेच्या पदाधिकाऱ्यांसह कर्मचारी व नागरिकांनी एकजुटीने काम करावे.

नीलम येडगे, नगराध्यक्षा

फोटो : ०३केआरडी०२

कॅप्शन : मलकापूर (ता. कऱ्हाड) येथे माझी वसुंधरा अभियानांतर्गत हरित शहराची शपथ घेण्यात आली.