शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

मोकळ्या शिवारात आता मेंढ्यांची गर्दी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:34 IST

खटाव : ग्रामीण भागात सध्या शेतातील सुगी संपून शेतकरी आता थोडा निवांत झाला आहे, तर मोकळ्या झालेल्या शेतात मेंढरे ...

खटाव : ग्रामीण भागात सध्या शेतातील सुगी संपून शेतकरी आता थोडा निवांत झाला आहे, तर मोकळ्या झालेल्या शेतात मेंढरे बसवून शेतकरी शेतीस पूरक व उपयुक्त खत कसे उपलब्ध होईल, याच्या गडबडीत आहे.

शेळी, मेंढीपालन व्यवसाय हा शेतीला पूरक व्यवसाय म्हणून किफायतशीर व उपयुक्त ठरलेला आहे.

खटावमध्ये गावातल्या गावात सध्या असे मेंढपाळ लोकांना शेतकऱ्यांकडून बोलावून घेऊन शेतात मेंढ्या बसवण्याकरिता त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना बसवून घेतले जात आहे.

खटावमध्ये सुनील पाटोळे, संपत पाटोळे, आबा पाटोळे, पोपट चव्हाण, विठ्ठल बुधावले या पाच जणांच्या मिळून एकूण ४०० मेंढ्या आहेत. यामध्ये २० शेळ्यादेखील आहेत. सुगी संपल्यानंतर ज्या शेतात मेंढरे बसवायची आहेत. त्या शेतकऱ्यांकडून जेवढे क्षेत्र असेल त्यानुसार एका रात्रीला ३५ किलो बाजरी याप्रमाणे किती रात्री मेंढ्या बसवायचे. त्यानुसार शेतकऱ्यांकडून या मेंढपाळ लोकांना दिले जाते.

हा व्यवसाय अत्यंत कष्टमय असून, हे मेंढपाळ ऊन, वारा, पाऊस, याचा विचार न करता तसेच सर्व सोयी न उपभोगता दिवस-रात्र मेंढ्यांच्या कळपात राहून हा व्यवसाय करतात. नेटच्या जाळीत बंदिस्त करूनही साथीच्या आजाराबरोबरच रात्रीच्या वेळी जंगली श्वापदे, कुत्री यांचीदेखील भीती असतेच. या सर्वांवर मात करत मेंढपाळ हा शेती पूरक व्यवसाय करत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

वार्षिक दीड-दोन लाख उत्पन्न मिळत असले तरी कळपात मरझड ही होतच असते, तो तोटा सहन करावा लागतो. तसेच याकरिता संपूर्ण कुटुंबातील सदस्यांसह रानोमाळ तसेच शिवारात भटकावे लागते.

(कोट)

मेंढ्या जास्त असल्यामुळे आजारी पडल्या तर आम्ही सुरुवातीला डॉक्टर बोलावत होतो. परंतु जास्त मेंढ्या असल्यामुळे प्रत्येकवेळी डॉक्टर परवडत नाही. त्यामुळे स्वतःच डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार इंजेक्शन व औषध उपचार करण्याचे काम करतो. शेतात मेंढरे बसवण्याकरिता एका रात्रीसाठी ३५ किलो बाजरी किंवा ज्वारी शेतकऱ्याकडून घेतली जाते.

- संपत पाटोळे, मेंढपाळ खटाव

१४खटाव

कॅप्शन : सुगी संपल्यामुळे आता शेतात पारंपरिक पद्धतीने लेंडी खताकरिता शेळ्या व मेंढ्या बसवण्यास प्रारंभ झाला आहे.