शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आता महिनाभर परीक्षेचं ओझं..!

By admin | Updated: February 23, 2015 00:22 IST

बारावीची परीक्षा सुरू : जिल्ह्यात ४२ केंद्रे ; यावर्षीपासून दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका

सातारा : शालेय जीवनातील दहावी आणि बारावीचे वर्ष महत्त्वपूर्ण असते. बारावीनंतर पुढे काय करायचे ते ठरविले जाते. अशा महत्त्वपूर्ण असणाऱ्या बारावीच्या वार्षिक परीक्षेला शनिवारपासून प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यातील सुमारे ३८ हजार विद्यार्थी ४२ केंद्रांतून ही परीक्षा देत आहेत. तर यावर्षीपासून प्रथमच विद्यार्थ्यांना दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका देण्यात येत आहे. दरम्यान, ही परीक्षा दि. २६ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. तोपर्यंत अभ्यासाचं ओझं विद्यार्थ्यांवर असणार आहे. शालेय जीवनात दहावी आणि बारावीचे वर्ष महत्त्वाचे असते. या दोन्हीही परीक्षा बोर्डामार्फत घेण्यात येतात. या परीक्षेतील यशावरच पुढील शिक्षण अवलंबून असते. विशेष करून बारावीला अधिक महत्त्व आहे. बारावीनंतर डीएड करायचे की कॉलेज, का इंजिनिअरिंग, मेडिकलला जायचे हे गुण आणि इच्छेनुसार ठरविले जाते. त्यामुळे बारावीच्या परीक्षेच्या अभ्यासाचं ओझं विद्यार्थ्यांवर असतं तसेच पालकांनाही त्याची काळजी असते. शनिवारपासून राज्यभरात बारावीची वार्षिक परीक्षा सुरू झाली आहे. सातारा जिल्ह्यातील सुमारे ३८ हजार परीक्षार्थी आहेत. विविध ४२ केंद्रांतून ते परीक्षा देत आहेत. ही परीक्षा सुमारे एक महिना चालणार आहे. दि. २६ मार्चला बारावीचा शेवटचा पेपर असणार आहे. जिल्ह्यातील बारावीची परीक्षा सुरळीत व्हावी, यासाठी सहा भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. यामध्ये माध्यमिक, प्राथमिक, निरंतर शिक्षण विभाग तसेच महिलांचेही एक विशेष भरारी पथक असणार आहे. यावर्षी प्रथमच परीक्षा सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका देण्यात येत आहे. कारण, विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेचे आकलन व्हावे, प्रश्न समजून घेता यावेत, हा उद्देश आहे. जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रावर अखंडित वीजपुरवठा ठेवण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणची वीज गेल्यास जनरेटरची सोयही करण्यात आलेली आहे, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी) दहावीची परीक्षा दि. ३ मार्च पासून...बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. ती दि. २६ मार्चपर्यंत चालणार आहे. त्याचबरोबर दहावीची वार्षिक परीक्षा ही दि. ३ मार्चपासून सुरू होत आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील सुमारे ४२ हजार विद्यार्थी बसलेले आहेत. विविध १०९ केंद्रांतून दहावीची परीक्षा होत आहे. दहावीच्या परीक्षेसाठीही भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. सातारा जिल्ह्यातील ३८ हजार विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले आहेत. शनिवारपासून परीक्षा सुरळीतपणे सुरू झालेली आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. पहिल्या पेपरला कोठेही अडचण आलेली नाही.- देविदास कुलाळ, शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग