शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

किसन वीर, खंडाळा कारखान्यांना मालमत्ता जप्तीची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:42 IST

सातारा : किसन वीर सहकारी साखर कारखाना भुईंज व किसन वीर खंडाळा साखर कारखाना यांनी मार्च २०२१ पर्यंतची एफआरपी ...

सातारा : किसन वीर सहकारी साखर कारखाना भुईंज व किसन वीर खंडाळा साखर कारखाना यांनी मार्च २०२१ पर्यंतची एफआरपी थकवल्याने साखर आयुक्तांनी या कारखान्याला आरआरसीची (जप्ती) नोटीस बजावली आहे.

भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याने ४ कोटी ९० लाख ४५ हजार रुपयांची एफआरपी थकवली आहे तर खंडाळा कारखान्याने ७६ कोटी १८ लाख ७० हजार रुपयांची एफआरपी थकवली आहे. याबाबत साखर आयुक्तांनी दोन्ही कारखान्यांच्या मालमत्ता जप्तीची नोटीस बजावली आहे. ही नोटीस जिल्हाधिकाऱ्यांनादेखील पाठविण्यात आलेली आहे. कारखान्याची मालमत्ता जप्त करून शेतकऱ्यांची थकीत देणी भागविण्यात यावी, असे या नोटिसीत म्हटले.

एफआरपी थकवल्याप्रकरणी साखर आयुक्तांनी राज्यातील १९ साखर कारखान्यांना नोटीस बजावली आहे, त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील या दोन्ही कारखान्यांचा समावेश आहे.

दरम्यान, या दोन्ही कारखान्यांपुढील आर्थिक अडचणीमध्ये मोठी वाढ झालेली आहे. खंडाळा साखर कारखान्याने एकूण ६७ कोटी ६६ लाख ३७ हजार ८१९ रुपयांचे थकीत कर्ज भरले नसल्याने बँक ऑफ इंडियाच्या कोल्हापूर शाखेने या कारखान्याची स्थावर मालमत्ता जप्त करण्याची नोटीस नुकतीच प्रसिद्ध केली होती. तर कारखान्याच्या उपाध्यक्ष यांनीच माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे कारखाना वाचण्यासाठी साकडे घातले होते. आता शेतकऱ्यांची थकीत देणी आणि बँकेचे थकीत कर्ज कारखाना कशा पद्धतीने भरणार, हा मोठा प्रश्न आहे. या कारखान्यावरील कारवाईबाबत संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

खंडाळा, वाई, जावली, कोरेगाव, सातारा आणि महाबळेश्वर या तालुक्यातील सभासद शेतकऱ्यांपुढे मोठे प्रश्न उपस्थित राहिले आहेत. आगामी काळात कारखाना कसा वाचणार, त्यासाठी कोणतीही उपाययोजना केली जाणार, याकडे लक्ष लागले आहे.