शहरं
Join us  
Trending Stories
1
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अफगाणिस्तानेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
3
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
4
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
5
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
6
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
7
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
8
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
9
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे आठ जवान जखमी
11
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
12
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
13
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
14
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
15
Weather Update : वेळेआधीच मान्सून धडकणार! कधी सुरू होणार पाऊस?हवामान विभागाने सांगितली तारीख
16
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
17
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
18
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
19
Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या
20
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था

किसन वीर, खंडाळा कारखान्यांना मालमत्ता जप्तीची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:42 IST

सातारा : किसन वीर सहकारी साखर कारखाना भुईंज व किसन वीर खंडाळा साखर कारखाना यांनी मार्च २०२१ पर्यंतची एफआरपी ...

सातारा : किसन वीर सहकारी साखर कारखाना भुईंज व किसन वीर खंडाळा साखर कारखाना यांनी मार्च २०२१ पर्यंतची एफआरपी थकवल्याने साखर आयुक्तांनी या कारखान्याला आरआरसीची (जप्ती) नोटीस बजावली आहे.

भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याने ४ कोटी ९० लाख ४५ हजार रुपयांची एफआरपी थकवली आहे तर खंडाळा कारखान्याने ७६ कोटी १८ लाख ७० हजार रुपयांची एफआरपी थकवली आहे. याबाबत साखर आयुक्तांनी दोन्ही कारखान्यांच्या मालमत्ता जप्तीची नोटीस बजावली आहे. ही नोटीस जिल्हाधिकाऱ्यांनादेखील पाठविण्यात आलेली आहे. कारखान्याची मालमत्ता जप्त करून शेतकऱ्यांची थकीत देणी भागविण्यात यावी, असे या नोटिसीत म्हटले.

एफआरपी थकवल्याप्रकरणी साखर आयुक्तांनी राज्यातील १९ साखर कारखान्यांना नोटीस बजावली आहे, त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील या दोन्ही कारखान्यांचा समावेश आहे.

दरम्यान, या दोन्ही कारखान्यांपुढील आर्थिक अडचणीमध्ये मोठी वाढ झालेली आहे. खंडाळा साखर कारखान्याने एकूण ६७ कोटी ६६ लाख ३७ हजार ८१९ रुपयांचे थकीत कर्ज भरले नसल्याने बँक ऑफ इंडियाच्या कोल्हापूर शाखेने या कारखान्याची स्थावर मालमत्ता जप्त करण्याची नोटीस नुकतीच प्रसिद्ध केली होती. तर कारखान्याच्या उपाध्यक्ष यांनीच माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे कारखाना वाचण्यासाठी साकडे घातले होते. आता शेतकऱ्यांची थकीत देणी आणि बँकेचे थकीत कर्ज कारखाना कशा पद्धतीने भरणार, हा मोठा प्रश्न आहे. या कारखान्यावरील कारवाईबाबत संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

खंडाळा, वाई, जावली, कोरेगाव, सातारा आणि महाबळेश्वर या तालुक्यातील सभासद शेतकऱ्यांपुढे मोठे प्रश्न उपस्थित राहिले आहेत. आगामी काळात कारखाना कसा वाचणार, त्यासाठी कोणतीही उपाययोजना केली जाणार, याकडे लक्ष लागले आहे.