शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

जीव लावणारे नव्हे..तिरस्कार करणारेच अधिक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:25 IST

सातारा जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांच्या उच्छांदाच्या अनेक भयभीत करणाऱ्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे या कुत्र्यांना फारसे कोणी दया दाखवत ...

सातारा जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांच्या उच्छांदाच्या अनेक भयभीत करणाऱ्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे या कुत्र्यांना फारसे कोणी दया दाखवत नाही. दूरवरून येणारे कुत्रे दिसले तरी अनेकजण आपला रस्ता बदलतात. इतकी दशहत या भटक्या कुत्र्यांची जनमानसात आहे. गत दोन वर्षांपूर्वी कोडोली येथे एका भटक्या कुत्र्याने सात वर्षाच्या मुलाचे अक्षरश: लचके तोडले होते. यातच त्या मुलाचा जीव गेला. त्यामुळे सातारकरांच्या मनात या भटक्या कुत्र्यांविषयी चीड निर्माण झाली. ही घटना सातारकरांच्या विस्मृतीतून जात असतानाच गत पाच महिन्यांपूर्वी सातारा शहराजवळ असलेल्या जकातवाडी येथे भटक्या कुत्र्याने एक युवती आणि युवकावर हल्ला केला. यात जखमी झालेल्या दोघा युवक युवतीचा महिनाभराच्या उपचारानंतर मृत्यू झाला. या दोघांच्या मृत्युनंतरचा मानसिक धक्का सातारकरांच्या मनात खोलवर रुजलाय. त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या दहशतीखाली सातारकर आजही वावरत आहेत.

या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी अनेकदा नागरिकांकडून केली जाते. मात्र, पुढे त्याचे काहीच होत नाही. अशाप्रकारे एखाद्याचा जीव गेल्यानंतरच भटक्या कुत्र्यांचा मुद्दा पुन्हा उफाळून येतो. तसं पाहिलं तर या भटक्या कुत्र्यांना वेळेवर अन्न मिळत नाही. त्यामुळे कुत्रे अन्नाच्या शोधात अन्यत्र भटकत असतात. विशेषत: कचरा डेपोमध्ये ही कुत्री पाहायला मिळतात. या ठिकाणी अनेक प्रकारचे शिळे अन्न टाकले जाते. हे अन्न काहीवेळेस कुजून त्याचे विषही तयार होते. अशावेळी मग या भटक्या कुत्र्यांनी हे कुजलेले पदार्थ खाल्ल्यास त्यांचे मानसिक संतुलन बिघडते. परिणामी सैरभर होऊन माणसांचा चावा घेतात, असे प्राणिमित्रांचे म्हणणे आहे.

चौकट :

पावसाळ्यात होतात पोटाचे हाल

घरातील शिल्लक राहिलेलं अन्न हे भटक्या कुत्र्यांचे महत्त्वपूर्ण खाद्य असते. घराबाहेर अन्न टाकलं की त्यावर तुटून पडणाऱ्या कुत्र्यांना पावसाळ्यात मात्र उपाशी राहण्याची वेळ येते. घराबाहेर काही टाकलं तरी पावसात ते भिजल्याने श्वानांना ते खाता येत नाही. पोटात पडलेल्या भुकेच्या आगीने हे श्वान आक्रमक होते आणि माणसांवरही हल्ला करते. या दिवसांत मिळेल ते अन्न खाल्ल्यामुळे श्वानांना डायरियाचा त्रासही होतो. पण भटक्या कुत्र्यांवर त्याचे उपचारच होत नाहीत.

- दत्ता यादव