शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

जीव लावणारे नव्हे..तिरस्कार करणारेच अधिक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:25 IST

सातारा जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांच्या उच्छांदाच्या अनेक भयभीत करणाऱ्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे या कुत्र्यांना फारसे कोणी दया दाखवत ...

सातारा जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांच्या उच्छांदाच्या अनेक भयभीत करणाऱ्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे या कुत्र्यांना फारसे कोणी दया दाखवत नाही. दूरवरून येणारे कुत्रे दिसले तरी अनेकजण आपला रस्ता बदलतात. इतकी दशहत या भटक्या कुत्र्यांची जनमानसात आहे. गत दोन वर्षांपूर्वी कोडोली येथे एका भटक्या कुत्र्याने सात वर्षाच्या मुलाचे अक्षरश: लचके तोडले होते. यातच त्या मुलाचा जीव गेला. त्यामुळे सातारकरांच्या मनात या भटक्या कुत्र्यांविषयी चीड निर्माण झाली. ही घटना सातारकरांच्या विस्मृतीतून जात असतानाच गत पाच महिन्यांपूर्वी सातारा शहराजवळ असलेल्या जकातवाडी येथे भटक्या कुत्र्याने एक युवती आणि युवकावर हल्ला केला. यात जखमी झालेल्या दोघा युवक युवतीचा महिनाभराच्या उपचारानंतर मृत्यू झाला. या दोघांच्या मृत्युनंतरचा मानसिक धक्का सातारकरांच्या मनात खोलवर रुजलाय. त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या दहशतीखाली सातारकर आजही वावरत आहेत.

या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी अनेकदा नागरिकांकडून केली जाते. मात्र, पुढे त्याचे काहीच होत नाही. अशाप्रकारे एखाद्याचा जीव गेल्यानंतरच भटक्या कुत्र्यांचा मुद्दा पुन्हा उफाळून येतो. तसं पाहिलं तर या भटक्या कुत्र्यांना वेळेवर अन्न मिळत नाही. त्यामुळे कुत्रे अन्नाच्या शोधात अन्यत्र भटकत असतात. विशेषत: कचरा डेपोमध्ये ही कुत्री पाहायला मिळतात. या ठिकाणी अनेक प्रकारचे शिळे अन्न टाकले जाते. हे अन्न काहीवेळेस कुजून त्याचे विषही तयार होते. अशावेळी मग या भटक्या कुत्र्यांनी हे कुजलेले पदार्थ खाल्ल्यास त्यांचे मानसिक संतुलन बिघडते. परिणामी सैरभर होऊन माणसांचा चावा घेतात, असे प्राणिमित्रांचे म्हणणे आहे.

चौकट :

पावसाळ्यात होतात पोटाचे हाल

घरातील शिल्लक राहिलेलं अन्न हे भटक्या कुत्र्यांचे महत्त्वपूर्ण खाद्य असते. घराबाहेर अन्न टाकलं की त्यावर तुटून पडणाऱ्या कुत्र्यांना पावसाळ्यात मात्र उपाशी राहण्याची वेळ येते. घराबाहेर काही टाकलं तरी पावसात ते भिजल्याने श्वानांना ते खाता येत नाही. पोटात पडलेल्या भुकेच्या आगीने हे श्वान आक्रमक होते आणि माणसांवरही हल्ला करते. या दिवसांत मिळेल ते अन्न खाल्ल्यामुळे श्वानांना डायरियाचा त्रासही होतो. पण भटक्या कुत्र्यांवर त्याचे उपचारच होत नाहीत.

- दत्ता यादव