शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

नांदोशी पूल उठला जिवावर!

By admin | Updated: September 2, 2015 23:25 IST

‘बांधकाम’चे दुर्लक्ष : सहा महिन्यांत तिघांनी गमावला अपघातात जीव

रशीद शेख -- औंध  खटाव तालुक्यातील नांदोशी येथील पूल मृत्यूचा सापळा बनला आहे. या पुलावर सहा महिन्यात तिघांनी अपघातात जीव गमावला आहे. प्रवाशांच्या जिवावर उठलेला हा पूल अजून किती बळी घेणार, असा संतप्त सवाल प्रवाशांमधून उमटत आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. औंधवरुन सातारा, पुसेसावळीला जाण्यासाठी या प्रमुख मार्गावरुनच ये-जा करावी लागते. तसेच या पुलाच्या रस्त्यावरून औंधला येणाऱ्या-जाणाऱ्या भाविक व पर्यटकांची संख्या लक्षणीय आहे. नांदोशी गावच्या हद्दीत असणाऱ्या पूलावरुन प्रवास करताना वळणाकृती रस्ता असल्याने वाहनचालकांना पुलाचा अंदाज येत नाही. शिवाय या धोकादायक पुलाला गार्डस्टोन अथवा सुरक्षाकठडे नसल्याने चालकांना पुलाचा अंदाज येत नाही. अनेकदा वळण न घेता आल्याने वाहने रस्त्यावरून खाली गेल्याच्या घटनांही घडल्या आहेत. गेल्या वर्षभरात या पुलाने अनेक बळी घेतले असून या पुलाच्या दोन्ही बाजूस लोखंडी रेलिंग, सूचनाफलक, उतारांच्या बाजुने गतिरोधक अशा सुविधा करणे आवश्यक आहे. अपघात रोखण्यासाठी उपाययोजना राबविण्याबरोबरच पुलाची दुरुस्ती करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून संबंधित विभागाला काम करण्याच्या सूचना देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. सामाजिक संघटना आक्रमक पुलाबाबत लवकरात लवकर निर्णय होऊन पुलाच्या दोन्ही बाजूला चार फुटांच्या भिंती बांधाव्यात. त्यामुळे अपघात रोखण्यास मदत होईल. एवढी तर मानसिकता संबंधित विभागाने दाखविण्याची मागणी श्री सोशल फाउंडेशन, जनता क्रांती दल, आजी-माजी सैनिक सेवा संस्था, शेखर गोरे प्रतिष्ठान आदी संघटनांनी केली आहे.वरवरचे उपाय नकोतएखादा अपघात झाला की संबंधित विभागाकडून दुसऱ्या दिवशी चुना लावलेले पंढरे दगड दोन्ही बाजूस मांडले जातात. ते दगड कायमस्वरूपी तेथेच राहत नाहीत. परिणामी फक्त दिखावाच केला जात असल्याची चर्चा परिसरात आहे.