शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
5
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
6
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
7
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
8
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
9
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
10
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
11
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
12
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
13
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
14
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
16
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
17
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
18
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
19
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
20
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा

खलबते दिल्लीत ; अस्वस्थता कऱ्हाडात !

By admin | Updated: June 20, 2014 23:05 IST

कारण राजकारण : राज्यपाल, मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेचा परिणाम

प्रमोद सुकरे ल्ल कऱ्हाड देशातील राज्यपाल अन् महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेने दिल्लीसह मुंबईचे वातावरण तापले आहे. मुंबई व दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे; पण त्यामुळे कऱ्हाडात मात्र भलतीच अस्वस्थता पसरली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अपयश आल्यापासून राज्याच्या नेतृत्व बदलाची चर्चा सुरू आहे. मात्र नेतृत्वाची झूल कोणाच्या खांद्यावर ठेवायची, हाच पक्षश्रेष्ठींसमोर प्रश्न असल्याचे मानले जाते; पण गेल्या चार दिवसात नेतृत्व बदलाच्या घडामोडींना वेग आल्याने चव्हाणांच्या ‘होम पीच’वर भलतीच अस्वस्थता आहे. अशोकराव चव्हाणांचा ‘आदर्श’ घोटाळा चव्हाट्यावर आल्यानंतर तीन वर्षांपूर्वी अनपेक्षीतपणे केंद्रात राज्यमंत्री असणारे दुसरे चव्हाण मुख्यमंत्री झाले अन् महाराष्ट्रात ‘पृथ्वीराज’ सुरू झाले. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांच्यानंतर सुमारे पन्नास वर्षांनी कऱ्हाडचे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यामुळे कऱ्हाडसह जिल्हावासियांना आनंद झाला. त्यांच्या अपेक्षा उंचावल्या. गत ३ वर्षात पृथ्वीराजबाबांनी जिल्ह्यासह कऱ्हाडला ‘छप्पर फाडके’ निधी दिला आहे. अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यामुळे लोकांच्यात समाधानाचे वातावरण आहे. नुकताच ‘पालघर’ स्वतंत्र जिल्हा झाल्यानंतर ‘यशवंतरावांची’ कर्मभूमी असणाऱ्या कऱ्हाडला पृथ्वीराज चव्हाणच जिल्हा करतील अशी आशा आहे; पण मुख्यमंत्री बदलाचे वारे वाहू लागल्याने कऱ्हाडकरांची धकधक वाढू लागली आहे. कऱ्हाडचे माजी खासदार श्रीनिवास पाटील सध्या सिक्कीमचे राज्यपाल आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले राज्यपाल होण्याची संधी त्यांना मिळाली; पण केंद्रात ‘भाजप’ सरकार आल्यानंतर राजकिय वचपा काढण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे राज्यपाल बदलण्याच्या हालचाली ‘मोदी’ सरकारने सुरू केल्या आहेत. काहींनी राज्यपाल पदाचे राजिनामे दिले आहेत. तर काहींनी नकार दिला आहे. त्यात श्रीनिवास पाटील यांचे पदही अडचणीत असल्याच्या चर्चा प्रसार माध्यमातून येत असल्याने कऱ्हाडसह जिल्ह्यातील त्यांच्या हितचिंतकांच्यात चिंतेचे वातावरण आहे.