शहरं
Join us  
Trending Stories
1
आता इस्लामिक देश कतारवरच इराणचा हल्ला, येथेच आहे अमेरिकेचा सर्वात मोठा एअरबेस; सहा क्षेपणास्त्रे डागली
2
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
3
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
4
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
5
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
6
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
7
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
8
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
11
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
12
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
13
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
14
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
15
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
16
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
17
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

कोणत्याही पक्षाची बाजू न घेता तटस्थपणा राहील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोणत्याही ठिकाणी राजकीय वातावरण हे असतंच. परंतु काम करताना आपण कोणत्याही पक्षाची, कोणत्याही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोणत्याही ठिकाणी राजकीय वातावरण हे असतंच. परंतु काम करताना आपण कोणत्याही पक्षाची, कोणत्याही संघटनेची बाजू घ्यायची नाही. आपण तटस्थ राहिलं पाहिजं. जे काय कायद्यात बसतं ते करायचं म्हणजे कोणाताही कायदेशीर प्रश्न उद्भवत नाही, असं मत सातारा शहर पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

शहर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस निरीक्षक निंबाळकर यांनी सातारा शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कोणती भूमिका घेतली जाईल, यावर आपले सडेतोड मत मांडले.

प्रश्न : कामाचे प्राधान्य काय असेल?

उत्तर : सातारा शहर हे महत्त्वाचे शहर आहे. लोकसंख्या पण जास्त आहे. त्या दृष्टीने या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील तरुण वर्ग असेल, व्यापारी, नोकरदार, व्यावसायिक हे सर्व लोक निर्भय वातावरणात राहिले पाहिजेत. जो कोणी दादागिरी करेल, गुंडगिरी करेल, अन्याय करेल अशा लोकांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, यावर माझे पहिले प्राधान्य राहील.

प्रश्न : राजकीय हस्तक्षेपाला कसे सामोरे जाणार?

उत्तर : कोणत्याही पक्षाचे राजकीय पदाधिकारी असतील, राजकीय लोक असतील, नेतेमंडळी असतील त्यांना त्रास द्यायचा किंवा त्यांच्यावर अन्याय करायचा. काहीएक प्रश्न नाही आणि तेही आपल्याला त्रास देणार नाहीत. परंतु जर कोणी काही बेकायदा कृत्य केलं तर कायदेशीर कारवाई करणार.

प्रश्न : तडीपारीबाबत आपली भूमिका काय असेल?

उत्तर : काही टोळ्यांना तडीपार केलेले आहे. त्यांचे रेकाॅर्ड मी तपासणार आहे. तडीपार केलेले लोक जर परत आले असतील तर त्यांना जेलमध्ये पाठवले जाईल.

साताऱ्यात यापूर्वीच्या अधिकाऱ्यांनी तडीपारीचे सत्र अवलंबले होते. त्यामध्ये सातत्य राहील. शहरात गुंडागर्दी अजिबात चालणार नाही. महिला, ज्येष्ठ नागरिक, व्यावसायिक, दुकानदार यांना निर्भय वातावरणात वावरता आलं पाहिजे. यासाठी प्रयत्न राहील. अन्याय होतोय, असं आपल्याला वाटलं तर थेट माझ्याशी संपर्क साधा.

- भगवान निंबाळकर, पोलीस निरीक्षक, सातारा शहर

चाैकट : नवीन गुंड उदयास येण्यापूर्वीच दक्ष..

कोणावरही अन्याय होत असेल तर माझ्याशी थेट संपर्क साधावा. त्यांच्यावर कडक आणि कायदेशीर कारवाई केली जाईल. तडीपारीबाबत जे प्रस्ताव आहेत. त्यांचा पाठपुरावा करून त्यांना तडीपार केले जाईल. नवीन गुंड उदयास येण्यापूर्वीच त्याचा बंदोबस्त केला जाईल, असा इशाराही निंबाळकर यांनी दिला.