शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
4
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
5
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
6
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
7
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
8
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
9
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
10
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
11
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
12
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
13
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
14
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
15
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
16
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
17
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
18
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

नेमा प्राधिकरण अधिकारी.. अन्यथा थाटू मंडई !

By admin | Updated: June 28, 2016 00:36 IST

शिवेंद्रसिंहराजेंचा इशारा : जीवन प्राधिकरणच्या ढिसाळ कारभाराबाबत सातारकरांमधून संताप

सातारा : ‘महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या ढिसाळ कारभाराचा फटका सातारकरांना बसत आहे. सातारा शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचे वर्षानुवर्षे रखडलेले काम, पाच-पाच महिने गळती निघत नाही. पाणीपुरवठ्याची बोंबाबोंब, यामुळे प्राधिकणाबाबत सातारकरांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. गेल्या पाच वर्षांत कायमस्वरूपी कार्यकारी अभियंता प्राधिकरणाला मिळाला नाही. येत्या दहा दिवसांत प्रशासनाने प्राधिकरणाच्या कार्यालयाला एक कर्तव्यदक्ष आणि पूर्ण वेळ कार्यकारी अभियंता द्यावा; अन्यथा प्राधिकरणच्या आवारात भाजीमंडई स्थापन करून जागेचा सदुपयोग करू,’ असा इशारा आ. शिवेंद्रसिंंहराजे भोसले यांनी दिला आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सातारा शहरातील काही भागाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा केला जातो. तसेच सातारा शहरासाठी मंजूर झालेल्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचे कामही प्राधिकरणामार्फत चालू असून, हे काम अद्यापही सुरूच आहे. प्राधिकरणाला सक्षम आणि पूर्णवेळ अधिकारी मिळत नसल्याने वर्षानुवर्षे येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू असून, त्याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. प्राधिकरणाचा कारभार सुधारावा, यासाठी पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी आंदोलनेही केली आहेत. मात्र, त्यांच्या कारभारात तसूभरही फरक पडलेला नाही. प्राधिकरण कार्यालयाचा काहीही उपयोग होत नाही, उलट सर्वांच्याच डोक्याला ताप झाला आहे. त्यामुळेच प्राधिकरणाचे कार्यालय बंद करा, अशी मागणी आपण केली होती. ‘प्राधिकरणाचे कामकाज समाजाभिमुख आणि दर्जेदार होण्यासाठी प्रशासनाने तातडीने एक सक्षम कार्यकारी अभियंत्याची नेमणूक सातारा कार्यालयासाठी करावी. येत्या दहा दिवसांत अधिकाऱ्याची नियुक्ती न झाल्यास निषेध म्हणून प्राधिकरण कार्यालयाच्या आवारात आम्ही भाजीमंडई भरवू. तसे पाहिले तर, प्राधिकरणाचा काहीही उपयोग होत नसल्याने कार्यालयाच्या जागेचा तरी, नागरिकांसाठी उपयोग होईल. आमच्या इशाऱ्याची दखल प्रशासनाने न घेतल्यास प्राधिकरण कार्यालयाच्या आवारात ११ व्या दिवशी भाजीमंडई सुरू केली जाईल,’ असा इशारा आ. शिवेंद्रसिंंहराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. (प्रतिनिधी)प्राधिकरणला एक गळती काढायला पाच महिने!उत्तरे आम्हाला द्यावी लागतात...प्राधिकरण कार्यालयाला एक सक्षम प्रमुख आणि पूर्णवेळ अधिकारी मिळावा, अशी मागणीही वारंवार प्रशासनाकडे केली आहे. प्रत्यक्षात मात्र अधिकाऱ्यांचा पाठशिवणीचा खेळ सुरु असल्याचे दिसत असून प्राधिकरण कार्यालयाचा कारभार सुधारण्याची चिन्हे दिसत नाहीत. प्राधिकरणाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांमध्ये संताप असून एक लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांच्या प्रश्नाला आम्हाला उत्तरे द्यावी लागत आहेत.