शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नेमा प्राधिकरण अधिकारी.. अन्यथा थाटू मंडई !

By admin | Updated: June 28, 2016 00:36 IST

शिवेंद्रसिंहराजेंचा इशारा : जीवन प्राधिकरणच्या ढिसाळ कारभाराबाबत सातारकरांमधून संताप

सातारा : ‘महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या ढिसाळ कारभाराचा फटका सातारकरांना बसत आहे. सातारा शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचे वर्षानुवर्षे रखडलेले काम, पाच-पाच महिने गळती निघत नाही. पाणीपुरवठ्याची बोंबाबोंब, यामुळे प्राधिकणाबाबत सातारकरांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. गेल्या पाच वर्षांत कायमस्वरूपी कार्यकारी अभियंता प्राधिकरणाला मिळाला नाही. येत्या दहा दिवसांत प्रशासनाने प्राधिकरणाच्या कार्यालयाला एक कर्तव्यदक्ष आणि पूर्ण वेळ कार्यकारी अभियंता द्यावा; अन्यथा प्राधिकरणच्या आवारात भाजीमंडई स्थापन करून जागेचा सदुपयोग करू,’ असा इशारा आ. शिवेंद्रसिंंहराजे भोसले यांनी दिला आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सातारा शहरातील काही भागाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा केला जातो. तसेच सातारा शहरासाठी मंजूर झालेल्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचे कामही प्राधिकरणामार्फत चालू असून, हे काम अद्यापही सुरूच आहे. प्राधिकरणाला सक्षम आणि पूर्णवेळ अधिकारी मिळत नसल्याने वर्षानुवर्षे येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू असून, त्याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. प्राधिकरणाचा कारभार सुधारावा, यासाठी पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी आंदोलनेही केली आहेत. मात्र, त्यांच्या कारभारात तसूभरही फरक पडलेला नाही. प्राधिकरण कार्यालयाचा काहीही उपयोग होत नाही, उलट सर्वांच्याच डोक्याला ताप झाला आहे. त्यामुळेच प्राधिकरणाचे कार्यालय बंद करा, अशी मागणी आपण केली होती. ‘प्राधिकरणाचे कामकाज समाजाभिमुख आणि दर्जेदार होण्यासाठी प्रशासनाने तातडीने एक सक्षम कार्यकारी अभियंत्याची नेमणूक सातारा कार्यालयासाठी करावी. येत्या दहा दिवसांत अधिकाऱ्याची नियुक्ती न झाल्यास निषेध म्हणून प्राधिकरण कार्यालयाच्या आवारात आम्ही भाजीमंडई भरवू. तसे पाहिले तर, प्राधिकरणाचा काहीही उपयोग होत नसल्याने कार्यालयाच्या जागेचा तरी, नागरिकांसाठी उपयोग होईल. आमच्या इशाऱ्याची दखल प्रशासनाने न घेतल्यास प्राधिकरण कार्यालयाच्या आवारात ११ व्या दिवशी भाजीमंडई सुरू केली जाईल,’ असा इशारा आ. शिवेंद्रसिंंहराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. (प्रतिनिधी)प्राधिकरणला एक गळती काढायला पाच महिने!उत्तरे आम्हाला द्यावी लागतात...प्राधिकरण कार्यालयाला एक सक्षम प्रमुख आणि पूर्णवेळ अधिकारी मिळावा, अशी मागणीही वारंवार प्रशासनाकडे केली आहे. प्रत्यक्षात मात्र अधिकाऱ्यांचा पाठशिवणीचा खेळ सुरु असल्याचे दिसत असून प्राधिकरण कार्यालयाचा कारभार सुधारण्याची चिन्हे दिसत नाहीत. प्राधिकरणाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांमध्ये संताप असून एक लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांच्या प्रश्नाला आम्हाला उत्तरे द्यावी लागत आहेत.