शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

अवघा उसळला निळा जनसागर...

By admin | Updated: January 15, 2017 23:25 IST

विविध संघटनांचा पाठिंबा : तरुण-तरुणी, आबालवृद्धांसह लाखो समाज बांधवांचा सहभाग

सातारा : अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी यासह अनेक मागण्यांसाठी साताऱ्यातून निघालेल्या बहुजन क्रांती मोर्चाच्या निमित्ताने साताऱ्यात निळा जनसागरच उसळला होता. या मोर्चात लाखो लोक सहभागी झाल्याचा दावा संयोजकांनी केला आहे. सातारा पालिकेच्या समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चा राजपथावरून मोती चौक मार्गे राधिका रोड, सातारा मध्यवर्ती बसस्थानक मार्गे पोवई नाक्यावर आला. यावेळी मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. बहुजन क्रांती मोर्चाचे राज्य संयोजक जीवन भालेराव यावेळी म्हणाले, ‘हा मोर्चा बहुजनांचे हक्क अधिकाराची लढाई लढण्यासाठीच मैदानात उतरला आहे. या मोर्चाने अनुसूचित जाती-जमाती, इतर मागास प्रवर्ग, मुस्लीम, लिंगायत, ख्रिश्चन आदी बहुजन समाजाने एकत्र येऊन संघटित केले आहे. हा लढा असाच कायम ठेवल्यास महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बहुजन समाजाचाच असेल. दोन समाजांमध्ये भांडण लावण्याचे प्रयत्न नेत्यांकडून सुरू केले आहेत. ते मिटवून समाजामध्ये सलोखा राखण्याचे काम बहुजन क्रांती मोर्चाने केले आहे. या मोर्चाद्वारे असंघटित समाजाला संघटित केले आहे. अ‍ॅट्रॉसिटीचा कायदा अधिक कडक झाला पाहिजे, भटके विमुक्तांनाही या कायद्यांतर्गत संरक्षण मिळाले पाहिजे, ओबीसीची जातवार जनगणना झाली पाहिजे, दहशतवादाच्या नावावर अटक करण्यात आलेल्या निरपराध मुस्लिमांची सुटका झाली पाहिजे,’ अशा मागण्याही भालेराव यांनी यावेळी केल्या.बहुजन क्रांती मोर्चा संयोजन समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी डॉ. अनिल माने, अमोल बनसोडे, तुषार मोतलिंग, सतीश रावखंडे, आयेशा पटणी, तेजस माने, आनंदराव लादे आदी उपस्थित होते. संयोजन समितीचे डॉ. अनिल माने यांनी प्रास्ताविक केले. आम्रपाली गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. दादासाहेब ओव्हाळ यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)महामानवास अभिवादनसातारा येथे रविवारी आयोजित बहुजन क्रांती मोर्चाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करुन प्रारंभ झाला. यावेळी मोर्चातील सहभागी तरुणी व महिलांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बहुजन समाज बांधवांसह आबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांचा सहभाग ‘ना जातीसाठी ना मातीसाठी आपला संघर्ष संविधानासाठी’ अशा आशयाचे फलक महिलांच्या हातात होते. कसल्याही प्रकारच्या घोषणा न देता महिलांनी हातातील फलकाद्वारे समाजात जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. महिलांच्या हातातील सर्व फलक लक्ष वेधून घेत होते.बहुजन क्रांती मोर्चामध्ये लहान मुलांपासून सर्वच वयोगटातील समाजबांधव सहभागी झाले होते. यामध्ये लांबलांबून आलेल्या वृद्धांचा सहभाग लक्षणीय होता. हातात निळा झेंडा घेऊन ‘जय भीम’चा जयघोष केला जात होता. महिलांही मोठ्या संख्येने मोर्चा सहभागी झाल्या होत्या.स्वयंसेवकांची नेमणूक मोर्चामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली होती. वाहतूक शाखेच्या पोलिसांचा जसा पेहराव होता. तशाच प्रकारच्या स्वयंसेवकांचा पेहराव होता. फक्त डोक्यामध्ये निळी टोपी असल्यामुळे हे स्वयंसेवक असल्याचे दिसून येत होते. अन्यथा वाहतूक शाखेचे पोलिसच आहेत, असा अनेकांना भास होत होता.