शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

सामाजिक वनीकरणाच्या दुर्लक्षाने रोपे होरपळली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:57 IST

रहिमतपूर : पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी वृक्ष लागवडीचा नारा दिला जात आहे. मात्र, सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाने कण्हेरखेड-अपशिंगे- साप ...

रहिमतपूर : पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी वृक्ष लागवडीचा नारा दिला जात आहे. मात्र, सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाने कण्हेरखेड-अपशिंगे- साप आदी रस्त्याच्या बाजूच्या व परिसरातील गायरान क्षेत्रातील शेकडो रोपे पाण्यावाचून करपू लागली आहेत. संरक्षक जाळ्या व बांबूही गायब झाले आहेत.

सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने कोरेगाव तालुक्यातील कण्हेरखेड-अपशिंगे-साप या रस्त्यादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा लिंब, आवळा, चिंच, करंज, गुलमोहर, आपटा आदी विविध प्रकारची रोपे लावण्यात आली आहेत. याबरोबरच अंभेरी, अपशिंगे व सासुर्वे येथील गायरानातही झाडे लावलीत. परंतु, पाण्याअभावी रस्त्याकडेची व गायरानातील बहुतांशी रोपे करपू लागली आहेत. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांना लावण्यात आलेल्या संरक्षक जाळ्या व बांबूही गायब झाले आहेत, तर कंत्राटी कर्मचारीही चार महिन्यांपासून पगारापासून वंचित आहेत.

या रोपांना पाणी देण्यासाठी टँकरची व्यवस्था करणे, पाणी देणे व देखरेखीसाठी मजुरांची रोजंदारीवर नेमणूक करणे आदी कामे सामाजिक वनीकरण विभाग करतो. मात्र, बहुतांश ठिकाणी विभागाने लागवड केलेली झाडे सद्यस्थितीत त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीत. एक तर रोपे पाण्यावाचून जळतात. नाही तर सुरक्षिततेअभावी जनावरांच्या पायाखाली तुडवून नाहीशी होताच. परंतु, सामाजिक वनीकरणचे अधिकारी कागदोपत्री रोपे दाखवण्यातच धन्यता मानत असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. सध्या अनेक रोपे पाण्यावाचून करपू लागली आहेत. अनेक झाडांची पाने गळून गेली आहेत.

चौकट :

जुन्या खड्ड्यात नवीन रोपे...

दरवर्षी गाजावाजा करून वृक्ष लागवड फोटोसेशन करून करण्यात येते. वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट कागदोपत्री पूर्ण होते. मात्र, त्याची सुरक्षा केली जात नसल्यामुळे दरवर्षी पुन्हा जुन्या खड्डयातच नवीन रोपे लावण्याचा उद्योग केला जात आहे. परंतु, कामाची बिले काढताना मात्र खड्डा काढणी, लागवड करणे, पाणी देणे आदी खर्चासह काढली जातात. मग ती कुणाच्या खिशात जातात, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

चौकट :

किती रोपे जगली?

वृक्ष लागवड मोहीम कालावधीत रहिमतपूर परिसरात किती ठिकाणी किती रोपांची लागवड केली, त्यावर किती खर्च झाला, लावलेल्या झाडांपैकी किती जगली, याचे संशोधन होणे गरजेचे आहे. अन्यथा पाण्याच्या खेपांवर आणि खड्डयांच्या संख्येवर पोट भरणाऱ्यांचे फावल्याशिवाय राहणार नाही. वरिष्ठांनी बेजबाबदार काम करणाऱ्यांच्या कामाचे ऑडिट करावे, अशी मागणी परिसरातून होत आहे.

फोटो दि.२१रहिमतपूर झाडे फोटो...

फोटो ओळ :

कण्हेरखेड-साप या रस्त्याकडेची रोपे पाण्यावाचून करपू लागली आहेत. (छाया : जयदीप जाधव)

\\\\\\\\\\\\\\\\\\\\