शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
3
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
4
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
5
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
6
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
7
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
8
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
9
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
10
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
11
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
12
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
13
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
14
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
15
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
16
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
17
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
18
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
19
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
20
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा

अंत्यविधीसाठी लाकडाऐवजी विद्युत दाहिनीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वडूज : कोरोनामुळे दगावणाऱ्या रुग्णांवर स्थानिक स्वराज्य संस्थांकडून अंत्यसंस्कार केले जात आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात लाकडांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वडूज : कोरोनामुळे दगावणाऱ्या रुग्णांवर स्थानिक स्वराज्य संस्थांकडून अंत्यसंस्कार केले जात आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात लाकडांचा वापर केला जात असल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. लाकडांऐवजी विद्युत दाहिनी अथवा शेणीचा वापर केल्यास पर्यावरणाचा समतोल टिकून राहील. त्यामुळे प्रशासनाने या बाबीचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमींमधूून होत आहे.

जिल्ह्यात रस्ते विकासाच्या नावाखाली हजारो झाडांची कत्तल झाली आणि अजूनही सुरू आहे. या महामार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा असलेली शेकडो वर्षांपासूनची झाडे क्षणार्धात जमीनदोस्त झाली. निश्चित दळणवळण सुधारण्यासाठी रस्ते होणे जेवढे आवश्यक आहे, तेवढाच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण होणे काळाची गरज बनली आहे. रस्ते विकास करताना जेवढी झाडे तोडली तेवढे वृक्षारोपण होणे आवश्यक होते. मात्र, तसे झाले नाही.

सध्या घरोघरी गॅस कनेक्शन असल्याने वृक्षतोड काही प्रमाणात थांबली. वडूजमध्ये कोरोना महामारीच्या काळात ३३४ कोरोना बाधितांवर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. एका मृत व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी अकरा मण लाकूड व पाच ते सात लीटर डिझेलसाठी सुमारे चार हजार रुपये खर्च येतो. हे प्रमाण पाहता आजवर हजारो टन लाकूड केवळ अंत्यसंस्कारासाठीच वापरण्यात आले आहे. प्रचंड वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल मात्र ढासळत चालला आहे.

अंत्यविधीसाठी इलेक्ट्रिक दाहिनी अथवा शेणीचा वापर व्हावा, अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमींमधून व्यक्त केली जात आहे. दुष्काळी खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांनादेखील शेणीच्या माध्यमातून शेतीपूरक जोड व्यवसाय सुरू करता येईल. ‘एकपाटी शेणखताला तर एकपाटी शेणीला’ असा दुहेरी फायदा बळीराजाचा होऊ शकतो आणि प्रसंगी वृक्षतोडही थांबेल. यासाठी मानसिकतेत बदल होणे ही काळाची गरज आहे.

फोटो : १७ केशव जाधव

वडूज येथील स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी लाकूड व डिझेलचा वापर केला जात आहे. (शेखर जाधव )