शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात जणू राष्ट्रवादीचीच सत्ता!

By admin | Updated: December 24, 2015 23:55 IST

काँगे्रसकडून शिरकावाचे प्रयत्न : शिवसेना-भाजप पक्ष साताऱ्यात अजूनही आंदोलकांच्या भूमिकेतच--गुडबाय २०१५--राजकारण : भाग एक

सागर गुजर -- सातारा लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी व काँगे्रस या दोन सत्ताधारी पक्षांना जनतेने नाकारल्याने भाजप-शिवसेना व मित्रपक्षांचे सरकार आले. मात्र सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसची लाट कायम राहिली. याचाच परिपाक म्हणजे २०१५ मध्ये झालेल्या विकास सेवा सोसायट्या, जिल्हा मध्यवर्ती बँक, बाजार समित्या, खरेदीविक्री संघ, मजूर फेडरेशन तसेच ८८२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी व काँगे्रस या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्येच लढाया झाल्या. बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादीने आपली ताकद दाखवून देत विरोधकांना पाणी पाजले!शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या सत्तेत सहभाग घेतल्यानंतर पुरंदरचे आमदार व पवारांचे कट्टर विरोधक विजय शिवतारे यांना सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री केले. त्यांच्या आक्रमक स्वभावामुळे सातारा जिल्ह्यात भगवे वादळ वाहिल, असे संकेत यामागे होते. मात्र, राजकीयदृष्ट्या शिवतारेंचा फारसा प्रभाव गतवर्षात पडलेला पाहायला मिळाला नाही. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेतील राष्ट्रवादीची सत्ता उलथून टाकण्याचे मनसुबे आखणाऱ्या भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांनी ऐन निवडणुकीवेळी तलवार म्यान केली. राष्ट्रवादीचे प्रमुख सत्ता केंद्र असणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये काँगे्रसचे आमदार जयकुमार गोरे यांनी शिरकाव केला. याच काळात खासदार उदयनराजे भोसले व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यात जोरदार वाक्युद्ध रंगले होते. उदयनराजेंच्या दबावतंत्रामुळे राष्ट्रवादीने त्यांच्याविरोधातील उमेदवार काढून घेऊन त्यांना बिनविरोध निवडून आणले; मात्र त्यांना माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर, आमदार जयकुमार गोरे यांच्याप्रमाणे विरोधात बसायला लागले. या निवडणुकीनंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व आमदार शशिकांत शिंदे यांचे जिल्हा बँकेतील वर्चस्व वाढलेले पाहायला मिळाले. राज्यातील सत्ता गेल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादीच्या हातून गेले; परंतु खासदार शरद पवार यांनी विधान परिषदेतील आपल्या पक्षाच्या ताकदीच्या जोरावर सभापतिपद रामराजे नाईक-निंबाळकर यांना देऊन ही उणीव भरून काढली. राज्यात सत्ता आल्यानंतर भाजप व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेले चैतन्य नंतरच्या ग्रामपंचायती व सहकारी संस्थांच्या निवडणुकांत दिसले नाही. मात्र, पालकमंत्रिपदापाठोपाठ शिवसेनेला पोवई नाक्यावर भव्य कार्यालय मिळाले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन झाले. त्यानंतर पक्षाचा कारभार सुरळीतपणे सुरू झाला. शिवसेनेच्या तुलनेत भाजपला वरिष्ठ पातळीवरून म्हणावी तशी ताकद मिळाली नाही. मात्र, आगामी वर्षात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने या पक्षाने तयारी सुरू केल्याचे आता स्पष्ट झाले आहे. केंद्रातील पंतप्रधान कार्यालयाचा व्याप सांभाळणाऱ्या आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना काँगे्रसने मुख्यमंत्रिपद देऊन महाराष्ट्रात पाठवले. त्यामुळे ते राज्यात विशेष लक्ष घालू शकले. कऱ्हाडच्या राजकारणावरही ते यानिमित्ताने वचक ठेवू शकले. आता तर ते कऱ्हाड दक्षिणमध्ये विधानसभेला निवडून आले असल्याने स्थानिक पातळीवरील निवडणुकांत ते प्रभाव ठेवू शकले आहेत. मुख्यमंत्रिपदामुळे चव्हाण हे काँगे्रसचे राज्याचे नेतृत्व म्हणून उदयास आले. हे राजकीय नेतृत्व त्यांच्याकडे कायम आहे.कऱ्हाडचे अतुल भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी माजी आ. विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या साथीने कृष्णा सहकारी साखर कारखान्याची सत्ता मिळविली. भाजपच्या माध्यमातून त्यांना लाल दिवा खुणावत आहे. माण-खटावचे किंगमेकर माजी आमदार सदाशिवराव पोळ यांचे निधन ही राष्ट्रवादीला चटका देणारी घटना घडली. या दोन तालुक्यांमध्ये आमदार जयकुमार गोरे व शेखर गोरे यांच्यातच सहकारी संस्थांच्या व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये झालेला सत्तासंघर्ष अधिकच धारदार झाला. पाटण तालुक्यात आमदार शंभूराज देसाई यांनी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्याविरोधात विजय मिळविला होता. यानिमित्ताने शिवसेनेला जिल्ह्यात एकमेव आमदारपद मिळाले होते. आ. देसाई यांना मंत्रिपद मिळेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, अद्याप ती फलद्रूप झालेली नाही. वाई विधानसभा मतदारसंघातले राजकारणही विशेष चर्चेचे ठरले. आमदार मकरंद पाटील यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी माजी आ. मदन भोसले यांनी विधानसभा निवडणुकीत आ. पाटील यांना ‘बाय’ दिल्यानंतर किसन वीर साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार गटाने भोसलेंना ‘बाय’ दिला. भाजपचा मित्र पक्ष असणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाला सत्तेत वाटा मिळून आमदार महादेव जानकर यांना मंत्रिपदाची संधी दिली जाईल, अशी चर्चा होती. सहकार मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापुरात तसे जाहीरही केले. मात्र, वर्षाच्या सरतेशेवटीही जानकरांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली. विकासाच्या पातळीवर विचार केल्यास २०१५ चे वर्षही घोषणांमध्येच निघून गेले. साताऱ्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व महिला रुग्णालयाला मूर्तरूप तसेच माण-खटाव तालुक्यांना वरदान ठरणारी जिहे-कटापूर योजना पूर्ण करण्याची भीष्मगर्जना पालकमंत्री विजय शिवतारे यांनी केली होती. जिहे-कटापूरला निधी मिळवून देण्यात त्यांना काही प्रमाणात यश आल्याने हे काम पुन्हा सुरू झाले. पण वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रकल्प अजूनही पुढे सरकलेला नाही. २०१५ मधील महत्त्वाच्या घडामोडीमाणचे किंगमेकर माजी आ. सदाशिवराव पोळ यांचे निधनरामराजे नाईक-निंबाळकर यांना विधानपरिषद सभापतिपद१९७२ पेक्षा भयंकर दुष्काळ; गतवर्षीच्या तुलनेत ५ हजार मिलीमीटर पाऊस कमीवाई, कऱ्हाड तालुक्यांत अनुक्रमे ५६ व ५० टक्के पाऊसजिल्हा मध्यवर्ती बँकेवर राष्ट्रवादीचे पुन्हा वर्चस्वग्रामपंचायतींच्या निवडणुकांत भाजप-शिवसेनेला सपशेल अपयशसोसायट्या, मजूर फेडरेशन, बाजार समित्या, खरेदीविक्री संघ निवडणुकांतही राष्ट्रवादी सरस