शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

राष्ट्रवादीच्या २५ सदस्यांचा बंडाचा झेंडा

By admin | Updated: February 8, 2016 23:23 IST

जिल्हा परिषद : पदाधिकाऱ्यांचा विषय ऐरणीवर; बदल होणार नसेल तर स्वतंत्र गट; विरोधात बसण्याचीही तयारी

सातारा : ‘राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात अजित पवारांच्या शब्दाला किंमत राहिली नाही,’ अशी संतापजनक खंत व्यक्त करीत सोमवारी जिल्हा परिषदेतील २५ सदस्यांनी बंडाचा इशारा दिला. ‘पदाधिकाऱ्यांचा राजीनामा घेता येत नसेल तर स्वतंत्र गट निर्माण करावा लागेल,’ असेही त्यांनी जाहीर केले. दरम्यान, याची कुणकुण लागताच या ठिकाणी घाईगडबडीने आलेले पक्षप्रतोद बाळासाहेब भिलारे यांनी दूरध्वनीवरून विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी या बंडखोरांना ‘बुधवारपर्यंत थांबा,’ असा सबुरीचा सल्ला दिला. जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहावर सोमवारी सकाळी राष्ट्रवादीचे संतप्त सदस्य जमले. यामध्ये सतीश चव्हाण, राजू भोसले, अनिल देसाई, सुभाष नरळे, मेघना चव्हाण, किरण साबळे-पाटील, सुषमा साळुंखे, विजयमाला जगदाळे, जितेंद्र सावंत यांच्यासह खासदार उदयनराजे भोसले गटाचे संदीप शिंदे, किशोर ठोकळे, वनिता पोतेकर, आदी उपस्थित होते. ‘पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याबाबत आजच काय तो निर्णय घ्या. ज्यांनी राजीनामे दिले आहेत, ते तरी मंजूर करून घ्या,’ अशी मागणी अनेक सदस्यांनी यावेळी तावातावाने केली. ही घटना समजताच जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद बाळासाहेब भिलारे या ठिकाणी आले. यावेळी बहुतांश सदस्यांनी त्यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली. ‘अजित पवार हे पक्षाचे प्रमुख नेते आहेत, त्यांच्या शब्दालाही पक्षात किंमत राहिलेली नाही. नेत्यांचे आदेश न मानता पदाधिकारी पदाला चिकटून बसतच असतील, तर आम्ही राजीनामा देतो, अथवा स्वतंत्र राहतो,’ अशी निर्वाणीची भाषा यापैकी अनेकांनी वापरली. यावेळी उदयनराजे गटाच्या सदस्यांनी आपल्या नेत्यांची भूमिका स्पष्ट केली. ‘राजेंनी कुठलाही निर्णय घेण्याबाबत कसलीच सूचना केलेली नाही,’ असे या सदस्यांनी स्पष्ट केले. (पान २ वर)उदयनराजेंचीही घेतली भेटही बैठक आटोपल्यानंतर राष्ट्रवादीचे हेच सदस्य शासकीय विश्रामगृहावर खासदार उदयनराजे भोसले यांना जाऊन भेटले. यावेळी मात्र ही संख्या ३० पर्यंत गेली होती. ‘मी तुमच्यासोबतच आहे. उपाध्यक्षांचा राजीनामा काय, एका मिनिटात घेऊ शकतो, पण आमची चर्चा तर होऊ द्या,’ असे उदयनराजेंनी सांगितले. याबाबत येत्या एक-दोन दिवसांत खासदार उदयनराजे भोसले व आमदार शशिकांत शिंदे एकत्र बसून निर्णय घेण्याची शक्यता आहे. १० तारखेपर्यंत थांबा...राष्ट्रवादीच्या नाराज सदस्यांना रामराजेंनी समजुतीने सांगताना, ‘दहा तारखेपर्यंत थांबा. एकत्र बसून सर्वजण तोडगा काढू. तोपर्यंत घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका,’ असे सांगितल्याने या सदस्यांनी रामराजेंच्या शब्दाला मान देऊन बुधवारपर्यंत थांबण्याचे ठरविले.