शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
4
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
5
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
6
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
7
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
8
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
9
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
10
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
11
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
12
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
13
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
14
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
15
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
16
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
17
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
18
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
19
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
20
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे

लग्नाच्या चौदाव्या दिवशी नवरदेव पोलीस कोठडीत!

By admin | Updated: July 30, 2014 23:17 IST

मजुरी केली असती तरी साथ दिली असती

दत्ता यादव ल्ल साताराभावी आयुष्याची स्वप्ने रंगवून नववधू घरात आली. आप्त-स्वकीयांची ओळख अद्याप व्हायची होती. तत्पूर्वीच तिच्या नशिबाचे फासे फिरले. आपला भावी जोडीदार चक्क एक अट्टल चोरटा आहे आणि तो पोलिसांच्या तावडीत सापडालाय, असं ज्यावेळी नववधूला लग्नाच्या चौदाव्या दिवशी समजलं, तेव्हा तिच्या पायाखालची वाळू सरकली. स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी कोरेगाव तालुक्यातील घरफोडी आणि दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद केली. या टोळीकडे पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली, तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. रवींद्र पेठेकर हा या टोळीचा मुख्य सूत्रधार. रवींद्रचे शिक्षण जेमतेम नववीपर्यंत झाले आहे. त्याचे आई-वडील पूर्वी मेढा येथे वास्तव्यास होते. मात्र, मोलमजुरीच्या निमित्ताने त्यांनी कोरेगाव तालुक्यातील आसरे येथे आश्रय घेतला. कष्ट करण्यापेक्षा कुमठे फाट्यावर उनाडक्या करत रवींद्र दिवस घालवू लागला. त्यावेळी त्याची संतोष सणस, नीलेश जाधव, बबन जाधव (रा. जांब खुर्द, ता. कोरेगाव) यांच्याशी ओळख झाली. हे तिघेही बेफिकीर, दिवसभर कुमठे चौकात दंगामस्ती करत आला दिवस घालवायचे. अशा मनोवृत्तीत वाढलेल्या या चौघांनी एकत्र बसून झटपट श्रीमंत होण्यासाठी चोरीचा मार्ग स्वीकारला. टोळीची सूत्रे रवींद्रने स्वत:च्या हातात घेतली. पहिल्या चोरीमध्ये त्यांनी बंद घर फोडले. त्यामध्ये त्यांना तब्बल पन्नास हजार रुपये मिळाले.कमी वेळात एवढे पैसे मिळाल्याने चौघांचेही डोळे विस्फारले. त्या दिवसांपासून त्यांनी चोरीचा सपाटाच लावला होता. कोरेगाव तालुक्यामध्ये घरफोड्यांचे सत्र सुरू झाल्याने पोलिसांची नाचक्की झाली. मात्र, एका खबऱ्याकडून पोलिसांना या नव्या टोळीचा छडा लागला. २००९ मध्ये पहिल्यांदाच रवींद्र पेठेकरला पोलिसांनी अटक केली. त्यावेळी त्याच्याकडून ९ घरफोड्या उघडकीस आल्या होत्या. काही महिने कारागृहात व्यतीत केल्यानंतर पुन्हा तो जामिनावर सुटला. मात्र, काही महिन्यांनंतर परत त्याने पहिलाच उद्योग सुरू केला. पूर्वीच्या मित्रांना जवळ करून त्याने मुंबई, पुणे, सातारा या ठिकाणाहून दुचाकी चोरण्याचा सपाटा लावला. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट आणि त्यांच्या टीमने अखेर या टोळीचा पर्दाफाश केला. मजुरी केली असती तरी साथ दिली असतीरवींद्र हा बोलघेवडा असल्यामुळे त्याच्या नातेवाइकांमध्येही तो एकप्रकरे मोहरक्या म्हणूनच वावरत होता. नात्यातीलच एका मुलीशी त्याने १३ जुलैला पुणे जिल्ह्यातील आळंदीमध्ये लग्न केले. ‘पुण्यातील एका प्रसिद्ध कंपनीत मी नोकरी करतो,’ असं त्याने पत्नीला सांगितलं होतं. कामानिमित्त चार ते पाच दिवस तो बाहेरच असायचा. मात्र, दोन दिवसांपूर्वी रवींद्र आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही बातमी त्याच्या पत्नीला समजली तेव्हा तिच्या पायाखालची वाळू सरकली. भावी आयुष्याची सुरूवात करण्यापुर्वीच पतीने दगा दिला. ‘रात्री कंपनीत कामाला जातोय,’ असे सांगण्याऱ्या पतीचा खरा चेहरा समोर आल्याने पत्नीला जबर मानसिक धक्का बसला आहे. मोलमजुरी करून त्याने कुटुंब चालविलं असतं तर मी त्याच्यासोबत आख्खं आयुष्य काढलं असतं. मात्र त्याने गैरमार्ग पत्करून स्वत:च्या आणि माझ्याही आयुष्याचं वाटोळे केलं,’ अशी संतप्त भावना रवींद्रच्या पत्नीने पोलिसांजवळ बोलून दाखविली.