शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

नवजा, महाबळेश्वरला पावसाची उघडीप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:43 IST

सातारा : जिल्ह्यात पावसाची दडी कायम असून, पावसाचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना, नवजा आणि महाबळेश्वरलाही दोन दिवसांपासून उघडीप ...

सातारा : जिल्ह्यात पावसाची दडी कायम असून, पावसाचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना, नवजा आणि महाबळेश्वरलाही दोन दिवसांपासून उघडीप आहे. महाबळेश्वरमध्ये फक्त अवघा एक मिलिमीटरच पाऊस पडला, तर कोयना धरणातील पाणीसाठा ९४ टीएमसीवर झाला असून, इतर धरणांतही चांगला साठा उपलब्ध आहे.

जिल्ह्यात जुलै महिन्याच्या मध्यावर दमदार पाऊस कोसळला. पूर्व दुष्काळी भागात चांगला पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळाली. तर पश्चिम भागातील कोयना, नवजा, महाबळेश्वर, तापोळा, बामणोली या भागात तुफान वृष्टी झाली होती. यामुळे शेतीचे नुकसान झाले. तसेच रस्ते, पूल वाहून गेले. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रमुख धरणांत पाण्याची आवक वेगाने झाली. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणांतून पाणी सोडण्यात आले. कोयना धरणात तर मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली होती. अवघ्या काही दिवसांत धरणांतील पाणीसाठा ९० टीएमसीच्या वर गेला होता. तसेच कण्हेर, उरमोडी, धोम, बलकवडी, तारळी यासारख्या धरणांतूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग करावा लागला. मात्र, गेल्या १० दिवसांपासून तुरळक स्वरुपात पाऊस पडत आहे.

जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची दडी कायम आहे, तर पश्चिम भागातही उघडीप आहे. मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना, नवजा येथे पावसाची नोंद झाली नाही. मात्र, महाबळेश्वरला अवघा एक मिलिमीटर पाऊस पडला. तर कोयनेला जूनपासून ३५७१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. नवजाला ४६७९ आणि महाबळेश्वर येथे यावर्षी आतापर्यंत ४८१२ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे.

चौकट :

धोममध्ये १२, कण्हेरमध्ये ११ टीएमसी साठा...

गेल्या काही दिवसांत पावसाची उघडीप आहे. मात्र, पश्चिम भागातील प्रमुख धरणांत चांगला पाणीसाठा झालेला आहे. धोम धरणात ११.९७ टीएमसी इतका साठा आहे, तर कण्हेरमध्ये ८.९१, उरमोडी ८.४५, बलकवडीत ३.७४, तारळी धरणात ५.३२ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, खटाव तालुक्यातील येरळवाडी तलावात अवघा ६.४७ टक्के पाणीसाठा आहे.

...............................................................