शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
4
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
5
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
6
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
7
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
8
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
9
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
10
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
11
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
12
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
13
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
14
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
15
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
16
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
17
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
18
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
19
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
20
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी

वृक्ष संवर्धन करून निसर्गाची उपासना करावी : जयश्री गिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:25 IST

कुडाळ : जावली तालुक्यातील नागरिकांनी यावर्षीच्या पावसाळ्यात जास्तीत जास्त वृक्षारोपण करून त्या वृक्षांचे संवर्धन करत निसर्गाची उपासना करावी, ...

कुडाळ : जावली तालुक्यातील नागरिकांनी यावर्षीच्या पावसाळ्यात जास्तीत जास्त वृक्षारोपण करून त्या वृक्षांचे संवर्धन करत निसर्गाची उपासना करावी, असे आवाहन जावली पंचायत समितीच्या सभापती जयश्री गिरी यांनी केले.

सामाजिक वनीकरण परिक्षेत्र, जावली यांच्यातर्फे मोरघर (ता. जावली) येथील डोंगरखिंडीत जयश्री गिरी यांच्या हस्ते वन महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला जावलीचे तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी सतीश बुध्दे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने, सामाजिक वनीकरणचे वनक्षेत्रपाल महांतेश बगले, वनक्षेत्रपाल परदेशी, मोरघर सरपंच रंजना मोरे, वेण्णामाईचे अध्यक्ष सुरेश पार्टे, ग्रामसेवक गायकवाड, ग्रामस्थ, वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

जुलै महिना हा सामाजिक वनीकरण विभागामार्फत वन महोत्सव कालावधी म्हणून साजरा केला जातो. या कालावधीत समाजातील सर्व घटकांमार्फत तसेच सर्व शासकीय, निमशासकीय व अशासकीय संस्थांमार्फत वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविला जातो. यावेळी वृक्ष लागवडीमध्ये वड, आंबा, फणस, जांभूळ, आदी प्रजातीच्या उंच रोपांची लागवड करण्यात आली. या वृक्ष लागवड कार्यक्रमासाठी साताऱ्याचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक तुकाराम लंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक वनीकरण विभागाचे वनपाल सुनील चव्हाण, वनरक्षक अमर शिंदे, मोहन भिलारे यांनी विशेष परिश्रम घेतले.

(चौकट)

कन्या समृद्धी योजना

वन महोत्सव कालावधीत जास्तीत जास्त लोकांना वृक्ष लागवड करता यावी, यासाठी सामाजिक वनीकरणामार्फत सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच या कालावधीत मुलींच्या जन्माचा उत्सव साजरा करण्यासाठी ‘कन्या वनसमृद्धी योजना’ व्यापक स्वरुपात राबविली जाणार आहे.