शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

वाईच्या कृष्णा नदीला आले धोबी घाटाचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:36 IST

वाई : पाडव्याच्या मुहूर्तावर वाकळा धुण्याची लगबग सुरू झाली असून, वाईच्या कृष्णा नदीला धोबी घाटाचे स्वरूप आले आहे. ...

वाई : पाडव्याच्या मुहूर्तावर वाकळा धुण्याची लगबग सुरू झाली असून, वाईच्या कृष्णा नदीला धोबी घाटाचे स्वरूप आले आहे. पाडवा हा सन साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. पाडव्याच्या तोंडावर नागरिक घराची स्वच्छता करून वाकळा धूत असतात. घरातील देवतांसह कपडे, भांडी कृष्णा नदीवर आणून स्वच्छ धुवून मगच पाडव्याच्या उत्सवाला सुरुवात करतात.

अस्वच्छतेच्या विळख्यात कृष्णामाई अडकली आहे. कृष्णामाई स्वच्छतेसाठी वाईतील ज्या संस्थांनी, संघटनांनी, नगरपालिकेने जे अहोरात्र कष्ट उपसले ते वाया गेल्याची भावना वाईकरांमधून व्यक्त करण्यात येत आहे. संपूर्ण घाटावर धुतलेल्या वाकळा, ब्लँकेट, चादरी

वाळत टाकल्याने कपड्याचे आच्छादन निर्माण झाले होते. ज्या स्वच्छ पाण्यात राज्यभरातून आलेले नागरिक आंघोळ करीत आनंद घेत आहेत, ती स्वच्छता करण्यासाठी सेवा कार्य समितीने किती कष्ट उपसले आहेत. याची जाणीव या लोकांनी अस्वच्छता करताना लक्षात घेणे काळाची गरज आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. ही अतिशय गंभीर बाब असून याबाबत ठोस उपाय योजना करण्याचे गरज निर्माण झाली आहे. सण-उत्सवाच्या पूर्वसंध्येला पालिकेने गार्ड उभे करून कपडे धुण्यास मज्जाव करणे आवश्यक आहे. कृष्णा नदीला धोबी घाटाचे स्वरूप तर आले आहेच; परंतु नदीतून वाहणारे स्वच्छ पाणी अस्वच्छ होऊन त्याला ओंगळ स्वरूप आले आहे. अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण होत आहे. वाईला प्रसिद्ध संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत महागणपतीचे मंदिर याच घाटावर आहे.

लोकांनी कृष्णा नदी प्रदूषणमुक्त केली. कृष्णा नदी सेवा कार्य समिती गेल्या पाच वर्षांत दर रविवारी नदीवरील प्रत्येक घाटावर स्वच्छतेसाठी राबत असून, नदीवर घरातील कपडे धुऊन ती अस्वच्छ करण्यासाठी लोक पुढे येताना दिसत आहेत. या परंपरेला लोकांनी बाजूला सारण्याची गरज आहे. नागरिकांनी स्वतःच्या घरातील कपडे घरातच धुऊन नदी प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी वाईकरांमधून जोर धरू पाहत आहे. तसेच पालिका प्रशासनाने ठोस उपाय करून लोकांना नदीत कपडे धुण्यापासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न करावेत तरच ‘स्वच्छ वाहते, संथ वाहते कृष्णा माई’ हे ब्रीद वाक्य सत्यात उतरेल.

फोटो आहे :