शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी समविचारींसोबत; भाजप, काँग्रेस अन् सेनेचाही स्वबळाचा विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाई नगरपालिकेत बहुमत मिळूनदेखील नगराध्यक्ष पदापासून लांब राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्या पाच वर्षात त्याची किंमत मोजावी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वाई

नगरपालिकेत बहुमत मिळूनदेखील नगराध्यक्ष पदापासून लांब राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्या पाच वर्षात त्याची किंमत मोजावी लागली आहे. त्यामुळे यावेळी कोणताही धोका न पत्करता समविचारी पक्षांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस रिंगणात उतरणार आहे. भाजप सक्षम पर्याय शोधण्याच्या तयारीत असून, मिळणाऱ्या ताकदीवर या निवडणुकीतील त्यांची रणनीती स्पष्ट होईल. काँग्रेस आणि भाजप स्वतंत्र लढण्याचा विचार करत असले तरी शिवसेना परिस्थिती पाहून निर्णय घेणार आहे. त्यामुळे वाई नगरपालिकेच्या निवडणुकीत यावेळी जोरदार घमासान पहायला मिळणार आहे.

वाई नगरपालिका १८५५ साली स्थापन झाली. २०११ च्या जणगणनेनुसार वाई शहराची लोकसंख्या ३६०२५ आहे. २०१६ मधील निवडणुकीत राष्ट्रवादी प्रणित तीर्थक्षेत्र आघाडीने मुसंडी मारत २० पैकी १४ जागा पटकावल्या तर वाई विकास महाआघाडीने ६ जागा जिंकल्या; परंतु थेट जनतेतून फक्त एका मताची सरशी करून डॉ. प्रतिभा शिंदे निवडून आल्याने व एक मताने तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या शोभा रोकडेंचा झालेला पराभव राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागला होता; परंतु निवडून आल्यानंतर अवघ्या सहा महिन्यात नगराध्यक्ष डॉ प्रतिभा शिंदे या लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडल्याने अडचणी आल्या होत्या. त्याप्रकरणी पंधरा दिवसांपूर्वी राज्याच्या नगरविकास मंत्रालयाने त्यांना अपात्र ठरवल्याचा निर्णय दिल्याने उपनगराध्यक्ष अनिल सावंत यांना नगराध्यक्षपदी संधी मिळाल्याने राष्ट्रवादीमध्ये चैतन्याचे वातावरण असून, उर्वरित कालावधीत जास्तीत जास्त कामे मार्गी लावण्याचा सपाटा लावल्याचे चित्र पालिकेत दिसत आहे.

निवडणूक आयोगाने नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कच्च्या वॉर्ड रचना तयार करण्याचे निर्देश नुकतेच दिले आहेत. त्यामुळे वाई पालिका वर्तुळात राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत. निवडणुकीच्या संदर्भाने आराखडे होऊ लागले आहेत; पण या निवडणुकीत पक्षीय झेंडे झळकणार की पुन्हा आघाड्यांचेच राजकारण होणार, याबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. सुरुवातीच्या काळात पक्ष किंवा आघाडी असे राजकारण येथे होत नव्हते. मतदारसंघातील आमदारांच्या गटाचे वर्चस्व येथे राहिले आहे; पण १९९९ पासून पालिकेत आघाड्यांचे राजकारण सुरू झालेले दिसते. सन २०१६ साली झालेल्या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीर्थक्षेत्र विकास आघाडीने १४ जागा जिंकत बहुमत मिळवले तर दोन स्वीकृत नगरसेवक असे १६ संख्या झाली; पण भाजपच्या डॉ. प्रतिभा शिंदे यांनी थेट नगराध्यक्ष निवडणुकीत एका मताने सरशी करत मारलेली बाजी राष्ट्रवादीला अस्वस्थ करणारी होती, तसेच वाई विकास महाआघाडीच्या माध्यमातून ६ नगरसेवक निवडून आले. गतवेळी १० प्रभागातून २० नगरसेवक निवडून आले होते. यावर्षी प्रभाग रचनेत बदल होऊन सिंगल वॉर्ड रचना होण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे २० वॉर्डमधून प्रत्येकी एक नगरसेवक निवडला जाईल, अशी परिस्थिती आहे.

आगामी निवडणुकीच्या दृष्टीने आमदार मकरंद पाटील व नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी आघाडीचे संकेत दिले असून, परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, असे सुतोवाच केले आहे. काँग्रेसचे जिल्हा युवक अध्यक्ष विराज शिंदे व तालुकाध्यक्ष रवींद्र भिलारे तरुणांना संधी देऊन स्वबळावर सर्व जागा लढविणार असल्याची चर्चा आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष रोहिदास पिसाळ व शहराध्यक्ष राकेश फुले यांनीही भाजप सर्व जागा पक्षाच्या चिन्हावर लढणार असल्याची माहिती दिली. तर शिवसेनेचे तालुका अध्यक्ष अनिल शेंडे व शहराध्यक्ष किरण खामकर यांनी राष्ट्रवादीने सन्मानाने आघाडीमध्ये घेतले तर आघाडी अन्यथा स्वबळावर सर्व जागा लढविणार असल्याचे म्हटले आहे. आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात पक्षीय झेंडे खांद्यावर घेतले जाणार की पुन्हा आघाड्यांच्याच राजकारणाचा खेळ होणार, हे पाहावे लागणार आहे.

गत साडेचार वर्षांचा पालिकेतील कारभार पाहिला तर फक्त सत्तेचे त्रांगडे पाहायला मिळाले आहे. नगराध्यक्ष डॉ. प्रतिभा शिंदे यांच्याकडे बहुमत नसल्याने त्यांची कसरत वाईकरांनी पाहिली आहे. तर बहुमतात असलेल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीने त्यांना घेरण्याची एकही संधी सोडली नाही. अनेक वेळा आघाड्यांमध्ये झालेला संघर्ष वाईकरांनी पाहिला आहे. एकूणच वाई कृष्णातीरावर राष्ट्रवादी समविचारींना बरोबर घेण्याच्या विचारात आहे. भाजपा, काँगेस स्वबळावर पक्ष चिन्हावर तर शिवसेना सन्मानाने आघाडीत स्थान न मिळाल्यास सर्व जागा स्वबळावर लढणार असल्याने पालिकेच्या निमित्ताने कृष्णा तीरावर निवडणुकीचे घमासान होणार, हे मात्र पक्के आहे.

१. आघाड्यांमधील रस्सीखेच

साडेचार वर्षात तीर्थक्षेत्र विकास आघाडी व वाई विकास महाआघाडी यांच्यात अनेकदा झालेला टोकाचा संघर्ष वाईकरांनी पाहिला; परंतु विकासाच्या अनेक मुद्द्यावर एकत्र येत काही चांगले निर्णयही झाले.

२. गेल्या साडेचार वर्षात राज्य शासनाकडे पाठपुरावा करून आमदार मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरण तलाव, सोनगीरवाडी स्मशानभूमी, नावेचीवाडी येथील मुख्य रस्त्यावरील पूल, प्रत्येक प्रभागात व्यायामशाळा ही कामे पूर्ण झाली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे काम प्रगतीपथावर आहे तर किसनवीर चौकाला जोडणारा कृष्णा नदीवरील पंधरा कोटीचा पूल व फुलेनगर येथील किवऱ्या ओढ्यावरील चार कोटींचा पूल मंजूर झाला आहे. ही कामे मार्गी लागली असून, अजूनही वाईकर नाट्यगृह व क्रीडा संकुलच्या प्रतीक्षेत आहेत.

सध्याचे पक्षीय बलाबल

राष्ट्रवादी काँग्रेस - १४

भाजप - ६

स्वीकृत - २