शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पदासाठी मोर्चेबांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:26 IST

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीमध्ये खांदेपालट होणार आहे. पहिल्या कार्यकारिणीची मुदत संपल्याने आता नवीन अध्यक्ष, कार्याध्यक्ष तसेच ...

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीमध्ये खांदेपालट होणार आहे. पहिल्या कार्यकारिणीची मुदत संपल्याने आता नवीन अध्यक्ष, कार्याध्यक्ष तसेच इतर निवडी केल्या जाणार असल्याने आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांनी पदाधिकारी निवडीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष समिंद्रा जाधव यांची मुदत संपली असल्याने आता नव्याने पदाधिकारी निवडले जाणार आहेत. जिल्हा पदाधिकाऱ्यांची तसेच कार्यकारिणीची निवड झाल्यानंतर तालुका पातळीवरील निवडी होणार आहेत. या निवडी होईपर्यंत समिंद्रा जाधव या प्रभारी महिला आघाडी अध्यक्षा राहणार आहेत.

राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर, पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक उपाध्यक्ष भारती शेवाळे आणि जिल्हाध्यक्ष सुनील माने हे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती राष्ट्रवादी भवनमध्ये घेणार आहेत.

या निवडीसाठी जिल्ह्यातील इच्छुक कार्यकर्त्यांकडून अर्ज मागविले आहेत. राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयात अर्ज जमा करायचे असून महिलांनी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक या क्षेत्रामध्ये केलेल्या कामाबाबतची माहिती अर्जासोबत द्यायची आहे.

सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. संपूर्ण राज्यात पक्षाची सर्वांत जास्त ताकद ही सातारा जिल्ह्यातच आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषदेचे विविध गट तसेच लोकसभा, विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह सहकार क्षेत्रातील विविध संस्था या राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंड्याखाली आहेत.

दरम्यान, जिल्ह्यात राष्ट्रवादीचे प्राबल्य राहण्यामध्ये विद्यमान पदाधिकाऱ्यांचाही मोठा वाेटा आहे. समिंद्रा जाधव यांनी महिलांचे केलेले संघटन तसेच सत्तेत नसतानाही महिलांना सोबत घेऊन जनतेच्या हितासाठी आंदोलने केलेली होती. आता सत्ता असताना जाधव यांनाच मुदतवाढ द्यावी, अशी बहुतांश महिला कार्यकर्त्यांनी मागणी लावून धरलेली आहे. मात्र, राष्ट्रवादी हा पक्ष लोकशाही मूल्यानुसार चालतो, त्यामुळे मुदत संपल्यानंतर पुन्हा नव्याने मुलाखती घेतल्या जाणार आहेत. यामध्ये समिंद्रा जाधव यांच्यासह पक्षातील इतर इच्छुक महिलाही मुलाखतीला सामोऱ्या जाण्याची शक्यता आहे.

नवीन पदाधिकाऱ्यांवर कोणती जबाबदारी?

राष्ट्रवादी हा राज्याच्या सत्तेतील महत्त्वाचा पक्ष आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या विरोधकांची संख्या वाढते आहे. भाजपचे पदाधिकारी प्रबळरीत्या आंदोलने करून सरकारला जेरीस आणण्याची संधी सोडत नाहीत. आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद आणखी वाढवणे जरुरीचे असून, जनतेमध्ये सरकारविषयी विश्वास निर्माण करण्याचे मोठे आव्हान नवीन पदाधिकाऱ्यांसमोर असेल.