शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
5
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
6
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
7
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
8
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
9
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
10
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
11
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
12
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
13
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
14
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
15
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
16
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
17
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
18
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
19
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
20
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक

राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरील सेवा रस्त्याच्या चिंधड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:09 IST

पाचवड : आपण एखाद्या खेडेगावामधील, गल्ली-बोळातील रहदारीचे रस्ते उखडलेले आजपर्यंत पाहिले असतील. मात्र, इथे तर राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ ...

पाचवड : आपण एखाद्या खेडेगावामधील, गल्ली-बोळातील रहदारीचे रस्ते उखडलेले आजपर्यंत पाहिले असतील. मात्र, इथे तर राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरील उडतारे ते वीरमाडे दरम्यान असलेल्या सेवारस्त्याच्या अक्षरशः चिंधड्या झाल्या आहेत. हा सुमारे २०० मीटर अंतराचा रस्ता भेगाळलेला आहे. पावसाळ्यामध्ये उद्ध्वस्त होऊन खचलेल्या रस्त्याची गेल्या तीन ते चार महिन्यांत कोणतीही डागडुजी न झाल्याने या रस्त्याचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराच्या कामाचा निकृष्ट दर्जा व गलथानपणा पुन्हा एकदा लोकांसमोर आला आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ चे सहापदरीकरणाचे काम त्याच्या दर्जाबाबत सुरुवातीपासूनच प्रश्नांकित राहिले आहे. भुईंजमधील उड्डाणपूल ढासळणे, पाचवडमधील उड्डाणपुलास पडलेली भगदाड, सुरुरमधील अजूनही थरकाप करणारा उड्डाणपूल अशा अनेक घटनांनी या रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याची जणू साक्षच दिली आहे. यावर आता कळस म्हणजे उडतारे ते वीरमाडे दरम्यान पावसाळ्यात उद्ध्वस्त झालेला सुमारे २०० मीटर लांबीचा सेवारस्ता. या सेवारस्त्याची इतकी भयानक स्थिती झाली आहे की, जणू काही या ठिकाणी मोठा भूकंप झाला आहे. या रस्त्यावरून नागरिकांनी, येथील शेतकऱ्यांनी चालत ये - जा करणे म्हणजे जीव धोक्यात घालणे अशी भयावह स्थिती निर्माण झाली आहे. तरीही संबंधितांनी पावसाळा संपल्यानंतर या गंभीर बाबीची कोणतीही दखल न घेता या रस्त्याच्या डागडुजीकडे कानाडोळा केलेला दिसून येत आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अनेक लोकांना यमसदनी धाडणारा महामार्ग या घटनेने आणखी किती निष्पाप लोकांचे बळी घेणार आहे, अशी भीती येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

चौकट

सेवा रस्ता दुरुस्त न केल्यासा आंदोलन

सेवा रस्त्याचा उपयोग वीरमाडे, उडतारे, आनेवाडी येथील शेतकरी व नागरिक करतात. मात्र, हा रस्ताच उद्ध्वस्त झाल्याने रस्त्याकडेला असलेल्या शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल शेताबाहेर काढता येत नाही. त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. भविष्यात येथे काही अनुचित घटना घडल्यास त्यास संबंधित ठेकेदाराला जबाबदार धरावे व या सेवारस्त्याची डागडूजी त्वरित न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा येथील शेतकरी व नागरिकांनी दिला आहे.