शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

झेडपी मेंबर मंडळींची ‘नस्ती पंचायत’

By admin | Updated: June 1, 2016 00:58 IST

वडूज नगरपंचायतीचे परिणाम : गट-गण पुनर्रचनेची इच्छुकांना प्रतीक्षा; आपण कोठे जाणार, याबाबत नागरिकांमध्ये लावल्या जातायत पैजा

रशीद शेख -- औंध --वडूजला नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त झाल्याची अधिसूचना जारी झाल्यानंतर वडूज जिल्हा परिषद गट रद्द होऊन सिद्धेश्वर कुरोली गट होणार, मग त्यामध्ये वडूजचे कमी झालेले मतदान कोठे भरून काढणार? त्यासाठी लगतच औंध गटात काही बदल होऊन पुनर्रचना होणार का? अशा अनेक प्रश्नांमुळे झेडपी मेंबर मंडळींची ‘नस्ती पंचायत’ झाली आहे. याची खुमासदार चर्चाही सध्या औंध गटात सुरु झाली आहे.येत्या काही महिन्यावर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक येऊन ठेपली आहे. इच्छुकांनी प्रचारास सुरवात केली होती. त्यानिमित्ताने जेवणावळी, लग्न, पूजा, युवकांचे वाढदिवस अशा कार्यक्रमात आवर्जून हजेरी लावत असल्याचे पाहावयास मिळत होते; परंतु वडूज नगरपंचायत होणार, अशी काही दिवसांपूर्वी चर्चा सुरु असतानाच नगरपंचायत झाली अशी अधिसूचना जारी झाली व औंध आणि परिसरातील इच्छुक, कार्यकर्ते याच्या पैजा सुरु झाल्या आहेत. अगोदर आपण आपल्याच गटात आहे का बघा, मगच प्रचार करा, खर्च करा, असे सल्ले एकमेकांना दिले जात आहेत. राष्ट्रवादीचे राजेंद्र माने, हणमंतराव शिंदे, उपसभापती गणेश शिंदे, शिवसेनेचे वसंतराव गोसावी, भाजपचे राजाभाऊ देशमुख, काँग्रेसचे कळंबीचे सचिन घाडगे, भोसरेचे महादेव जाधव, लोणीचे ज्ञानेश्वर शिंदे, संभाजी फडतरे, लांडेवाडीचे अशोक सूर्यवंशी, जायगावच्या जिल्हा परिषद सदस्या सुंनदा राऊत, पळशीचे प्रकाश घार्गे, येळीवचे शिवाजी सर्वगोड, नांदोशीचे नवल थोरात, शिरसवडीचे विलास इंगळे, माजी सभापती सोनाली खैरमोडे यांच्यासह अनेकांनी अंतर्गत तयारी सुरु केली आहे. यातील काहींची पक्ष आदेशानुसार काम करण्याची तयारी आहे, तर काहींनी तिकीट मिळो अथवा ना मिळो आम्ही आहोतच फक्त आरक्षण पडण्याची वाट पाहतोय, असेही बोलून दाखविले. औंध गटातील दक्षिणेकडील काही गावे पुसेसावळी गटात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसचे सचिन घाडगे, बंडा मुलाणी यांची ‘वेट अँड वॉच’ची भूमिका तर औंध गटातील पळशी नजीकच्या गोपूज, गोसाव्याची वाडी गावांचा समावेश होण्याची शक्यता आहे. पूर्वेकडील खटाव गटातील विसापूर औंधमध्ये समाविष्ट होणार का, याबाबतही चर्चा सुरु आहे.जिल्हा परिषदेच्या रेसमध्ये असणारे विद्यमान सरपंच सागरभाऊ साळुंखे यांचे औंधचे वाढते दौरे बरेच काही सांगून जातात. त्यामुळे राष्ट्रवादीतील इच्छुकांची गोची होणार आहे.नगरपंचायतीच्या घोषणेमुळे सर्वच गटातील वातावरण ढवळून निघणार आहे. औंध गट याला अपवाद नाही. आता गट, गणांच्या पुनर्रचनेची इच्छुकांना, कार्यकत्यांना, मतदारांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.