शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
5
Irani Cup 2025 : मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
6
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
7
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
8
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
9
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
10
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
11
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
12
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
13
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
14
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
15
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
16
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
17
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
18
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
19
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
20
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?

झेडपी मेंबर मंडळींची ‘नस्ती पंचायत’

By admin | Updated: June 1, 2016 00:58 IST

वडूज नगरपंचायतीचे परिणाम : गट-गण पुनर्रचनेची इच्छुकांना प्रतीक्षा; आपण कोठे जाणार, याबाबत नागरिकांमध्ये लावल्या जातायत पैजा

रशीद शेख -- औंध --वडूजला नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त झाल्याची अधिसूचना जारी झाल्यानंतर वडूज जिल्हा परिषद गट रद्द होऊन सिद्धेश्वर कुरोली गट होणार, मग त्यामध्ये वडूजचे कमी झालेले मतदान कोठे भरून काढणार? त्यासाठी लगतच औंध गटात काही बदल होऊन पुनर्रचना होणार का? अशा अनेक प्रश्नांमुळे झेडपी मेंबर मंडळींची ‘नस्ती पंचायत’ झाली आहे. याची खुमासदार चर्चाही सध्या औंध गटात सुरु झाली आहे.येत्या काही महिन्यावर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक येऊन ठेपली आहे. इच्छुकांनी प्रचारास सुरवात केली होती. त्यानिमित्ताने जेवणावळी, लग्न, पूजा, युवकांचे वाढदिवस अशा कार्यक्रमात आवर्जून हजेरी लावत असल्याचे पाहावयास मिळत होते; परंतु वडूज नगरपंचायत होणार, अशी काही दिवसांपूर्वी चर्चा सुरु असतानाच नगरपंचायत झाली अशी अधिसूचना जारी झाली व औंध आणि परिसरातील इच्छुक, कार्यकर्ते याच्या पैजा सुरु झाल्या आहेत. अगोदर आपण आपल्याच गटात आहे का बघा, मगच प्रचार करा, खर्च करा, असे सल्ले एकमेकांना दिले जात आहेत. राष्ट्रवादीचे राजेंद्र माने, हणमंतराव शिंदे, उपसभापती गणेश शिंदे, शिवसेनेचे वसंतराव गोसावी, भाजपचे राजाभाऊ देशमुख, काँग्रेसचे कळंबीचे सचिन घाडगे, भोसरेचे महादेव जाधव, लोणीचे ज्ञानेश्वर शिंदे, संभाजी फडतरे, लांडेवाडीचे अशोक सूर्यवंशी, जायगावच्या जिल्हा परिषद सदस्या सुंनदा राऊत, पळशीचे प्रकाश घार्गे, येळीवचे शिवाजी सर्वगोड, नांदोशीचे नवल थोरात, शिरसवडीचे विलास इंगळे, माजी सभापती सोनाली खैरमोडे यांच्यासह अनेकांनी अंतर्गत तयारी सुरु केली आहे. यातील काहींची पक्ष आदेशानुसार काम करण्याची तयारी आहे, तर काहींनी तिकीट मिळो अथवा ना मिळो आम्ही आहोतच फक्त आरक्षण पडण्याची वाट पाहतोय, असेही बोलून दाखविले. औंध गटातील दक्षिणेकडील काही गावे पुसेसावळी गटात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसचे सचिन घाडगे, बंडा मुलाणी यांची ‘वेट अँड वॉच’ची भूमिका तर औंध गटातील पळशी नजीकच्या गोपूज, गोसाव्याची वाडी गावांचा समावेश होण्याची शक्यता आहे. पूर्वेकडील खटाव गटातील विसापूर औंधमध्ये समाविष्ट होणार का, याबाबतही चर्चा सुरु आहे.जिल्हा परिषदेच्या रेसमध्ये असणारे विद्यमान सरपंच सागरभाऊ साळुंखे यांचे औंधचे वाढते दौरे बरेच काही सांगून जातात. त्यामुळे राष्ट्रवादीतील इच्छुकांची गोची होणार आहे.नगरपंचायतीच्या घोषणेमुळे सर्वच गटातील वातावरण ढवळून निघणार आहे. औंध गट याला अपवाद नाही. आता गट, गणांच्या पुनर्रचनेची इच्छुकांना, कार्यकत्यांना, मतदारांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.