शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्याचे सांगत नरेंद्र पाटलांचा शिवसेनेला रामराम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:36 IST

सातारा : वेळोवेळी मागणी करूनदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माथाडींच्या प्रश्नांबाबत आपलेपणाने चौकशी केली नाही किंवा बैठकदेखील लावली नाही. ...

सातारा : वेळोवेळी मागणी करूनदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माथाडींच्या प्रश्नांबाबत आपलेपणाने चौकशी केली नाही किंवा बैठकदेखील लावली नाही. आता मी कोणाला भेटतो, कोणाशी बोलतो, याबाबतदेखील शिवसैनिक लक्ष देऊ लागले आहेत. त्यामुळे आता इथून पुढच्या काळात शिवसेनेत काम करणे जमणार नाही. पक्षातून बाहेर पडलेले बरे, असे म्हणत माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेला सूचक इशारा दिला आहे.

मुंबईत माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर माथाडींच्या प्रश्‍नांबाबत वर्षा किंवा सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घ्यावी, अशी विनंती केली होती. पण ती झाले नाही. त्यानंतर पुढच्या काळात मुख्यमंत्र्यांनी मला ए. पी. एम. सी. मार्केट सुरू करा, असे फोन करून सांगितले होते, त्यानुसार आम्ही त्यानंतर ए. पी. एम. सी. मार्केट सुरू केले. त्यानंतर माथाडी कामगारांच्या सेवेचा अत्यावश्यकमध्ये समावेश करून घ्यावा, असे सांगितले. पण, त्यांना वेळ भेटला नाही. माथाडींच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांनी कधीच वेळ दिला नाही. राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य आहे, ते मुख्यमंत्र्यांनी पार पाडले नाही.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर माथाडी कामगारांच्या प्रश्नांकडे मुख्यमंत्र्यांनी कधीही लक्ष दिले नाही. माथाडी चळवळ मोठी असून, या चळवळीचे प्रश्न समजून घेऊन खालच्या मंत्र्यांना आदेश देणे गरजेचे होते. पण, या प्रश्नासाठी त्यांनी कधी वेळच दिला नाही, असे सांगून नरेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्र्यांविषयी नाराजी व्यक्त केली. शिवसेनेच्या लोकांना माझ्यामुळे कमीपणा येत असेल तर मी अलिप्त राहिलेले बरे, असे स्पष्ट करत त्यांनी शिवसेना सोडून भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले.

माथाडी चळवळ मोठी असून, या चळवळीचे प्रश्न समजून घेऊन खालच्या मंत्र्यांना त्यांनी आदेश देणे गरजेचे होते. पण, या प्रश्नासाठी त्यांनी कधीच वेळ दिला नाही. त्यामुळे माझी मुख्यमंत्र्याकडे नाराजी आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले की, माझ्यावर शिवसेनेचे नरेंद्र पाटील अशी टीका होते. लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेत याचे कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांना माहीत आहे. मी केवळ हिंदुत्वाच्या विचारावर शिवसेनेत गेलो, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

उदयनराजे भोसले यांची अचानक महामार्गावर भेट झाल्यानंतर शिवसेनेचे नरेंद्र पाटील असा उल्लेख आवर्जून केला जातो. त्यांना भेटलो, हा माझा वैयक्तिक विषय आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जातो, हा माझा वैयक्तिक विषय आहे. याचा शिवसेनेशी काही संबंध नाही. शिवसेनेच्या लोकांना माझ्यामुळे का कमीपणा यावा, असा प्रश्न करून शिवसेनेच्या नेत्यांना मी जास्त मान देत नाही. माझे बोलणे फक्त एकनाथ शिंदे यांच्याशी होते. त्यामुळे मलाही वाटते. आपण अलिप्त राहिलेले बरे. त्यांनाही टीका-टिप्पणी नको. सामान्य शिवसैनिकांना ही नाराजी नको तर नेत्यांना फरक पडत नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या विचारांचा कट्टर कार्यकर्ता मी आहे. काय करायचे, काय नाही, हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. इतरांना त्याबाबत प्रश्न पडण्याचे कारण नाही, असे स्पष्टीकरणदेखील पाटील यांनी दिले.