शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

गावोगावी फिरणारा नंदीवाला चक्क भांडी कारखानदार

By admin | Updated: March 11, 2017 21:48 IST

स्वयंप्ररणेतूनच ‘आशीर्वाद’ नावाचा भांडी बनविण्याचा मोठा उद्योगच सुरू केला.

कायमचीच थांबली भटकंती : कष्ट करण्याची तयारी असल्याने कितीही लांबची उडी होते यशस्वी दिले दाखवूनबेलाच्या पाठीवर रंगीबेरंगी झूल, कमानीदार शिंगाना झुबकेदार बेगीड, गळ्यात घुंगराच्या माळा असा सजलेला नंदी आणि त्यासोबत खांद्यावर उपरणे घेऊन डोक्याला मुंडासे बांधलेला गावोगावी फिरणारा नंदीवाला म्हणजे ग्रामीण भागातील संस्कृतीचं वेगळं रूप! पण हीच संस्कृती जोपासताना पोटाची खळगी भरण्यासाठी आणि संसाराचा गाडा पुढे नेण्यासाठी अपार कष्टही त्यांच्याच भाळी लिहिलं असतं. चार-सहा भांडी डोक्यावरल्या पटीत टाकून ती गावोगावी विकण्याचा नंदीवाला समाजातील लोकांचा पारंपरिक व्यवसाय, यातूनच जमणाऱ्या तुटपुंज्या कमाईवर आयुष्याची वाट चालत राहायची हा शिरस्ता पाळला जायचा; मात्र याला छेद दिला तो खंडाळ्यातील हणमंतराव पवार यांनी.गावोगावी भांडी विकण्यासाठी करावी लागणारी पायपीट बंद करण्याच्या इराद्याने हणमंतराव पवार यांनी खंडाळ्यात छोटे दुकान सुरू केले. स्वयंप्ररणेतूनच ‘आशीर्वाद’ नावाचा भांडी बनविण्याचा मोठा उद्योगच सुरू केला. याच फॅक्टरीतील खेडोपाड्यातसह शहरातील स्टील सेंटर दुकानामधून पुरवठा होतात. त्यांनी पारंपरिक व्यवसायातून प्ररणा घेऊन नवउद्योगात घेतलेली ही भरारी समाजबांधवांना नवी दिशा देणारी ठरत आहे.ऐंशीच्या दशकात खंडाळ्यातील अनेक खेड्यातून पवार डोक्यावरून भांड्यांची पाटी घेऊन दारोदारी हिंडत होते. दिवसभराची पायपीट करून सायंकाळी घरी परतताना चार पैसे दिमतीला कसेबसे जमायचे. मात्र जिद्द न सोडता याच व्यवसायात वेगळे काही करण्याचा ध्यास त्यांनी जोपासला. खंडाळ्यात स्थिर झाल्यावर छोटेखानी भांड्याचे दुकानही सुरूही केले. मात्र, धडपड वेगळं काही करण्याची होती. पुणे शहरातून भांडी आणण्यापेक्षा आपणच ती बनवावी ही कल्पना मनात घर करून गेली आणि नव्या उद्योगाच्या प्रारंभाने उभारी घेतली. समाजातील बुजूर्गांच्या आशीर्वादाने ‘आशीर्वाद’ स्टील उद्योग वास्तवात साकारला गेला. शून्यातून निर्माण केलेल्या या उद्योगाने आज लाखोंची उड्डाणे घेतली आहेत. खंडाळ्यातून तयार होणारा माल आता सातारा, कोल्हापूर, पुणे, यासह अन्य शहरातही पोहोचला जातोय.भांडी विकणे हा आमचा पारंपरिक व्यवसाय होता. मात्र, तो मर्यादित होता. रोजच्या पोटापुरताच त्यामागे विचार असायचा; पण रोजची दगदग पिढ्यान्पिढ्या चालू ठेवणे योग्य नव्हते म्हणूनच वेगळा प्रयोग करण्याचं धाडस केलं. त्याला लोकांचा आशीर्वाद मिळाला. म्हणूनच हे यशश्वीरीत्या घडू शकलं.- हणमंतराव पवार, खंडाळादशरथ ननावरे