शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

गावोगावी फिरणारा नंदीवाला चक्क भांडी कारखानदार

By admin | Updated: March 11, 2017 21:48 IST

स्वयंप्ररणेतूनच ‘आशीर्वाद’ नावाचा भांडी बनविण्याचा मोठा उद्योगच सुरू केला.

कायमचीच थांबली भटकंती : कष्ट करण्याची तयारी असल्याने कितीही लांबची उडी होते यशस्वी दिले दाखवूनबेलाच्या पाठीवर रंगीबेरंगी झूल, कमानीदार शिंगाना झुबकेदार बेगीड, गळ्यात घुंगराच्या माळा असा सजलेला नंदी आणि त्यासोबत खांद्यावर उपरणे घेऊन डोक्याला मुंडासे बांधलेला गावोगावी फिरणारा नंदीवाला म्हणजे ग्रामीण भागातील संस्कृतीचं वेगळं रूप! पण हीच संस्कृती जोपासताना पोटाची खळगी भरण्यासाठी आणि संसाराचा गाडा पुढे नेण्यासाठी अपार कष्टही त्यांच्याच भाळी लिहिलं असतं. चार-सहा भांडी डोक्यावरल्या पटीत टाकून ती गावोगावी विकण्याचा नंदीवाला समाजातील लोकांचा पारंपरिक व्यवसाय, यातूनच जमणाऱ्या तुटपुंज्या कमाईवर आयुष्याची वाट चालत राहायची हा शिरस्ता पाळला जायचा; मात्र याला छेद दिला तो खंडाळ्यातील हणमंतराव पवार यांनी.गावोगावी भांडी विकण्यासाठी करावी लागणारी पायपीट बंद करण्याच्या इराद्याने हणमंतराव पवार यांनी खंडाळ्यात छोटे दुकान सुरू केले. स्वयंप्ररणेतूनच ‘आशीर्वाद’ नावाचा भांडी बनविण्याचा मोठा उद्योगच सुरू केला. याच फॅक्टरीतील खेडोपाड्यातसह शहरातील स्टील सेंटर दुकानामधून पुरवठा होतात. त्यांनी पारंपरिक व्यवसायातून प्ररणा घेऊन नवउद्योगात घेतलेली ही भरारी समाजबांधवांना नवी दिशा देणारी ठरत आहे.ऐंशीच्या दशकात खंडाळ्यातील अनेक खेड्यातून पवार डोक्यावरून भांड्यांची पाटी घेऊन दारोदारी हिंडत होते. दिवसभराची पायपीट करून सायंकाळी घरी परतताना चार पैसे दिमतीला कसेबसे जमायचे. मात्र जिद्द न सोडता याच व्यवसायात वेगळे काही करण्याचा ध्यास त्यांनी जोपासला. खंडाळ्यात स्थिर झाल्यावर छोटेखानी भांड्याचे दुकानही सुरूही केले. मात्र, धडपड वेगळं काही करण्याची होती. पुणे शहरातून भांडी आणण्यापेक्षा आपणच ती बनवावी ही कल्पना मनात घर करून गेली आणि नव्या उद्योगाच्या प्रारंभाने उभारी घेतली. समाजातील बुजूर्गांच्या आशीर्वादाने ‘आशीर्वाद’ स्टील उद्योग वास्तवात साकारला गेला. शून्यातून निर्माण केलेल्या या उद्योगाने आज लाखोंची उड्डाणे घेतली आहेत. खंडाळ्यातून तयार होणारा माल आता सातारा, कोल्हापूर, पुणे, यासह अन्य शहरातही पोहोचला जातोय.भांडी विकणे हा आमचा पारंपरिक व्यवसाय होता. मात्र, तो मर्यादित होता. रोजच्या पोटापुरताच त्यामागे विचार असायचा; पण रोजची दगदग पिढ्यान्पिढ्या चालू ठेवणे योग्य नव्हते म्हणूनच वेगळा प्रयोग करण्याचं धाडस केलं. त्याला लोकांचा आशीर्वाद मिळाला. म्हणूनच हे यशश्वीरीत्या घडू शकलं.- हणमंतराव पवार, खंडाळादशरथ ननावरे