शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
5
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
6
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
7
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
8
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
9
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
10
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
11
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
12
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
13
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
14
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
15
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
16
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
17
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
18
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
19
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
20
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!

मतदार यादीत फोटो नसणार यांची नावे वगळली जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:25 IST

सातारा : निवडणूक आयोगाच्यावतीने मतदार याद्यांमध्ये मतदारांचे फोटो देणे बंधनकारक केलेले आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदारांचे फोटो घेण्याची मोहीम ...

सातारा : निवडणूक आयोगाच्यावतीने मतदार याद्यांमध्ये मतदारांचे फोटो देणे बंधनकारक केलेले आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदारांचे फोटो घेण्याची मोहीम जोरदार सुरू आहे. एकूण मतदारांपैकी ३८ हजार १४९ मतदारांनी अद्यापही मतदान नोंदणी अधिकाऱ्यांकडे फोटो दिलेले नाहीत.

मतदार यादीमध्ये मतदारांचे फोटो आवश्यक आहेत. मागील काही निवडणुकांमध्ये मतदार यादीमध्ये फोटोच नसल्याने गोंधळ उडाला होता. मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांनी केंद्रप्रमुख यांनाच भेटीस धरण्याचा प्रकार जागोजागी घडला. त्यामुळे निवडणूक झाल्यानंतर मतदारांनी फोटो देण्याचे काम केले; परंतु अद्याप देखील बऱ्याच लोकांनी याबाबत गांभीर्याने घेतलेले दिसत नाही. जिल्हा प्रशासनाच्यावतीने मतदार नोंदणी तसेच ज्यांची पूर्वी नोंदणी झाले आहे अशा मतदारांची फोटो घेण्याचे काम सुरू ठेवले आहे. लोकांनी याबाबत गांभीर्याने घेणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांना मतदानासाठीदेखील मुकावे लागणार आहे किंवा त्यांची नावे वगळली जाण्याची शक्यतादेखील आहे.

जिल्ह्यातील एकूण मतदार

२५ लाख ५७ हजार ४०६

स्त्री मतदार : १२ लाख ५१ हजार २१५

पुरुष मतदार : १३ लाख ६ हजार १३२

विधानसभानुसार छायाचित्र नसलेले मतदार

फलटण ७४७३

वाई १७५०

कोरेगाव १६४३

माण ५४६५

कऱ्हाड उत्तर ८६७

कऱ्हाड दक्षिण २३२७

पाटण ४५२७

सातारा १४०९७

एकूण ३८१४९

छायाचित्रे नसलेले मतदार

स्त्री १८४७२

पुरुष १९६७७

कोट

मतदार यादीमध्ये मतदाराचा फोटो असणे बंधनकारक आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने याबाबतची कार्यवाही सुरू केलेली आहे. मतदारांनी गावामध्ये येणाऱ्या मतदान नोंदणी अधिकाऱ्याकडे स्वतःचा फोटो देणे आवश्यक आहे.

- नीता शिंदे, उपजिल्हाधिकारी, निवडणूक

छायाचित्र जमा न केल्यास मतदानाला मुकणार

मतदार यादीमध्ये मतदाराचे नाव आणि छायाचित्र असणे निवडणूक आयोगाने बंधनकारक केले आहे. याची मुदत जून अखेरपर्यंत होती. सध्या तरी प्रशासन सहकार्य करत आहे त्यानंतर मात्र वेळ देऊनदेखील मतदारांनी जरा गांभीर्याने घेतले नाही तर मतदानाला मुकू शकतात.

येथे जमा करा छायाचित्र

मतदारांना तालुक्याचे तहसील कार्यालय अथवा मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे आपले छायाचित्र जमा करता येईल. जिल्हा प्रशासनाच्या वतीने गेल्या काही महिन्यांपासून याबाबत वारंवार आवाहन करण्यात येत आहे.