शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

नाव पानटपरीचं.. आडोसा मटका व्यवसायाचा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:40 IST

सातारा : कोराेनाच्या गतवर्षाच्या उद्रेकानंतर शहरातील रस्त्यावर अन् गल्लोगल्ली पानटपऱ्या रातोरात ठेवल्या गेल्या. बेरोजगारांनी रोजीरोटीसाठी व्यवसायाचा आधार घेतला म्हणून ...

सातारा : कोराेनाच्या गतवर्षाच्या उद्रेकानंतर शहरातील रस्त्यावर अन् गल्लोगल्ली पानटपऱ्या रातोरात ठेवल्या गेल्या. बेरोजगारांनी रोजीरोटीसाठी व्यवसायाचा आधार घेतला म्हणून या पानटपऱ्यांकडे पोलिसांबरोबरच पालिकेेनेही कानाडोळा केला. पण हा कानाडोळा आता वेगळ्या वळणावर जाऊन ठेपला असून, व्यवसायाचं नाव पानटपरी असलं तर त्याच्या आडोशाला मात्र मटका व्यवसाय सुरू असल्याचे शहरात अनेक ठिकाणी पाहायला मिळतंय.

सातारा शहरामध्ये गत पाच वर्षांपूर्वी काही ठरावीक ठिकाणीच मटक्याचे अड्डे होते. त्यामुळे पोलिसांना छापा टाकणे सोपे जात होते. मात्र, गत वर्षभरापासून मटक्याचे अड्डे चारपटीने वाढले. जुन्या मटका व्यावसायिकांनी आपापल्या व्यवसायाची विभागणी करून पोट व्यावसायिक निर्माण केले. त्यामुळे शहरात सध्या बहुतांश पानटपरीच्या आडोशाने मटका व्यवसाय बोकाळल्याचे पहायला मिळत आहे. विशेषत: कोरोनाच्या शिरकावानंतर या पानटपऱ्या एखाद्या भुईचक्रासारख्या वाढल्या. अनेकांना वाटलं. बेरोजगार युवक पुढे येऊन काही तरी व्यवसाय करत आहेत. त्यामुळे त्यांचे काैतुकही झालं. यामध्ये अनेक व्यावसायिक असे आहेत की ते प्रामाणिक आपला व्यवसाय करत आहेत. मात्र, त्यापेक्षा पानटपरीच्या आडोशानं मटका व्यवसायात उतरलेल्या युवकांची संख्या अधिकच आहे.

पोलिसांकडून एकदिवसाआड कारवाई होत आहेच. परंतु तरीसुद्धा शहरातील मटका व्यवसाय पूर्णपणे बंद होत नाही. केवळ कारवाई झाल्यानंतर दोन ते तीन दिवस हा मटका व्यवसाय बंद होतो. पण पुन्हा त्याच जोमाने सुरू होतो. कारवाई करूनसुद्धा हे व्यवसाय पुन्हा सुरू होत असल्याने याचे कोडे काही सर्वसामान्य नागरिकांना उलगडत नाही. महिन्यात १८ ठिकाणी पोलिसांनी मटका अड्ड्यावर छापे टाकले आहेत. यातील सर्व ठिकाणे ही पानटपरीचा आडोसाच होती. शहरातील राजवाडा, समर्थ मंदिर, मोळाचा ओढा, शाहूपुरी, पोवई नाका, बसस्थानक, भूविकास बॅंक चाैक, विसावा नाका आदी परिसरातील पानटपऱ्या पोलिसांनी तपासणे गरजेचे आहे.

चाैकट :

..म्हणे अटकेची तरतूद नाही!

मटका खेळताना किंवा घेताना कोणी पोलिसांच्या तावडीत सापडला तर त्याला ताब्यात घेतले जाते. त्यानंतर त्याला नोटीस बजावून सोडून दिले जाते. म्हणे कायद्यात अटक करण्याची तरतूद नसते. त्यामुळे या मटका व्यवसायावर कितीही वेळा कारवाई केली तरी पुन्हा हे व्यवसाय सुरूच राहातात. फार फार तर अशा लोकांवर सहा महिने ते एक वर्षांसाठी हद्दपारीची कारवाई होते.