शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

म्युकरमायकोसिस झालं आता पोटदुखीच्या अ‍ॅटॅकचं दुखणं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोना विषाणू फुफ्फुसांवर हल्ला करतो हे सर्वज्ञात आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये विविध अवयवांवर हल्ला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोना विषाणू फुफ्फुसांवर हल्ला करतो हे सर्वज्ञात आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये विविध अवयवांवर हल्ला करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आतड्याचा रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या बंद झाल्याने जिल्ह्यात अनेक रुग्णांना पोटदुखीचा अ‍ॅटॅक येत आहे. प्रचंड वेदनादायी असलेली ही कोरोनापश्चात पोटदुखी अनेकांच्या त्रासाचे कारण बनू लागली आहे.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरीही पोस्ट कोरोनाचे दुखणे बळावू लागले आहे. पुरेशी काळजी आणि योग्य उपचार या दोन्हीमुळे हा त्रास कमी होऊ शकतो, असं वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. शास्त्रीय भाषेत या दुखण्याला ‘मायक्रो एम्बोलिझम’ म्हटले जाते. कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिसनंतर आता या पोटदुखीने ग्रासले आहे. अनेक रुग्ण यावर उपचार घेत आहेत.

किरकोळ स्वरूपातील पोटदुखीकडे दुर्लक्ष केलं तर पुढे शौचातून रक्त पडायला सुरुवात होते. हा या आजाराचा दुसरा टप्पा मानला जातो. आतड्याला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्या बंद झाल्याने शौचाच्या आतड्यात अंतर्गत रक्तस्त्राव होतो. हे रक्त शौचात आढळल्यानंतर घाबरून न जाता तातडीने तज्ज्ञांकडून उपचार घेणे महत्त्वाचे आहे. ४५ वर्षांच्या आतील वयोगटात हा आजार आढळून येत असल्याने पुरेशी काळजी घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

आतड्यांना छिद्र

पोटदुखीकडे दुर्लक्ष केल्यानंतर शौचातून रक्त पडण्याचा त्रास होतो. अनेकदा हे मूळव्याधीमुळे होत असल्याने त्या पध्दतीने औषधोपचार केले जातात. आतड्यांना रक्तपुरवठा होत नसल्याने आतडे काळे पडून त्यावर छिद्र पडल्याचेही काही रुग्णांमध्ये आढळून आले आहे. हे गँगरीनसारखे असल्याचे आढळून येते.

पॉईंटर :

ही काळजी घ्या

पावसाच्या दिवसांत पचनसंस्था संथ झालेली असते. कोरोनामधून बरे झालेल्यांनी पचायला हलका आणि सात्विक आहार घ्यायला प्राधान्य द्यावे. या दिवसात बाहेरील अन्नपदार्थ आणि पाणी पिणं टाळावं. पाण्याची पातळी राखण्यासाठी नियमित किमान चार लीटर पाणी पिल्याने शरिरातील विषाणूंचा लोड कमी होतो.

पॉईंटर :

यासाठी तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घ्या

तीव्र पोटदुखी

जुलाब

उलटी

शौचातून रक्त पडणं

ताप येणं

पोट फुगणं

बेशुध्द होणं

कोट :

पावसाळ्याची सुरुवात झाल्यानंतर खाण्यात वेगळं आलं म्हणून पोटदुखीकडे कानाडोळा करण्यात येतो. याचा परिणाम आतड्यांवरही होऊ लागला आहे. किरकोळ स्वरूपात दुखणं असलं तरीही तज्ज्ञांकडे जाऊन त्याची चिकित्सा करणं गरजेचं बनलं आहे. पहिल्या टप्प्यात यावर उपचार विनासायास करणं सहज शक्य आहे.

- डॉ. संदीप श्रोत्री,

पोटविकारतज्ज्ञ, सातारा