शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
7
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
8
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
9
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
10
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
11
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
12
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
13
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
15
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
16
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
17
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
18
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
19
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
20
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान

वडिलांनी राष्ट्रगीत पाठ करून घेतले..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:39 IST

संडे स्पेशल स्टोरी सचिन काकडे भारत स्वातंत्र्य होताच सर्वत्र आनंदाला उधाण आले होते. ठिकठिकाणी भारताचा राष्ट्रध्वज दिमाखात फडकत होता. ...

संडे स्पेशल स्टोरी

सचिन काकडे

भारत स्वातंत्र्य होताच सर्वत्र आनंदाला उधाण आले होते. ठिकठिकाणी भारताचा राष्ट्रध्वज दिमाखात फडकत होता. राष्ट्रगीत अंगात नवचेतना जागृत करत होते. त्या आठवणी आजही मनाला आनंद देऊन जातात. असे सांगतानाच साताऱ्यातील ज्येष्ठ कर सल्लागार व चित्रपट निर्माता अरुण गोडबोले यांनी स्वातंत्र्यदिन व त्यानंतरच्या काही आठवणींना उजाळा दिला.

ते म्हणाले, भारताला स्वातंत्र्य काही सहजासहजी मिळाले नाही. यासाठी अनेक वर्ष आपल्याला ब्रिटिश राजवटीविरुद्ध संघर्ष करावा लागला. स्वातंत्र्याच्या लढाईत अनेक शूरवीरांना प्राणाची आहुतीदेखील द्यावी लागली. यानंतर कुठे भारत ब्रिटिशांच्या बेडीतून मुक्त झाला. आज या घटनेला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा मी अगदी तीन वर्षांचा होतो. माझे वडील रा. ना. गोडबोले स्वातंत्र्य सैनिक होते. स्वातंत्र्यापूर्वी व त्यानंतर घडलेल्या काही घटना त्यांनी मला सांगितल्या होत्या. काही घटना आजही माझ्या स्मरणात आहेत. अजिंक्यतारा किल्ल्यावरील मंगळाई देवीच्या मंदिराजवळ दरवर्षी १५ ऑगस्टला राष्ट्रध्वज फडकवला जायचा. ही प्रथा अनेक वर्ष सुरू होती. मी वडिलांसोबत स्वातंत्र्यदिनाला येथे जात असे. साताऱ्यातील आत्ताची गोलबाग ही पूर्वी जवाहर बाग म्हणून ओळखली जायची. या बागेतदेखील दर वर्षी ध्वजारोहणाचा कार्यक्रम होत असे. येथेही मी न चुकता जायचो. एक गोष्ट मला सांगावीशी वाटते, ती म्हणजे वडिलांनी माझ्याकडून राष्ट्रगीत पाठ करून घेतलं होतं. तेही वयाच्या चौथ्या वर्षी. त्या काळी नेहरू शर्ट, गांधी टोपी, जॅकेट असा मुलांचा पेहराव प्रसिद्ध झाला होता. असाच पेहराव करून वडील मला ध्वजारोहनासाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात घेऊन गेले होते. कार्यक्रम झाल्यानंतर ते मला हुबळी नावाच्या कलेक्टर साहेबांकडे घेऊन गेले. वडिलांनी त्यांना आवर्जून सांगितले की ''हा माझा मुलगा आहे आणि हा राष्ट्रगीत गातो'' कलेक्टरांनी मला लगेचच राष्ट्रगीत गायला सांगितले आणि मी गाऊन दाखविले. कलेक्टर साहेब जितके आनंदी झाले त्याहून अधिक आनंद माझ्या वडिलांना झाला होता. कलेक्टरांनी मला बक्षीस म्हणून चॉकलेट खाऊ दिला. त्यानंतर वडील मला जवाहर बागेजवळ असलेल्या किरण कलामंदिर नावाच्या एका फोटो स्टुडिओत घेऊन गेले. तिथे त्यांनी माझा ब्लॅक अँड व्हाईट फोटो काढून घेतला. तो फोटो मी आजही संग्रहित करून ठेवला आहे. हा फोटो पाहिला की जुन्या आठवणी पुन्हा नव्याने जाग्या होतात.

चौकट :

तुला स्वातंत्र्याची किंमत नाही का..

राष्ट्रध्वज सूर्यास्तापूर्वी उतरवणे क्रमप्राप्त आहे. हे वडिलांनी ठणकावून सांगितले होते. या नियमांचे मी काटेकोर पालन करत होतो; परंतु एकदा चुकून राष्ट्रध्वज खांबावरून उशिरा उतरविला गेला. ही गोष्ट जेव्हा वडिलांना समजली तेव्हा त्यांनी मला खडेबोल सुनावले होते. ‘तुला स्वातंत्र्याची किंमत नाही का’ हे वडिलांचे शब्द मला आजही आठवतात. जसजसा काळ बदलत गेला तसतशा काही जुन्या आठवणी विस्मृतीत गेल्या. मात्र माझ्या आठवणीतला स्वातंत्र्यदिन मी कधीच विसरू शकत नाही, असे अरुण गोडबोले यांनी सांगितले.

दोन फोटो मेल