शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
4
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
5
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
6
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
7
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
8
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
9
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
10
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
11
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
12
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
13
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
14
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
15
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
16
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
17
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
18
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
19
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
20
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?

खून प्रकरणातील सूत्रधाराचे पलायन

By admin | Updated: July 19, 2015 00:40 IST

वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना प्रकार

सातारा : आरळे (ता. सातारा) येथील बजरंग जगन्नाथ गायकवाड (वय ३१) याचा खून केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या अक्षय लालासो पवार (२०, रा. खंडोबाचा माळ, सातारा) या संशयित मुख्य सूत्रधाराने शनिवारी दुपारी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केले. या घटनेमुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली असून, आरोपी अक्षय पवारचा पोलीस कसून शोध घेत आहेत. जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून बजरंग गायकवाड याचे दि. २६ मार्चला गावातून अपहरण करण्यात आले होते. त्याचा तपास करताना भयानक क्रौर्य समोर आले होते. बजरंगला अंभेरी घाटात नेऊन दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर साताऱ्यात आणून एका खोलीत कोंडून ठेवण्यात आले होते. तेथेच त्याचा मृत्यू झाला होता. हे लक्षात येताच आरोपींनी मृतदेह अंभेरी घाटात नेऊन जाळला होता. याप्रकरणी पोलिसांनी वासुदेव शिवाजी जांभळे (२२, रा. रहिमतपूर), आकाश शरद सोनटक्के (२८, रा. बारावकरनगर, सातारा), राजेंद्र ऊर्फ वैभव रामराव पवार (४५, रा. खेड, ता. सातारा) यांना अटक केली होती. मात्र, या घटनेपासून मुख्य सूत्रधार अक्षय पवार हा फरार होता. शनिवारी तो कोरेगाव तालुक्यातील डोळेगाव येथील एका पोल्ट्री फार्मवर आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पोलीस तेथे तत्काळ पोहोचले. त्याला ताब्यात घेऊन साताऱ्यात आणले. दुपारी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. वैद्यकीय तपासणीचे कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करण्यात येत होते. याचवेळी अक्षयने पोलिसांच्या हाताला हिसका देऊन रुग्णालयातून धूम ठोकली. त्याच्या पाठोपाठ पोलीस धावत सुटले; मात्र तो सापडला नाही. खून प्रकरणातील आरोपी रुग्णालयातून पळाल्याचे समजताच जिल्हा पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली. स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीच्या शोधासाठी दोन पथके तयार करून विविध ठिकाणी रवाना केली. रात्री उशिरापर्यंत अक्षयचा पोलीस शोध घेत होते. (प्रतिनिधी)