शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

खून प्रकरणातील सूत्रधाराचे पलायन

By admin | Updated: July 19, 2015 00:40 IST

वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना प्रकार

सातारा : आरळे (ता. सातारा) येथील बजरंग जगन्नाथ गायकवाड (वय ३१) याचा खून केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या अक्षय लालासो पवार (२०, रा. खंडोबाचा माळ, सातारा) या संशयित मुख्य सूत्रधाराने शनिवारी दुपारी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केले. या घटनेमुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली असून, आरोपी अक्षय पवारचा पोलीस कसून शोध घेत आहेत. जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून बजरंग गायकवाड याचे दि. २६ मार्चला गावातून अपहरण करण्यात आले होते. त्याचा तपास करताना भयानक क्रौर्य समोर आले होते. बजरंगला अंभेरी घाटात नेऊन दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर साताऱ्यात आणून एका खोलीत कोंडून ठेवण्यात आले होते. तेथेच त्याचा मृत्यू झाला होता. हे लक्षात येताच आरोपींनी मृतदेह अंभेरी घाटात नेऊन जाळला होता. याप्रकरणी पोलिसांनी वासुदेव शिवाजी जांभळे (२२, रा. रहिमतपूर), आकाश शरद सोनटक्के (२८, रा. बारावकरनगर, सातारा), राजेंद्र ऊर्फ वैभव रामराव पवार (४५, रा. खेड, ता. सातारा) यांना अटक केली होती. मात्र, या घटनेपासून मुख्य सूत्रधार अक्षय पवार हा फरार होता. शनिवारी तो कोरेगाव तालुक्यातील डोळेगाव येथील एका पोल्ट्री फार्मवर आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पोलीस तेथे तत्काळ पोहोचले. त्याला ताब्यात घेऊन साताऱ्यात आणले. दुपारी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. वैद्यकीय तपासणीचे कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करण्यात येत होते. याचवेळी अक्षयने पोलिसांच्या हाताला हिसका देऊन रुग्णालयातून धूम ठोकली. त्याच्या पाठोपाठ पोलीस धावत सुटले; मात्र तो सापडला नाही. खून प्रकरणातील आरोपी रुग्णालयातून पळाल्याचे समजताच जिल्हा पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली. स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीच्या शोधासाठी दोन पथके तयार करून विविध ठिकाणी रवाना केली. रात्री उशिरापर्यंत अक्षयचा पोलीस शोध घेत होते. (प्रतिनिधी)