शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

मुंबईकर बाधित झाले पण;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोनाच्या पहिल्या लाटेत सुरक्षित असलेला ग्रामीण भाग दुसऱ्या लाटेत मात्र असुरक्षित असल्याचे सध्या दिसून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोनाच्या पहिल्या लाटेत सुरक्षित असलेला ग्रामीण भाग दुसऱ्या लाटेत मात्र असुरक्षित असल्याचे सध्या दिसून येत आहे. याचे कारण म्हणजे मुंबई-पुण्याहून लक्झरी बस अक्षरश: प्रवाशांनी तुडुंब भरून रातोरात ग्रामीण भागात येऊ लागल्या आहेत. यातील एकाही प्रवाशाची प्रशासनाकडे नोंद नाही ना त्याची चाचणी केली गेली. त्यामुळे मुंबई- पुण्याहून आलेले प्रवासी बाधित असूनही त्याची आकडेवारी मात्र वेगळी प्रशासनाकडे नसल्यामुळे साराच सावळा गोंधळ आहे.

सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये सध्या मुंबईहून लक्झरी बस गावी येत आहेत. विशेष म्हणजे मुंबईपासून गावी येईपर्यंत त्यांना वाटेत कोणी कसे काय, ई पास मागत नाही की, तुम्हाला परवानगी आहे का, याची विचारणा करत नाही. याचे आश्चर्य गावकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. काही मुंबईकर अगोदरच कोरोनाबाधित असतात. गावी आल्यानंतर ते इकडून तिकडे फिरत असतात. त्यामुळे संसर्ग अधिकच फैलावत आहे. गावातील कोणी त्यांना बोलले तर वादावादीचे प्रसंग उद्भवतात. त्यामुळे त्यांना कोणीही बोलत नाही. गाव पातळीवरील समितीही काही ठिकाणी तोंड पाहून कोरोनाची जनजागृती करत असतात. जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये सध्या ७८९० रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये स्थानिक किती आणि मुंबई पुण्याहून आलेले किती अशी वर्गवारी प्रशासनाने केली नाही. त्यामुळे साराच गोंधळ आहे. आता रात्रीचा पोलीस बंदोबस्त जिल्ह्याच्या सीमेवर वाढवण्यात आला आहे.

गतवर्षी ग्रामीण भागामध्ये कोरोना फारसा नव्हता. यावर्षी कोरोनाची लागण केवळ पुणे- मुंबईहून आलेल्या प्रवाशांमुळे झाली आहे. त्यांना गतवर्षीसारखे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले नव्हते. याचे गंभीर परिणाम आपल्या लोकांना भोगावे लागत असल्याचे उत्तम वाघ (रा. तारळे) यांनी सांगितले.

गतवर्षी गावामध्ये आडवे बांबू लावून वाहतूक अडवण्यात आली होती; पण यंदा असे काहीच करण्यात आले नाही. त्यामुळे पुणे मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त होती, असे संदीप साळुंखे (रा. कडवे बुद्रुक, ता. पाटण) यांनी सांगितले.

आम्ही मुंबईहून येताना कोरोना चाचणी केली होती. त्यामुळे आम्ही गावी आलो आहोत (रा. कडवे बुद्रुक) असे सुधीर कदम सांगतात. तर नागठाणे येथील सर्जेराव माने यांनी सांगितले की, मुंबईहून गावी येणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी कोरोना चाचणी केली पाहिजे. आपण जर चाचणी केली नाही तर घरातील लोकांचा जीव आपण धोक्यात घालत आहोत, हे लक्षात ठेवले पाहिजे.