शहरं
Join us  
Trending Stories
1
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
2
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
3
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
4
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
5
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
6
'पाश्चिमात्य दबावातही भारत-रशिया संबंध मजबूत', अमेरिकेचा उल्लेख करत रशियाची मोठी प्रतिक्रिया
7
Nashik: येवल्यात छगन भुजबळांच्या 'पंच'मुळे उद्धवसेना 'सलाइन'वर, 'शिंदेसेने'लाही दिला शह
8
एकनाथ शिंदेंच्या तक्रारीनंतर अमित शाहांकडून रवींद्र चव्हाणांची पाठराखण; "पक्षबांधणी सुरूच ठेवा..."
9
२० दिवसापूर्वीच थार घेतलेली, कोकणात फिरण्यासाठी निघाले होते, चौघांचा मृतदेह सापडला, दोनजण बेपत्ता; ओळख पटली, नाव आली समोर
10
Pune Hit And Run: टेम्पोने उडवले, सात वर्षाच्या अनुरागने जागेवरच सोडला जीव, आजोबा आणि भाऊ थोडक्यात बचावले
11
इंग्रज ढासळले...! ब्रिटिश इंडियन्स, उद्योजक ब्रिटन सोडू लागले! अब्जाधीश हरमन नरुला दुबईला स्थायिक होणार
12
“मनसेचा आघाडीचा प्रस्ताव नाही, आम्हाला महाराष्ट्र धर्म शिकवू नये”; काँग्रेस नेत्यांचे उत्तर
13
निवडणूक न लढताच 'जीन्स-शर्ट'मधील तरुणाने घेतली मंत्रिपदाची शपथ! कोण आहेत दीपक प्रकाश?
14
IND vs SA: रोहित-विराट पुन्हा संघात दिसणार, बुमराह बाहेर जाणार; 'या' खेळाडूचाही पत्ता कट?
15
IIT दिल्लीमध्ये देशातील पहिल्या ‘Gen-Z पोस्ट ऑफिस’ची सुरुवात; Wifi, QR द्वारे पार्सल बुकिंग
16
"आता मैदान मोकळं, बघू कोण येतंय!"; संरक्षणातील पोलिसांना परत पाठवत जरांगेंचे आव्हान
17
Tesla Model Y सेफ्टी टेस्टमध्ये 'Pass' की 'Fail'? 5-स्टार रेटिंगमध्ये किती पॉइंट्स मिळाले? जाणून घ्या
18
“बिहारने जंगलराज नाकारून विकासाला मत दिले”; शिंदेंनी केले PM मोदी-नितीश कुमारांचे अभिनंदन
19
Metaचे मोठे पाऊल! WhatsApp मध्ये लवकरच येणार 'हे' जबरदस्त फीचर; वारंवार लॉग-इन करण्याची कटकट संपणार
20
मुलांच्या भविष्यासाठी सोने की SIP? 'या' दोन्ही पर्यायांचे फायदे-तोटे समजून घ्या आणि योग्य गुंतवणूक निवडा!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईकर बाधित झाले पण;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोनाच्या पहिल्या लाटेत सुरक्षित असलेला ग्रामीण भाग दुसऱ्या लाटेत मात्र असुरक्षित असल्याचे सध्या दिसून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोनाच्या पहिल्या लाटेत सुरक्षित असलेला ग्रामीण भाग दुसऱ्या लाटेत मात्र असुरक्षित असल्याचे सध्या दिसून येत आहे. याचे कारण म्हणजे मुंबई-पुण्याहून लक्झरी बस अक्षरश: प्रवाशांनी तुडुंब भरून रातोरात ग्रामीण भागात येऊ लागल्या आहेत. यातील एकाही प्रवाशाची प्रशासनाकडे नोंद नाही ना त्याची चाचणी केली गेली. त्यामुळे मुंबई- पुण्याहून आलेले प्रवासी बाधित असूनही त्याची आकडेवारी मात्र वेगळी प्रशासनाकडे नसल्यामुळे साराच सावळा गोंधळ आहे.

सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये सध्या मुंबईहून लक्झरी बस गावी येत आहेत. विशेष म्हणजे मुंबईपासून गावी येईपर्यंत त्यांना वाटेत कोणी कसे काय, ई पास मागत नाही की, तुम्हाला परवानगी आहे का, याची विचारणा करत नाही. याचे आश्चर्य गावकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. काही मुंबईकर अगोदरच कोरोनाबाधित असतात. गावी आल्यानंतर ते इकडून तिकडे फिरत असतात. त्यामुळे संसर्ग अधिकच फैलावत आहे. गावातील कोणी त्यांना बोलले तर वादावादीचे प्रसंग उद्भवतात. त्यामुळे त्यांना कोणीही बोलत नाही. गाव पातळीवरील समितीही काही ठिकाणी तोंड पाहून कोरोनाची जनजागृती करत असतात. जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये सध्या ७८९० रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये स्थानिक किती आणि मुंबई पुण्याहून आलेले किती अशी वर्गवारी प्रशासनाने केली नाही. त्यामुळे साराच गोंधळ आहे. आता रात्रीचा पोलीस बंदोबस्त जिल्ह्याच्या सीमेवर वाढवण्यात आला आहे.

गतवर्षी ग्रामीण भागामध्ये कोरोना फारसा नव्हता. यावर्षी कोरोनाची लागण केवळ पुणे- मुंबईहून आलेल्या प्रवाशांमुळे झाली आहे. त्यांना गतवर्षीसारखे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले नव्हते. याचे गंभीर परिणाम आपल्या लोकांना भोगावे लागत असल्याचे उत्तम वाघ (रा. तारळे) यांनी सांगितले.

गतवर्षी गावामध्ये आडवे बांबू लावून वाहतूक अडवण्यात आली होती; पण यंदा असे काहीच करण्यात आले नाही. त्यामुळे पुणे मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त होती, असे संदीप साळुंखे (रा. कडवे बुद्रुक, ता. पाटण) यांनी सांगितले.

आम्ही मुंबईहून येताना कोरोना चाचणी केली होती. त्यामुळे आम्ही गावी आलो आहोत (रा. कडवे बुद्रुक) असे सुधीर कदम सांगतात. तर नागठाणे येथील सर्जेराव माने यांनी सांगितले की, मुंबईहून गावी येणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी कोरोना चाचणी केली पाहिजे. आपण जर चाचणी केली नाही तर घरातील लोकांचा जीव आपण धोक्यात घालत आहोत, हे लक्षात ठेवले पाहिजे.