शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

धोम-बलकवाडीचे गढूळ पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आदर्की : दुष्काळी फलटण तालुक्यासाठी धोम-बलकवडी धरणातून कालव्यात सोडण्यात आलेले पाणी मोठ्या प्रमाणात गढूळ झाले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

आदर्की : दुष्काळी फलटण तालुक्यासाठी धोम-बलकवडी धरणातून कालव्यात सोडण्यात आलेले पाणी मोठ्या प्रमाणात गढूळ झाले आहे. हे पाणी शेतीला तारक ठरणारे असले तरी दुसरीकडे ग्रामपंचायतींकडे पाणी शुध्द करण्याची यंत्रणा नसल्याने ते आरोग्याला मारक ठरणार असल्याचे चित्र दिसत आहे.

फलटण तालुक्यातील गावे दुष्काळी होती. केंद्र व राज्य सरकारने पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी धोम-बलकवडीचे पाणी फलटण तालुक्यात आणले. ३१ डिसेंबर २०११ रोजी आदर्कीच्या माळावर धोम-बलकवडीच्या पाण्याचे पूजन विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभेचे माजी सभापती दिवंगत शंकरराव जगताप, रोजगार हमी योजनेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रीय काँग्रेसचे जेष्ठ नेते दिवंगत चिमणराव कदम यांच्या हस्ते करण्यात आले. धोम-बलकवडी कालव्यामुळे तालुका टँकरमुक्त झाला. कालव्यातील पाण्यामुळे शेतीही पिकू लागली. हेच पाणी कालव्यातून ओढ्याला सोडले जायचे. पुढे याचा पाण्याचा सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीतून पिण्यासाठी पुरवठा केला जायचा. गेल्या काही वर्षांपासून ग्रामस्थांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत होते; परंतु अलीकडे कालव्याच्या पाण्याबरोबर लाल माती वाहून आल्याने पाणी मोठ्या प्रमाणात गढूळ झाले आहे.

कालव्याचे पाणी शेतीसाठी सोडण्यात आले आहे; पण फलटण तालुक्यात वितरिका व पोट कालव्याची कामे अपूर्ण आहेत. हे गढूळ पाणी खासगी व सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीत सोडले जाणार आहे. मात्र अनेक ग्रामपंचायतींकडे पाणी शुध्द करण्याची यंत्रणा नसल्याने हे पाणी शेतीला तारक तर आरोग्याला मारक ठरणार आहे. याबाबत उपाययोजना करणे गरजेचे आहे.

फोटो : १५ आदर्की

फलटण तालुक्यात धोम-बलकवडी कालव्यातून गढूळ पाणी वाहत आहे. (छाया : सूर्यकांत निंबाळकर)