शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

धोम-बलकवाडीचे गढूळ पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आदर्की : दुष्काळी फलटण तालुक्यासाठी धोम-बलकवडी धरणातून कालव्यात सोडण्यात आलेले पाणी मोठ्या प्रमाणात गढूळ झाले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

आदर्की : दुष्काळी फलटण तालुक्यासाठी धोम-बलकवडी धरणातून कालव्यात सोडण्यात आलेले पाणी मोठ्या प्रमाणात गढूळ झाले आहे. हे पाणी शेतीला तारक ठरणारे असले तरी दुसरीकडे ग्रामपंचायतींकडे पाणी शुध्द करण्याची यंत्रणा नसल्याने ते आरोग्याला मारक ठरणार असल्याचे चित्र दिसत आहे.

फलटण तालुक्यातील गावे दुष्काळी होती. केंद्र व राज्य सरकारने पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी धोम-बलकवडीचे पाणी फलटण तालुक्यात आणले. ३१ डिसेंबर २०११ रोजी आदर्कीच्या माळावर धोम-बलकवडीच्या पाण्याचे पूजन विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभेचे माजी सभापती दिवंगत शंकरराव जगताप, रोजगार हमी योजनेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रीय काँग्रेसचे जेष्ठ नेते दिवंगत चिमणराव कदम यांच्या हस्ते करण्यात आले. धोम-बलकवडी कालव्यामुळे तालुका टँकरमुक्त झाला. कालव्यातील पाण्यामुळे शेतीही पिकू लागली. हेच पाणी कालव्यातून ओढ्याला सोडले जायचे. पुढे याचा पाण्याचा सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीतून पिण्यासाठी पुरवठा केला जायचा. गेल्या काही वर्षांपासून ग्रामस्थांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत होते; परंतु अलीकडे कालव्याच्या पाण्याबरोबर लाल माती वाहून आल्याने पाणी मोठ्या प्रमाणात गढूळ झाले आहे.

कालव्याचे पाणी शेतीसाठी सोडण्यात आले आहे; पण फलटण तालुक्यात वितरिका व पोट कालव्याची कामे अपूर्ण आहेत. हे गढूळ पाणी खासगी व सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीत सोडले जाणार आहे. मात्र अनेक ग्रामपंचायतींकडे पाणी शुध्द करण्याची यंत्रणा नसल्याने हे पाणी शेतीला तारक तर आरोग्याला मारक ठरणार आहे. याबाबत उपाययोजना करणे गरजेचे आहे.

फोटो : १५ आदर्की

फलटण तालुक्यात धोम-बलकवडी कालव्यातून गढूळ पाणी वाहत आहे. (छाया : सूर्यकांत निंबाळकर)