शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

धोम-बलकवाडीचे गढूळ पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आदर्की : दुष्काळी फलटण तालुक्यासाठी धोम-बलकवडी धरणातून कालव्यात सोडण्यात आलेले पाणी मोठ्या प्रमाणात गढूळ झाले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

आदर्की : दुष्काळी फलटण तालुक्यासाठी धोम-बलकवडी धरणातून कालव्यात सोडण्यात आलेले पाणी मोठ्या प्रमाणात गढूळ झाले आहे. हे पाणी शेतीला तारक ठरणारे असले तरी दुसरीकडे ग्रामपंचायतींकडे पाणी शुध्द करण्याची यंत्रणा नसल्याने ते आरोग्याला मारक ठरणार असल्याचे चित्र दिसत आहे.

फलटण तालुक्यातील गावे दुष्काळी होती. केंद्र व राज्य सरकारने पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी धोम-बलकवडीचे पाणी फलटण तालुक्यात आणले. ३१ डिसेंबर २०११ रोजी आदर्कीच्या माळावर धोम-बलकवडीच्या पाण्याचे पूजन विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभेचे माजी सभापती दिवंगत शंकरराव जगताप, रोजगार हमी योजनेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रीय काँग्रेसचे जेष्ठ नेते दिवंगत चिमणराव कदम यांच्या हस्ते करण्यात आले. धोम-बलकवडी कालव्यामुळे तालुका टँकरमुक्त झाला. कालव्यातील पाण्यामुळे शेतीही पिकू लागली. हेच पाणी कालव्यातून ओढ्याला सोडले जायचे. पुढे याचा पाण्याचा सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीतून पिण्यासाठी पुरवठा केला जायचा. गेल्या काही वर्षांपासून ग्रामस्थांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत होते; परंतु अलीकडे कालव्याच्या पाण्याबरोबर लाल माती वाहून आल्याने पाणी मोठ्या प्रमाणात गढूळ झाले आहे.

कालव्याचे पाणी शेतीसाठी सोडण्यात आले आहे; पण फलटण तालुक्यात वितरिका व पोट कालव्याची कामे अपूर्ण आहेत. हे गढूळ पाणी खासगी व सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीत सोडले जाणार आहे. मात्र अनेक ग्रामपंचायतींकडे पाणी शुध्द करण्याची यंत्रणा नसल्याने हे पाणी शेतीला तारक तर आरोग्याला मारक ठरणार आहे. याबाबत उपाययोजना करणे गरजेचे आहे.

फोटो : १५ आदर्की

फलटण तालुक्यात धोम-बलकवडी कालव्यातून गढूळ पाणी वाहत आहे. (छाया : सूर्यकांत निंबाळकर)