शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

‘एमएसआयसी’ करतोय चिमुकल्यांच्या हृदयावर विपरीत परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:26 IST

सातारा : कोरोनाच्या जोखडातून मुक्त झालेल्या बालकांना मल्टिसिस्टिम इन्फ्लमेंटरी सिंड्रोम अर्थात ‘एमएसआयसी’ हा आजार होत असल्याचे आढळून येत आहे. ...

सातारा : कोरोनाच्या जोखडातून मुक्त झालेल्या बालकांना मल्टिसिस्टिम इन्फ्लमेंटरी सिंड्रोम अर्थात ‘एमएसआयसी’ हा आजार होत असल्याचे आढळून येत आहे. बऱ्याचदा कोरोनामुक्तीनंतर काही आठवड्यांनी या आजाराची लक्षणे जाणवत आहे. यामुळे चिमुकल्यांच्या हृदयावर विपरीत परिणाम होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

कोरोनाच्या पहिल्या लाटेने लोकांना घाबरवले तर दुसऱ्या लाटेने सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणले. दुसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोना संगर्स जास्त झाला. लाट काहीशी ओसरत असताना कोरोना पश्चात आजार समोर येत आहेत. यात ‘एमएसआयसी’ने सर्वांचीच चिंता वाढवली आहे.

मल्टिसिस्टीिम इन्फ्लमेंटरी सिंड्रोम या आजारात तीव्र ताप येतो. वेळीच निदान न झाल्यास शरीरावर चट्टे उठणे, डायरिया, वारंवार शौचास होणे, चक्कर येणे, अशक्तपणा जाणवणे, श्वास घेता न येणे असा त्रास होऊ शकतो. याशिवाय कोरोनरी आर्टरची समस्याही उदभवत आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर पालकांनी लहान मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. हा आजार ० ते १८ वर्षे वयोगटातील लहान मुलांमध्ये होऊ शकतो. ज्या मुलांना आधीपासून कोणताही आजार असल्यास अशा मुलांना याचा धोका सर्वाधिक संभवतो. तुलनेने नवजात बालकांमध्ये हा आजार फारच दुर्मिळ आहे.

कोरोना बाधित झाल्यानंतर त्यातून बरे होणाऱ्यांना या आजाराने ग्रासले आहे. साधारण दोन ते पाच आठवड्यांनी या आजाराची लक्षणे दिसू लागतात. सहा वर्षांखालील मुलांच्या तुलनेत ६ ते १२ वर्षे वयोगटात या आजाराचे प्रमाण दुप्पट आणि १२ ते १८ या किशोरवयीन वयोगटात हे प्रमाण सर्वाधिक आहे. मध्यम स्वरूपाच्या आजारासाठी स्टेरॉईड्स तर तीव्र स्वरूपाच्या आजारात इम्युनोग्लोब्युलिन हे औषध सर्वाधिक उपयुक्त ठरत आहे.

चौकट

ही काळजी घ्या

मुलांना मास्कशिवाय बाहेर पडू देऊ नका

कोरोनातून बरे झालेल्या मुलांकडेही लक्ष ठेवा

कुठलेही लक्षण आढळल्यास डॉक्टरांना दाखवा

‘एमएसआयसी’ची अशी आहेत लक्षणे :

खूप ताप येणे, तो पाच दिवसांपर्यंत कमी न होणे

पोटात सतत दुखणे

डोळे लाल होणे

मळमळ, उलट्या होणे, त्वचेवर ‘रॅशेस’ पडणे

पॉइंटर

कोरोनाचे एकूण रुग्ण : १ लाख ८९ हजार ५८३

कोरोनावर मात केलेले रुग्ण :१ लाख ७६ हजार ६१३

जिल्ह्यात एकूण कोरोना मृत्यू : ४३०३

उपचार घेत असलेले रुग्ण : ८७२४

कोट :

कोरोना मुक्तीनंतर मुलांना कोणताही आजार होऊ नये यासाठी रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी आहारात योग्य तो बदल करणे आवश्यक आहे. मुलांच्या झोपेच्या वेळा, पौष्टिक आहार आणि नियमित व्यायामाकडे लक्ष देणे आवश्यक आहे, सार्वजनिक ठिकाणी मुलांना फिरायला घेऊन जाणे शक्यतो टाळणे आवश्यक आहे. योग्य निदान आणि वेळेवर उपचार झाले तर या आजाराला घाबरण्याचे काहीच कारण नाही.

- डॉ. भास्कर यादव, बालरोगतज्ज्ञ, सातारा