शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

वीज जोडणी तोडल्यास महावितरणची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:36 IST

कोपर्डे हवेली : महावितरण कंपनीने कृषिपंपांची आणि घरगुती विजेची जोडणी तोडू नये अन्यथा होणाऱ्या परिणामाला महावितरण कंपनी जबाबदार राहील, ...

कोपर्डे हवेली : महावितरण कंपनीने कृषिपंपांची आणि घरगुती विजेची जोडणी तोडू नये अन्यथा होणाऱ्या परिणामाला महावितरण कंपनी जबाबदार राहील, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे आणि शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे महावितरणला दिला आहे. कोयना दूध संघाचे संचालक सुदाम चव्हाण, रयत क्रांतीचे कऱ्हाड तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील, शामगावचे प्रल्हाद पाटील, युवराज पोळ, पार्लेचे सुभाष नलवडे, टेंभूचे नागराज शिंदे, आदी शेतकरी उपस्थित होते.

रयत क्रांती संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे की, कृषिपंपाची वीज जोडणी तोडणे, ट्रान्सफाॅर्मर बंद करुन वीजबिलाच्या वसुलीचा तगादा लावला जात आहे. शेतकरी लाॅकडाऊन आणि अतिवृष्टीमुळे आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे बिले भरण्यास सक्षम नाही.

सध्या जिल्ह्यामध्ये एकाही साखर कारखान्याने ऊसाची एफआरपी शेतकऱ्यांना दिलेली नाही. सरकार आणि सरकारमधील मंत्री यावर कोणतेही कारवाई करत नाहीत. परंतु, शेतकऱ्यांची वीजबिले थकली म्हणून वीज जोडणी तोडली जात आहे. शासनाने अगोदर साखर कारखान्यांवर कारवाई करावी आणि मगच विजेच्या बिलाची वसुली करावी. वीज जोडणी तोडली तर होणाऱ्या परिणामाला शासन आणि महावितरण कंपनी जबाबदार राहील.

सध्या उन्हाळा असल्याने शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडू नये अन्यथा रयत क्रांती संघटनेच्यावतीने शेतकऱ्यांना बरोबर घेऊन सरकार व महावितरण कंपनीविरोधात तीव्र आंदोलन येणाऱ्या काळात केले जाईल व त्याची सर्व जबाबदारी सरकार आणि महावितरणची असेल, असे दिलेल्या निवेदनात म्हटले असून, त्यावर शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

फोटो ओळ - ओगलेवाडी येथे कार्यकारी अभियंता यांना सचिन नलवडे, सुदाम चव्हाण, शिवाजी पाटील व शेतकऱ्यांनी निवेदन दिले.