शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

वीज जोडणी तोडल्यास महावितरणची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:36 IST

कोपर्डे हवेली : महावितरण कंपनीने कृषिपंपांची आणि घरगुती विजेची जोडणी तोडू नये अन्यथा होणाऱ्या परिणामाला महावितरण कंपनी जबाबदार राहील, ...

कोपर्डे हवेली : महावितरण कंपनीने कृषिपंपांची आणि घरगुती विजेची जोडणी तोडू नये अन्यथा होणाऱ्या परिणामाला महावितरण कंपनी जबाबदार राहील, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे आणि शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे महावितरणला दिला आहे. कोयना दूध संघाचे संचालक सुदाम चव्हाण, रयत क्रांतीचे कऱ्हाड तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील, शामगावचे प्रल्हाद पाटील, युवराज पोळ, पार्लेचे सुभाष नलवडे, टेंभूचे नागराज शिंदे, आदी शेतकरी उपस्थित होते.

रयत क्रांती संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे की, कृषिपंपाची वीज जोडणी तोडणे, ट्रान्सफाॅर्मर बंद करुन वीजबिलाच्या वसुलीचा तगादा लावला जात आहे. शेतकरी लाॅकडाऊन आणि अतिवृष्टीमुळे आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे बिले भरण्यास सक्षम नाही.

सध्या जिल्ह्यामध्ये एकाही साखर कारखान्याने ऊसाची एफआरपी शेतकऱ्यांना दिलेली नाही. सरकार आणि सरकारमधील मंत्री यावर कोणतेही कारवाई करत नाहीत. परंतु, शेतकऱ्यांची वीजबिले थकली म्हणून वीज जोडणी तोडली जात आहे. शासनाने अगोदर साखर कारखान्यांवर कारवाई करावी आणि मगच विजेच्या बिलाची वसुली करावी. वीज जोडणी तोडली तर होणाऱ्या परिणामाला शासन आणि महावितरण कंपनी जबाबदार राहील.

सध्या उन्हाळा असल्याने शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडू नये अन्यथा रयत क्रांती संघटनेच्यावतीने शेतकऱ्यांना बरोबर घेऊन सरकार व महावितरण कंपनीविरोधात तीव्र आंदोलन येणाऱ्या काळात केले जाईल व त्याची सर्व जबाबदारी सरकार आणि महावितरणची असेल, असे दिलेल्या निवेदनात म्हटले असून, त्यावर शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

फोटो ओळ - ओगलेवाडी येथे कार्यकारी अभियंता यांना सचिन नलवडे, सुदाम चव्हाण, शिवाजी पाटील व शेतकऱ्यांनी निवेदन दिले.