शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

जिल्हाधिकारी साहेब... गोरगरिबांचा तळतळाट नका घेऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:26 IST

सातारा : ‘जिल्हाधिकारी साहेब जरा मार्केटमध्ये फिरा... सकाळच्या वेळेत मंडईत हजारो लोक रस्त्यावर असतात. हॉटेल सुरू ठेवण्यास परवानगी देता ...

सातारा : ‘जिल्हाधिकारी साहेब जरा मार्केटमध्ये फिरा... सकाळच्या वेळेत मंडईत हजारो लोक रस्त्यावर असतात. हॉटेल सुरू ठेवण्यास परवानगी देता अन्‌ कपड्याची दुकाने बंद ठेवता, असा उरफाटा न्याय का करताय.. कुणाचं तरी ऐकून गोरगरिबांचा तळतळाट घेऊ नका,’ अशा शब्दांत हॉकर्स संघटनेचे अध्यक्ष संजय पवार यांनी संताप व्यक्त केला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवस सर्वच बंद ठेवावे, अशी मागणीही त्यांनी केली.

जिल्हा चौथ्या टप्प्यात गेल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारपासून निर्बंध आणखी कडक केले असून, नुकतीच उघडलेली दुकानेही आता बंद राहणार आहेत. हातगाडी चालकांचे तर जगणेच अवघड होऊन बसले आहे. काही गोष्टींवर निर्बंध घालत असताना जीवनावश्यक नसलेल्या गोष्टींना परवानगी दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाविरोधात हॉकर्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामध्ये हॉटेल, रेस्टॉरंटमधून पार्सल सेवा सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. मटण, चिकन व अंडी यांची विक्री करणारी दुकाने देखील सुरू ठेवली. मात्र, कपड्यांची दुकाने, हॉकर्स यांना वस्तू विक्रीला मज्जाव करण्यात आल्याने जिल्हाधिकाऱ्यांचा हा अजब न्याय आहे, याची लाज वाटत असल्याची टीका संजय पवार यांनी केली.

संजय पवार माध्यम प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले की, हॉटेलमधील पदार्थ विकता येतात, मटण, चिकन, अंडी विकण्यास परवानगी देता, तेव्हा मार्केटमध्ये फिरून जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती घ्यायला हवी. कार्यालयात बसून आदेश काढण्यात त्यांना स्वारस्य आहे. गोरगरिबांच्या जीवावर उठू नका. गरिबांवर बंधने घालत असताना कारखानदारांना मात्र सूट देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात ४० अटी घातल्या आहेत.

कृष्णा कारखान्याची निवडणूक होती, तोपर्यंत सगळे सुरळीतपणे सुरू होते. ही निवडणूक पार पडताच पुन्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांचा कर्ता-करविता धनी कोण, हे जनतेला माहिती आहे. पालकमंत्र्यांच्या हातातील ते बाहुले झाले आहेत, अशी टीका देखील सातारा हॉकर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय पवार यांनी केली आहे.

हातगाडाचालक हतबल

हातगाड्यावर वस्तू ठेवून शहरभर फिरून त्याची विक्री करणारे हातगाडाचालक सध्या हतबल अवस्थेत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून त्यांचे अर्थकारण बिघडले आहे. सततच्या लॉकडाऊनमुळे त्यांची आर्थिक कोंडी होऊन बसली असून, बाजारपत राहिलेली नाही. उधारीने व्यापारी माल देत नाहीत. आता कुटुंब कसे चालवायचे? हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न आहे. कोरोनाचे नियम पाळून या गरिबांना माल विक्रीला परवानगी दिली नाही तर हे लोक मोडून पडतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.