शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
3
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
4
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
5
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
7
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
8
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
9
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
10
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
11
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
12
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
13
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
14
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
15
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
16
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
17
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
18
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
19
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
20
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

युवापिढीच्या पुढाकाराने रक्तदान बनली चळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:26 IST

काही वर्षांपूर्वी रक्तदानाबाबत अनेक गैरसमज होते. त्यामुळे रक्तदान करायला कोणीही धजावत नव्हते. रक्तदानासाठी जनजागृती करावी लागत होती. मात्र, तरीही ...

काही वर्षांपूर्वी रक्तदानाबाबत अनेक गैरसमज होते. त्यामुळे रक्तदान करायला कोणीही धजावत नव्हते. रक्तदानासाठी जनजागृती करावी लागत होती. मात्र, तरीही त्याला म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळत नव्हता. शासकीय आणि अशासकीय पेढ्यांमध्ये ठरावीक प्रमाणातच रक्तसाठा उपलब्ध असायचा. कालांतराने परिस्थिती बदलली. अनेक जण स्वयंप्रेरणेने रक्तदान करू लागले. साहजिकच रक्तसाठा वाढायला सुरुवात झाली. मात्र, पुरेशा प्रमाणात साठा उपलब्ध होण्यासाठी रक्तदानाला चळवळीचे स्वरूप प्राप्त होणे गरजेचे होते. केवळ शिबिरात येऊन रक्तदान करणार्‍यांबरोबरच स्वेच्छेने अशी शिबिर आयोजित करून, त्यामध्ये इतरांना रक्तदानासाठी प्रेरित करणे आवश्यक होते आणि हेच काम तरुणपिढीने हाती घेतले.

गत काही वर्षांपासून तरुणांचे अनेक ग्रुप रक्तदान शिबिरांचे आयोजन करीत आहेत. काही ग्रुप तर केवळ रक्तदान करण्याच्या उद्देशानेच तयार करण्यात आले आहेत. या ग्रुपमध्ये युवकांबरोबरच युवतींचाही सहभाग आहे. वेगवेगळ्या दिनाचे औचित्य साधून, या युवक-युवतींकडून रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात येतात. स्वतः रक्तदान करण्याबरोबरच ते इतरांनाही रक्तदानासाठी प्रेरित करतात. ज्यामुळे ब्लड बँकांना पुरेशा प्रमाणात रक्ताचा साठा उपलब्ध होत आहे.

रक्तदान चळवळीत सोशल मीडिया प्रभावी माध्यम ठरताना दिसत आहे. रक्तदान करणाऱ्या युवकांचे वेगवेगळे ग्रुप सोशल मीडियावर कार्यरत आहेत. या ग्रुपमध्ये दररोज कोणत्या रुग्णालयात कोणत्या रक्तगटाची आवश्यकता आहे, याची माहिती पाठविली जाते. आणि शक्य असणारे युवक-युवती संबंधित रुग्णालयात जाऊन तातडीने रक्तदान करतात. ज्यामुळे गरजू रुग्णाला तातडीने रक्त उपलब्ध होऊन त्याला जीवदान मिळते.

- संजय पाटील

- कोट

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. युवापिढीला रक्तदानाचे महत्त्व समजले असून, अनेक युवक व युवती स्वतःहून रक्तदान करण्यासाठी पुढे येतात. आमच्या ग्रुपमध्ये अनेक जण सहभागी असून, ते स्वयंप्रेरणेने रक्तदान शिबिरांमध्ये सहभागी होत आहेत. ही चळवळ आणखी व्यापक होणे गरजेचे आहे.

- परेश कांबळे, गरज रक्ताची संघटना

- चौकट

अनेकांना वाटते भीती

बहुतांश युवक-युवती निरोगी आयुष्य जगत असतात. त्यामुळे त्यांना इंजेक्शन घेण्याची कधीही गरज पडत नाही. त्यामुळे पहिल्यांदा रक्तदान करताना या युवक आणि युवतींना भीती वाटते. अनेक जण याच भीतीमुळे रक्तदान करणे टाळतात. मात्र, एकदा ही भीती दूर झाली की, रक्तदानासाठी ते स्वतःहून पुढाकार घेतात. सध्या अनेकांनी या भीतीवर मात केली असून, वारंवार रक्तदान शिबिरामध्ये ते सहभागी होत आहेत.