शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आईची काळजी वाढली; काळजावर दगड ठेवून मुलांना पाठविले शाळेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोना महामारीमुळे अजूनही बऱ्याचशा शाळा बंद आहेत. काही पालकांच्या संमतीनंतरच जिल्ह्यातील आठवी ते बारावीचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोना महामारीमुळे अजूनही बऱ्याचशा शाळा बंद आहेत. काही पालकांच्या संमतीनंतरच जिल्ह्यातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू केले आहेत. काही पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्यास नकार दिला असला, तरी ज्या पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्यास परवानगी दिली आहे, त्या मुलांच्या आईच्या चिंतेत भर पडली आहे.

ज्या गावांत कोरोनाचा एकही रुग्ण नाही, त्या गावांत आठवीपासूनचे वर्ग भरविण्यास शासनाने परवानगी दिली आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत नुकताच सर्व्हे करण्यात आला. संबंधित गावांमध्ये एक महिना कोरोनाबाधित रुग्ण न आढळल्याने जिल्ह्यातील ५२ गावांमध्ये शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला आहे.

ग्रामीण भागात शिकवणी वर्गावर खर्च करणेही अनेकांना परवडत नाही. यामुळे आपण मुलांना शाळेत पाठविण्याचा निर्णय घेतल्याचे काही पालकांनी सांगितले. मुलांच्या भवितव्याचा विचार करून ग्रामीण भागातील पालकांनी त्यांच्या मुला-मुलींना शाळेत पाठविण्यास तयारी दर्शविली आहे. आपल्या पाल्यांना शिकविणारा शिक्षक शहरातून येजा करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी लागून राहणार, असे विचार पालकांनी ‘लोकमत’ला सांगितले.

चौकट :

शाळेत पाठविताना ही काळजी घ्याच

शाळेत गेल्यानंतर एका बाकावर एकच विद्यार्थ्याने बसावे.

सुट्टीत डबा खाण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावेत.

सुरक्षित अंतर पाळावे आणि मास्क वापरावा.

घरी गेल्यावर मास्क, कपडे गरम पाण्यात धुवावेत.

मुलांना स्वच्छ आंघोळ करावी.

मुलाला सर्दी, खोकला असेल तर शाळा टाळावी.

पॉइंटर :

जिल्ह्यातील एकूण शाळा : ८३०

सुरू झालेल्या शाळा : ००

शाळा सुरू करण्यासाठी अनुकूल : ५२

शाळांकडून प्राप्त माहिती : ४७०

आठवी ते बारावी विद्यार्थ्यांची संख्या : २,०३,५०६

कोट :

कोरोना परिस्थितीमुळे दीड वर्षापासून शाळा बंद होत्या. आता माझा मुलगा दहावीत गेलाय. त्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या वळणावर त्याचे शिक्षण होऊ शकले नाही. ऑनलाइन अभ्यास समजून घेण्याचा त्याचा प्रयत्न असला, तरीही वर्गातल्या शिक्षणाला सर नाही, पण तरीही कोरोनाची मनात भीतीही आहे.

- अर्चना देशमुख, संभाजीनगर

मुलांच्या शाळा सुरू झाल्या, तरी पहिल्यासारखे निश्चिंत राहता येत नाही. आता अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. माझी मुलगी आठवीच्या वर्गात आहे. ऑनलाइन वर्ग सुरू असले, तरीही त्यात समजण्याचा गोंधळ होतोय. शाळेत जाताना तिने कोणती काळजी घ्यावी, याची माहिती तिला वारंवार द्यावी लागणार आहे, घरी आल्यावरही आंघोळ करण्याची सवय तिला लावावी लागेल.

- आस्मा पटेल, आई, विलासपूर.