शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

आईची काळजी वाढली; काळजावर दगड ठेवून मुलांना पाठविले शाळेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोना महामारीमुळे अजूनही बऱ्याचशा शाळा बंद आहेत. काही पालकांच्या संमतीनंतरच जिल्ह्यातील आठवी ते बारावीचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोना महामारीमुळे अजूनही बऱ्याचशा शाळा बंद आहेत. काही पालकांच्या संमतीनंतरच जिल्ह्यातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू केले आहेत. काही पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्यास नकार दिला असला, तरी ज्या पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्यास परवानगी दिली आहे, त्या मुलांच्या आईच्या चिंतेत भर पडली आहे.

ज्या गावांत कोरोनाचा एकही रुग्ण नाही, त्या गावांत आठवीपासूनचे वर्ग भरविण्यास शासनाने परवानगी दिली आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत नुकताच सर्व्हे करण्यात आला. संबंधित गावांमध्ये एक महिना कोरोनाबाधित रुग्ण न आढळल्याने जिल्ह्यातील ५२ गावांमध्ये शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला आहे.

ग्रामीण भागात शिकवणी वर्गावर खर्च करणेही अनेकांना परवडत नाही. यामुळे आपण मुलांना शाळेत पाठविण्याचा निर्णय घेतल्याचे काही पालकांनी सांगितले. मुलांच्या भवितव्याचा विचार करून ग्रामीण भागातील पालकांनी त्यांच्या मुला-मुलींना शाळेत पाठविण्यास तयारी दर्शविली आहे. आपल्या पाल्यांना शिकविणारा शिक्षक शहरातून येजा करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी लागून राहणार, असे विचार पालकांनी ‘लोकमत’ला सांगितले.

चौकट :

शाळेत पाठविताना ही काळजी घ्याच

शाळेत गेल्यानंतर एका बाकावर एकच विद्यार्थ्याने बसावे.

सुट्टीत डबा खाण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावेत.

सुरक्षित अंतर पाळावे आणि मास्क वापरावा.

घरी गेल्यावर मास्क, कपडे गरम पाण्यात धुवावेत.

मुलांना स्वच्छ आंघोळ करावी.

मुलाला सर्दी, खोकला असेल तर शाळा टाळावी.

पॉइंटर :

जिल्ह्यातील एकूण शाळा : ८३०

सुरू झालेल्या शाळा : ००

शाळा सुरू करण्यासाठी अनुकूल : ५२

शाळांकडून प्राप्त माहिती : ४७०

आठवी ते बारावी विद्यार्थ्यांची संख्या : २,०३,५०६

कोट :

कोरोना परिस्थितीमुळे दीड वर्षापासून शाळा बंद होत्या. आता माझा मुलगा दहावीत गेलाय. त्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या वळणावर त्याचे शिक्षण होऊ शकले नाही. ऑनलाइन अभ्यास समजून घेण्याचा त्याचा प्रयत्न असला, तरीही वर्गातल्या शिक्षणाला सर नाही, पण तरीही कोरोनाची मनात भीतीही आहे.

- अर्चना देशमुख, संभाजीनगर

मुलांच्या शाळा सुरू झाल्या, तरी पहिल्यासारखे निश्चिंत राहता येत नाही. आता अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. माझी मुलगी आठवीच्या वर्गात आहे. ऑनलाइन वर्ग सुरू असले, तरीही त्यात समजण्याचा गोंधळ होतोय. शाळेत जाताना तिने कोणती काळजी घ्यावी, याची माहिती तिला वारंवार द्यावी लागणार आहे, घरी आल्यावरही आंघोळ करण्याची सवय तिला लावावी लागेल.

- आस्मा पटेल, आई, विलासपूर.