शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

सर्वाधिक वृक्ष लागवड फलटणमध्ये...

By admin | Updated: June 29, 2016 23:58 IST

जिल्ह्यात पावणे सात लाख झाडे : वाई तालुक्यात सर्वात कमी लागण होणार

सातारा : हरित महाराष्ट्राची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी दुष्काळी असणाऱ्या फलटण तालुक्यात सर्वाधिक एक लाखाहून अधिक तर माणमध्ये ९८ तर खटावमध्ये ९१ हजारांवर वृक्षाची लागवड करण्यात येणार आहे. तर संपूर्ण जिल्ह्यात ६ लाख ७८ हजार झाडे लावण्यात येणार आहेत. जागतिक तापमानात होणारी वाढ रोखणे व त्यामुळे होणाऱ्या पर्यावरणीय बदलाची तीव्रता कमी करणे, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी करावयाच्या उपायोजनांचा भाग म्हणून राज्य शासनाचे विविध विभाग व जनतेच्या सहभागातून वनमहोत्सव कालावधीमध्ये दि. १ जुलै रोजी राज्यात २ कोटी वृक्ष लागवड करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. विविध यंत्रणांच्या व जनतेच्या सहभागातून हरित महाराष्ट्राची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी १ जुलै रोजी सातारा जिल्ह्यातही ६ लाख ७८ हजार २३० वृक्षलागवड करण्यात येणार आहे. वन विभागामार्फत ५३ साईटस्वर ४ लाख ६० हजार ६००, सामाजिक वनीकरण विभागामार्फत २७ साईटवर ३० हजार तर इतर शासकीय विभाग व स्वयंसेवीसंस्था यांच्यामार्फत ६७० साईटवर १ लाख ८७ हजार ६३० रोपांची लागवड करण्यात येणार आहे.वन विभागामार्फत माण तालुक्यातील ९८ हजार, कऱ्हाड- ४२ हजार ५००, खंडाळा- १० हजार, कोरेगाव- ६६ हजार ८००, पाटण- १५ हजार ७००, फलटण- १ लाख १५ हजार १००, सातारा- १३ हजार ३००, खटाव- ९१ हजार २०० व वाई तालुक्यात ८ हजार या प्रमाणे झाडे लावण्यात येणार आहेत. या वृक्षलागवडीमध्ये सहकारी साखर कारखाने, औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या, विविध संस्था, पर्यावरण प्रेमी १ जुलै रोजी होणाऱ्या वृक्षलागवडीत मोठ्या संख्येने सहभाग घेणार आहेत.जिल्ह्यात वृक्षारोपणाच्या विविध कार्यक्रमातून अधिकाधिक झाडे लावून जिल्ह्यात वृक्षारोपणाची लोकचळवळ निर्माण करण्यात सर्वांनीच सक्रिय होणे काळाची गरज आहे. वृक्ष लागवडीअंतर्गत जिल्ह्यात विविध शासकीय-निमशासकीय यंत्रणांबरोबरच जनतेनेही या वृक्षलागवडीत सक्रिय सहभाग नोंदविणे गरजेचे आहे. स्वयंसेवी-सेवाभावी, सहकारी संस्था, मंडळे, विद्यार्थी आणि तरुणांनी सहभागी होणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी) प्रत्येकाने योगदान देणे गरजेचे... वृक्षलागवड मोहिमेत प्रामुख्याने वन आणि सामाजिक वनीकरण विभागाबरोबरच जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तसेच अन्य शाखांतील विद्यार्थ्यांनी किमान पाच ते दहा झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प करण्याची गरज आहे. जनतेने आपल्या घराजवळील, शिवारातील आणि गावातील मोकळ्या जागेत जास्तीत जास्त झाडे लावावीत. महाराष्ट्र शासनाच्या या महत्त्वाकांक्षी पर्यावरणपूरक अशी लोक चळवळ यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने योगदान देणे महत्त्वाचे आहे.